पुरावे दिले तर खुलासा करेन; राऊतांच्या आरोपांवर आमदार सुनील शेळकेंचे थेट आव्हान

आरोप करणे हा राऊतांचा नेहमीचा उद्योग - अमोल मिटकरी


मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे त्यांनी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुनील शेळकेंनी उत्खनन क्षेत्रातील हजारो कोटींची रॉयल्टी बुडवून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. तसेच शेळकेंवर कारवाई करून महाराष्ट्राची लूट थांबवावी अशी मागणी देखिल राऊतांनी या पत्राद्वारे केली आहे. या आरोपांवर आता सुनील शेळकेंनी भाष्य केलं. संजय राऊतांनी यासंबंधीचे पुरावे दिले तर मी त्यावर खुलासा करेन, असं ते म्हणाले. तर आरोप करणं हा राऊतांचा नेहमीचा उद्योग असल्याचं विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी म्हणाले.


आमदार सुनील शेळके यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. राऊतांच्या आऱोपाविषयी विचारले असता ते म्हणाले की,संजय राऊत यांनी माझ्यावर कोणताही पुरावा नसताना आरोप केले आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की तुमच्याकडे माहिती असेल, काही पुरावे असतील किंवा मला यासंबंधीच्या शासकीय नोटीसा आल्या असतील, माझी चौकशी चालू असेल तर त्यांचे पुरावे सादर करावेत. जोवर ते पुरावे सादर करणार नाहीत, तोवर मी कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही. कुठलाही खुलासा करणार नाही, असं शेळके म्हणाले.



सरकारला समर्थन देणारे पक्ष, त्या पक्षांचे आमदार आणि खासदार महाराष्ट्राला लुटत आहेत आणि फडणवीसांचे याकडे लक्ष नाही. आमदार सुनील शेळकेंनी हजारो कोटी रुपयांची रॉयल्टी लुटली आहे. हे खूप गंभीर प्रकरण आहे. एमआयडीसीच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे खाण उद्योग सुरू करून त्यांनी सरकारची हजारो कोटी रुपयांची रॉयल्टी बुडवली आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबद्दल सविस्तर तपशील पाठवला. त्यासोबत पुरावेही जोडले आहेत, असं राऊत म्हणाले.


ते म्हणाले, आतापर्यंत मी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदारांच्या भ्रष्टाचाराचे २१ खटले पुराव्यांसह पाठवले आहेत. मात्र, फडणवीसांनी आजपर्यंत यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही किंवा मी त्यावर कारवाई करेन, असंही सांगितलं नाही.

Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या