मनपा क्षेत्रातील ११७ शाळा जिल्हा परिषदेकडेच !

  74

आमदारांनी वेधले सभागृहाचे लक्ष


विरार : वसई - विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ११७ जिल्हा परिषद शाळांचे महानगरपालिकेकडे हस्तांतरण रखडलेले आहे. महानगरपालिकेच्या स्थापनेला यावर्षी सोळा वर्षे पूर्ण होत असताना सुद्धा शाळा हस्तांतरणाचा विषय "जैसे थे"च असल्याबाबत आमदार राजन नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात सभागृहाचे लक्ष वेधले. वसई, विरार, नालासोपारा आणि नवघर - माणिकपूर या चार नगरपालिकांसह ५३ गावांचा समावेश करीत ३ जुलै २००९ रोजी वसई-विरार महानगरपालिका स्थापन करण्यात आली. महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासूनच महापालिका कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या ११७ शाळा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबतचा विषय सुरू झाला. अनेकदा हा विषय महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या दप्तरी नोंदवला गेला आहे. मात्र अद्याप शाळांचे हस्तांतरण महापालिकेकडे करण्यात आलेले नाही. महानगरपालिका प्रशासन गेल्या वर्षभरापासून पालघर जिल्हा परिषदेकडून मागवत आहे.


महापालिका कार्यक्षेत्रात असलेल्या ११७ शाळांपैकी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेत किती शाळा आहेत त्यासोबतच खासगी किंवा संस्थांच्या जागांवर कितीशाळा बांधण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे शिक्षकांची संख्या, त्यांना देय असलेले मासिक वेतन, सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या, मंजूर पदे अशा सर्व प्रकारची माहिती जिल्हा परिषदेकडून मागविण्यात आली आहे. या ११७ शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुद्धा महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थी हिताच्या दृष्टीने वसई-विरार महापालिका क्षेत्रात असलेल्या शाळा जिल्हा परिषदेने तत्काळ हस्तांतरित करून द्याव्या या दृष्टीने शासनाने प्रयत्न करण्याची मागणी आमदार नाईक यांनी केली आहे.

Comments
Add Comment

बेरोजगार उमेदवारांसाठी इस्राायल येथे रोजगाराची संधी

युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन पालघर : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना

आठ पंचायत समित्यांचीही अधिसूचना प्रसिद्ध पालघर : पालघर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या

वसईत विद्यार्थ्याच्या अंगावर खांब कोसळला; सुदैवाने जीव वाचला, घटना सीसीटीव्हीत कैद

वसई शहरातील निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईमध्ये एका शाळकरी विद्यार्थ्याच्या अंगावर जुना

माजी आयुक्तांसह चौघांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

विरार : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात ६ दिवसाच्या 'ईडी' कोठडीत असलेले पालिकेचे

विरार, वसई, नालासोपारामधील अनेक भाग पाण्याखाली, पाऊस अजूनही कायम, रेड अलर्ट जारी

मुसळधार पावसाने वसई, विरार, नालासोपारा परिसराला झोडपून काढलं आहे. गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस या भागात

मुंबईत मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, पुढील 3 – 4 तास महत्वाचे, सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना तडका दिला असून पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड,