'मैदानात उतरण्याआधीच रडणे सोडा, हिंम्मत असेल तर खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या'

मंत्री आशिष शेलार यांचे उद्धव ठाकरेंना थेट आव्हान


मुंबई: "खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या, मैदानात उतरण्याआधीच रडणं सोडा!" अशा बोचऱ्या शब्दांत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला खुलं आव्हान दिलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्यावरून सुरू असलेल्या राजकारणात आता शेलार यांनी थेट उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलंय.





"उद्धव ठाकरेंनीच निवडणुका थांबवल्या, आता घाबरत आहेत!"


आशिष शेलार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, "मुंबई महापालिकेची निवडणूक वेळेवर न घेता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच महापालिकेवर प्रशासक नेमला. नवीन जनगणना नसतानाही त्यांनी २२७ ची वॉर्ड रचना बदलून मनमानी करत २३६ वॉर्डांची रचना केली. यात घोळ घालून निवडणुका लांबवल्या. २३६ वॉर्ड रचनेचा हट्ट धरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि निवडणुका रोखून धरल्या."


शेलार पुढे म्हणाले, "आता सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगानेही तयारी सुरू केली आहे. तरीही दोन निवडणुका लढल्यानंतर पुन्हा चिन्ह आणि पक्षाच्या नावाबाबत न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. यातून पुन्हा निवडणुका लांबवण्याचाच डाव दिसतोय. निवडणुकीला घाबरणारा हा पक्ष आहे, तथाकथित मर्दांच्या पक्षांचा हा कारभार आहे," असं म्हणत शेलारांनी उबाठाला टोला लगावला.



"मुंबईकरांसाठी भाजपाच लढणारा पक्ष!"


मुंबईकरांसाठी भाजपाच लढणारा पक्ष असल्याचंही शेलार यांनी अधोरेखित केलं. त्यांनी उद्धव ठाकरे गटाला थेट आव्हान देत म्हटलं, "हिंमत असेल तर खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या!"


सध्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असली तरी, वॉर्ड रचनेपासून ते चिन्ह आणि पक्ष प्रकरण याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत. निवडणूक आयोगाने नोव्हेंबरमध्ये मतदानासाठी तयारी केली असली तरी, न्यायालयीन प्रक्रियेमुळे पुन्हा अडथळे येण्याची शक्यता कायम आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला