Prasad Lad : बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप

मुंबई : विधान परिषदेत आज भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. लाड यांचं बनावट लेटरहेड वापरून काहींनी ३.२० कोटी सरकारी निधी लंपास केल्याचा आरोप आहे. अधिवेशन संपल्यानंतर ४.३० वाजता मला रत्नागिरी येथून अधिकाऱ्यांचा फोन आला. आपण मागणी केल्याप्रमाणे ३ कोटी २० लाख निधी बीड जिल्ह्याला वर्ग केला आहे. त्याबाबत तुमचा फोनही आला होता असं सांगण्यात आले. त्यानंतर मला संशय आला आणि ती पत्राची प्रत मागवली. त्यातले लेटरहेड बनावट होते. सही खोटी होती. मी फोनही केला नव्हता असा गंभीर आरोप आमदार प्रसाद लाड यांनी केला.



४ नावे समोर


सभेत बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, मी चौकशी केली असता हा निधी कुणीतरी चोरायचा प्रयत्न केला आहे हे लक्षात आले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर ही बाब घातली. मुंबई पोलीस आयुक्तांशी बोललो. रात्री उशिरा याबाबत सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात ४ नावे माझ्याकडे आली तीदेखील पोलिसांना कळवली आहेत. याप्रकारे सरकारी निधी हडपण्याचा प्रकार समोर आला. हा निधी मोठा होता म्हणून लक्षात आले. परंतु छोटे छोटे निधी हडप करण्याचे प्रकार याआधीही झाले आहेतअसं त्यांनी सांगितले.



बंडू नावाचा गृहस्थ


तसेच आमदार उमा खापरे, श्रीकांत भारतीय यांच्याबाबत हे झाले होते. स्वत: राम शिंदे सभापती होण्यापूर्वी त्यांच्यासोबतही हे घडले होते. अशा टोळ्या राज्यात कार्यरत आहेत. बीड जिल्ह्याचे नाव आल्यावर मी सतर्क झालो. आधीच बीडचा बोलबाला झाला आहे. बीडमधले हे महाठग कोण आहेत त्याची पोलीस चौकशी करत आहेत. माझ्याकडे अज्ञात नंबर आलेत ते पोलिसांना दिलेत. बंडू नावाचा गृहस्थ आहे जे सरपंच असल्याचे सांगतात. पोलीस चौकशी करतील. तांत्रिक पद्धतीने आमदार निधी वाटप केले जावे, जेणेकरून आमदारांना त्याचा ओटीपी येईल मग निधी दिला जाईल अशी मागणी मी सभागृहात केल्याचे आमदार प्रसाद लाड म्हणाले. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत सभापतींनी चौकशी करून तात्काळ दोषींना अटक करण्यात यावे असे निर्देश दिले आहेत.


Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या