राशिचक्रकार शरद उपाध्याय यांचा निलेश साबळेंवर निशाणा.. म्हणतात 'गर्विष्ठ... '

झी मराठीवरील एक दशक एका कार्यक्रमाने गाजवलं आणि तो कार्यक्रम म्हणजे 'चला हवा येऊ द्या'च पाहिलं पर्व. या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं मनोरंजन केला, त्यांना खळखळून हसवलं, कधी यामधील भावून पत्रांनी डोळ्यात पाणी आणलं आणि अनेक सिनेमे, मालिका, नाटक यांची कार्यक्रमातून प्रसिद्धी देखील केली. या मालिकेची धुरा निलेश साबळे सांभाळत होते. भाऊ कदम, श्रेया बुगडे,भारत गणेशपुरे, सागर कारंडे यांसारख्या उत्तम कलाकारांचं सादरीकरण आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहायला मिळाल. परंतु या कार्यक्रमाचा टीआरपी घसरल्याने हा कार्यक्रम अचानक बंद करावा लागला.परंतु आता अश्यातच आता 'चला हवा येऊ द्या' च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा झाली आहे. या पर्वाच सूत्रसंचालन अभिनेता अभिजीत खांडकेकर करणार आहे. आता दुसऱ्या पर्वात निलेश साबळे यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.यावर राशिचक्रकार शरद उपाध्याय यांनी पत्र लिहीत 'चला हवा येऊ द्या' मध्ये मिळालेल्या वागणुकीविषयी आणि निलेश साबळेंविषयी भाष्य केलं आहे.
राशीचक्राकार शरद उपाध्याय म्हणतात की, आदरणीय निलेशजी साबळे,'आपल्याला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या पर्वातून डच्चू देऊन त्या जागी अभिजीत खांडकेकरांना आणल्याची बातमी आज पेपरमध्ये वाचली. वाईट वाटले पण आश्चर्य नाही. मला तुम्ही एकदा बोलवले होते. त्याप्रमाणे मी 11 वाजता पोहोचलो.पण 3 वाजेपर्यंत त्या रुममध्ये कोणीच फिरकले नाही. मला पाणी हवे होते. पण एकादोघांना सांगूनही ते आणतो म्हणून गेले ते आलेच नाहीत. मला रुम सोडू नका असे सांगितले होते. निलेश, तुम्ही इतर कलावंतांच्या रुममध्ये जाऊन गप्पा मारीत होतात. पण माझ्या रुममध्ये डोकावलात ते थेट 4 वाजता, स्माईलही न देता स्टेजवर गेलात.इतरांचे शूटिंग खूप वेळ केलेत पण मला 6 वाजता बोलावून घाईघाईत 15 मिनिटात सारे आटोपले. त्यावेळीही इतर कलावंत मधेमधे बोलत होते. माझा सारा दिवस फुकट गेला. एडिटिंगमध्येही माझी उत्तरे गाळलीत. बाहेर आपली भेट झाली तेव्हा वडिलांच्या नात्याने काही सल्ले दिले.
पण कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आपल्या डोक्यात हवा गेली होती. दुसऱ्यांबद्दल आदर ठेवायचा असतो. पण तुम्ही बेपर्वा होतात. त्याच वेळी मला वाटले की अहंकार अति वाईट. गर्विष्ठ माणसाचे अध:पतन होते.एखादी पोस्ट मिळाली की ताठा येतो आणि सर्वनाश होतो.स्टेजवर तुम्ही साऱ्यांना आपलेसे केले नाही. आपले सादरीकरणही आकर्षक होत नव्हते. या साऱ्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला चॅनेलने बाहेर काढले. निलेशजी, स्वभाव मनमिळाऊ असावा. साऱ्यांना सांभाळून घ्यावे. मग सारे एकजुटीने काम करून कार्यक्रमाची चर्चा होईल.अभिजीत खांडकेकर ही धुरा चांगली सांभाळतील. मला त्यांचा सहवास मिळाला आहे. आपण अनुभवी आहात. त्यांना मार्गदर्शन करा. इंडस्ट्रीत आपल्याविषयी असलेले गैरसमज आपल्या चांगल्या कामाने दूर करा.आपल्याला ईश्वराची साथ लाभो ही विनंती.
अशा शब्दात शरद उपाध्याय यांनी निलेश साबळे यांना खडेबोल सुनावत त्यांची सौम्य शब्दात कानऊघडणी केली आहे. यावर अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत सहमती दर्शवली आहे.
Comments
Add Comment

आमिर खान प्रोडक्शन्सची सरप्राईज भेट! वीर दासचा ‘हॅपी पटेल’ १६ जानेवारी २०२६ ला प्रेक्षकांसमोर

‘हॅपी पटेल’चा धमाकेदार खुलासा! वीर दास आणि मोना सिंगची गुप्तहेर कथा १६ जानेवारी २०२६ रोजी रिलीज आमिर खानचा नवीन

कोण करणार मराठी बिग बॉस ६ सीझनला होस्ट? सलमान खानने दिली माहिती

मुंबई : हिंदी बिग बॉस संपण्याआधीच सलमान खानने मराठी बिग बॉसच्या सहाव्या सीझनला कोण होस्ट करणार याची माहिती दिली.

धर्मेंद्र यांना कसा दिला अंतिम निरोप ? कुठे आणि कसे झाले अस्थी विसर्जन ?

हरिद्वार : प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांना आता अंतिम निरोप देण्यात आला. कुटुंबियांच्या हस्ते धर्मेंद्र

Dhurandhar Advance Booking : विक्रम मोडण्यासाठी 'धुरंधर' सज्ज! रणवीर सिंहच्या चित्रपटाचं बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनापूर्वीच मोठं वादळ, केली छप्पडफाड कमाई

रणवीर रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) उत्तम अभिनयाची चुणूक 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' यांसारख्या सिनेमांमधून सर्वांनी

सूरजच्या लग्नातील धमाल जान्हवीला भोवली, थेट रूग्णालयात दाखल! पोस्ट करत म्हणाली, नजर...

मुंबई: 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणचे २९ नोव्हेंबर २०२५ रोजी लग्न झाले. सूरज चव्हाणच्या

मला या गोष्टी आवडतात... श्रेयस अय्यरसोबतच्या डेटींग चर्चांवर मृणालचे उत्तर

मुंबई: बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर पुन्हा एकदा डेटिंगच्या बातम्यांमुळे चर्चेत आली आहे. यावेळी