मनपा क्षेत्रातील ११७ शाळा जिल्हा परिषदेकडेच !

आमदारांनी वेधले सभागृहाचे लक्ष


विरार : वसई - विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ११७ जिल्हा परिषद शाळांचे महानगरपालिकेकडे हस्तांतरण रखडलेले आहे. महानगरपालिकेच्या स्थापनेला यावर्षी सोळा वर्षे पूर्ण होत असताना सुद्धा शाळा हस्तांतरणाचा विषय "जैसे थे"च असल्याबाबत आमदार राजन नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात सभागृहाचे लक्ष वेधले. वसई, विरार, नालासोपारा आणि नवघर - माणिकपूर या चार नगरपालिकांसह ५३ गावांचा समावेश करीत ३ जुलै २००९ रोजी वसई-विरार महानगरपालिका स्थापन करण्यात आली. महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासूनच महापालिका कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या ११७ शाळा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबतचा विषय सुरू झाला. अनेकदा हा विषय महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या दप्तरी नोंदवला गेला आहे. मात्र अद्याप शाळांचे हस्तांतरण महापालिकेकडे करण्यात आलेले नाही. महानगरपालिका प्रशासन गेल्या वर्षभरापासून पालघर जिल्हा परिषदेकडून मागवत आहे.


महापालिका कार्यक्षेत्रात असलेल्या ११७ शाळांपैकी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेत किती शाळा आहेत त्यासोबतच खासगी किंवा संस्थांच्या जागांवर कितीशाळा बांधण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे शिक्षकांची संख्या, त्यांना देय असलेले मासिक वेतन, सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या, मंजूर पदे अशा सर्व प्रकारची माहिती जिल्हा परिषदेकडून मागविण्यात आली आहे. या ११७ शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुद्धा महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थी हिताच्या दृष्टीने वसई-विरार महापालिका क्षेत्रात असलेल्या शाळा जिल्हा परिषदेने तत्काळ हस्तांतरित करून द्याव्या या दृष्टीने शासनाने प्रयत्न करण्याची मागणी आमदार नाईक यांनी केली आहे.

Comments
Add Comment

वसईत गॅस पाईपलाईन फुटली

वसई : पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये वसंत नागरी परिसरात शनिवारी चार ऑक्टोबर रोजी सकाळी धक्कादायक घटना घडली.

शहरातील पंधराशे दुर्गामूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन

पर्यावरणपूरक नवरात्र उत्सवाला प्रतिसाद विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर पालिका कार्यक्षेत्रात दुर्गा देवीच्या

माजी आयुक्तांच्या अटकेचे पुरावे दाखवा

कारागृहातील मुक्काम वाढला बांधकाम प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले पालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार,

'चिकन लॉलीपॉप'ने घेतला सात वर्षांच्या मुलाचा जीव, पालघरमध्ये खळबळ

पालघर: मुंबईला लागून असलेल्या महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे चिकन लॉलीपॉप

रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी एकमेकांकडे बोट

पालिका, बांधकाम विभागाने जबाबदारी झटकली विरार : रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे नुकतेच विरारमध्ये एका व्यक्तीचा

वसईत गरबा खेळताना हृदयविकाराने महिलेचा मृत्यू

नवरात्रोत्सवातील जल्लोषात हृदयद्रावक घटना वसई : वसईत नवरात्रोत्सवाच्या उत्साहात एक हृदय हेलावून टाकणारी घटना