ENG vs IND: शुभमन गिलचे शतक, पहिल्या दिवशी भारत तीनशेपार

एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून एजबेस्टनच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने झळकावलेल्या शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर तीनशे धावांचा टप्पा पार केला. मात्र त्यासोबतच भारताने आपले ५ गडी गमावलेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा शुभमन गिल ११४ आणि रवींद्र जडेजा ४१ धावांवर खेळत होते.


या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकला आणि भारताला पहिल्यांदा फलंदाजीसाठी निमंत्रित केले. भारताची सुरूवात चांगली झाली नाही. केएल राहुल २ धावांवर खेळत असताना टीम इंडियाला पहिला झटका बसला. राहुल २ धावा करून बाद झाला. यशस्वी जायसवालने सलामीला साजेशी ८७ धावांची खेळी केली. तर त्याला साथ देणारा करूण नायर ३१ धावा करून बाद झाला.


करूण बाद झाल्यानंतर जायसवाल आणि गिलची जोडी जमली. मात्र जायसवालही ८७ धावांवर बाद झाला. ऋषभ पंतने त्यानंतर २५ धावा करत गिलची साथ देण्याचा प्रयत्न केला मात्र ते प्रयत्न अपुरे ठरले. पंतनंतर आलेला नितीश कुमार रेड्डी अवघी एक धाव करून बाद झाला. पहिल्या दिवसअखेर भारताने ५ बाद ३१० धावा केल्या आहेत.


भारतीय संघाने प्लेईंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले होते. नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर आणि आकाशदीप यांना संघात सामील केले गेले. बुमराह या सामन्यात खेळत नाही आहे.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत