आषाढी वारीच्या पार्श्वभुमीवर उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई: १४ लाख ५० हजारांहून अधिक मुद्देमाल जप्त!

सोलापूर: पंढरपूरची आषाढी वारी काही दिवसांवर आली असताना, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि निर्मितीवर जोरदार कारवाईचा बडगा उगारला आहे. या धडक मोहिमेत तब्बल १४ लाख ४५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वारकरी सांप्रदायाची शिस्त आणि पावित्र्य राखण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.


राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील पथकांनी अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रे, अवैध देशी-विदेशी मद्य विक्री, वाहतूक आणि बेकायदेशीर धाब्यांवर लक्ष केंद्रित केले होते. विभागीय उपायुक्त सागर धोमकर आणि अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.



नेमके काय जप्त झाले?


या कारवाईत एकूण १५ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यात ९५५० लिटर रसायन, २३५ लिटर हातभट्टी दारू, १९४.२२ लिटर देशी मद्य, ३०.२४ लिटर विदेशी मद्य, ७८ लिटर बिअर आणि एक चारचाकी वाहनाचा समावेश आहे. या सर्व जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत १४ लाख ४५ हजार ४०० रुपये इतकी आहे.



गेल्या एका महिन्यात २२९ गुन्हे दाखल!


केवळ आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवरच नाही, तर १ जून ते ३० जून २०२५ या कालावधीतही सोलापूर शहर आणि जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने सातत्याने कारवाई केली आहे. या एका महिन्यात एकूण २२९ गुन्हे नोंदवून २१४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.


या मोठ्या मोहिमेत ६५,५५० लिटर रसायन, ५७९३ लिटर हातभट्टी दारू, ४९९ लिटर देशी मद्य, १२८ लिटर विदेशी मद्य, १०२.३२ लिटर बिअर, २४६७ लिटर ताडी, १२६० लिटर गोव्यातील बनावट विदेशी मद्य आणि २७ वाहने जप्त करण्यात आली आहेत. या सर्व जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ कोटी ३ लाख ३७ हजार २३८ रुपये इतकी आहे.


याशिवाय, अवैध मद्यविक्री आणि मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या २७ धाब्यांवरही गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात आली आहे.


अवैध मद्यविक्री, निर्मिती आणि वाहतुकीविरोधातील ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिली आहे. तुम्हाला कुठेही अवैध मद्याची माहिती मिळाल्यास, टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ वर संपर्क साधून माहिती देऊ शकता. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Heat wave : १३ राज्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा, काळजी घेण्याचे आवाहन

- अकोला देशातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक उष्ण शहर मुंबई : सध्या देशभरातील हवामानात मोठे बदल होत आहेत. काही

Corporate Jihad : कॉर्पोरेट जिहादवर काय म्हणाले मंत्री नितेश राणे ?

पिंपळगाव बसवंत : जबरदस्तीने नमाज पढायला लावणे आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या अधिकृत तक्रारी प्राप्त

Transfer : जी. श्रीकांत छत्रपती संभाजीनगरचे नवे विभागीय आयुक्त

चार वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; जितेंद्र पापळकर यांची जीएसटी विभागात नियुक्ती मुंबई : राज्य शासनाने

Animal Beauty Parlor : तुम्हाला माहित आहे का? या गावाने चक्क सुरु केलंय, महाराष्ट्रात जनावरांच पाहिलं ब्युटी पार्लर; जाणून घ्या सविस्तर

सातारा : महाराष्ट्रातील गावं आता सुजलाम आणि सुफलाम होण्याच्या दिशेने आपली पाऊले उचलत आहेत. शासनाच्या अनेक योजना

Nanded News : नांदेड हादरले! नाल्यातील साचलेल्या पाण्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

नांदेड : नांदेड शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. शहरातील देगलूर नाका परिसरातील

Amravati Crime News : मित्राची रूम, दोन मुली अन् कॅमेऱ्याचं जाळं; परतवाडा व्हायरल व्हिडिओ प्रकरणात अयान अहमदच्या 'त्या' कृत्याचा पोलिसांनी केला पर्दाफाश!

अमरावती : परतवाडा येथे सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या प्रकरणाला आता एक गंभीर वळण