ENG vs IND: शुभमन गिलचे शतक, पहिल्या दिवशी भारत तीनशेपार

  99

एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून एजबेस्टनच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने झळकावलेल्या शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर तीनशे धावांचा टप्पा पार केला. मात्र त्यासोबतच भारताने आपले ५ गडी गमावलेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा शुभमन गिल ११४ आणि रवींद्र जडेजा ४१ धावांवर खेळत होते.


या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकला आणि भारताला पहिल्यांदा फलंदाजीसाठी निमंत्रित केले. भारताची सुरूवात चांगली झाली नाही. केएल राहुल २ धावांवर खेळत असताना टीम इंडियाला पहिला झटका बसला. राहुल २ धावा करून बाद झाला. यशस्वी जायसवालने सलामीला साजेशी ८७ धावांची खेळी केली. तर त्याला साथ देणारा करूण नायर ३१ धावा करून बाद झाला.


करूण बाद झाल्यानंतर जायसवाल आणि गिलची जोडी जमली. मात्र जायसवालही ८७ धावांवर बाद झाला. ऋषभ पंतने त्यानंतर २५ धावा करत गिलची साथ देण्याचा प्रयत्न केला मात्र ते प्रयत्न अपुरे ठरले. पंतनंतर आलेला नितीश कुमार रेड्डी अवघी एक धाव करून बाद झाला. पहिल्या दिवसअखेर भारताने ५ बाद ३१० धावा केल्या आहेत.


भारतीय संघाने प्लेईंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले होते. नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर आणि आकाशदीप यांना संघात सामील केले गेले. बुमराह या सामन्यात खेळत नाही आहे.

Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल