Narayan Rane : "राज शिवसेनेत आला की, उद्धव ठाकरे नगण्य होणार"; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

एवढं प्रेम उतू जातय तर, भावाला मातोश्रीचा एक भाग देतोस का? : खासदार नारायण राणे


मुंबई : “राज ठाकरे पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत जात आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवायचा का? हा त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे. आमच्या मार्गदर्शनाचा प्रश्न नाही. शेवटी घरं आहे, बंधुत्व आहे. कोणी कुठे जावं हा व्यक्तीगत प्रश्न आहे” असं नारायण राणे म्हणाले. “राज यांनी शिवसेनेत यावं, असं ते कधीच म्हणू शकत नाही. कारण तसं झाल्यास अस्तित्वच राहणार नाही. राज शिवसेनेत आला की, तो प्रमुख होणार. उद्धव ठाकरे नगण्य. तो नाही बोलवणार” असं नारायण राणे म्हणाले.



मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना मग गेली कुठे?


'राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडायला उद्धव ठाकरे कारणीभूत आहेत. उद्धव ठाकरेंनी एवढं छळलंय राज ठाकरेंना आणि म्हणूनच राज ठाकरेंनी शिवसेना सोडली. तेच उद्धव ठाकरे आता राज ठाकरेंच्या स्वागताला तयार आहेत'... “काय भविष्य? भविष्य असतं तर हे वेगळे झाले असते का? सत्ताधारी पक्षाची संख्या २३५. आता यांना मराठी माणूस आठवला. त्यांच्यासाठी काय केलं. आज मराठी टक्का १८ टक्के फक्त. १९६० साली ६० टक्के होता. याचं कारण काय? मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना मग गेली कुठे?” असा सवाल नारायण राणे यांनी विचारला.



“त्या अडीच वर्षात दोन दिवस मंत्रालयात आले. मुख्यमंत्रीपदाचं महत्त्व नाही. काय केलं महाराष्ट्रासाठी?: मराठी माणसासाठी, तरुणासाठी, नोकरीसाठी. पोटापाण्याच्या प्रश्नासाठी. ज्या मराठी माणसाने शिवसेनेला आधार दिला, ताकद दिली. शिवसेनेने त्यांच्या नावावर उदरनिर्वाह चालवला. हेच लोक आता मराठी भाषेचा आंनदोत्सव साजरा करतायत. मराठी माणसासाठी, हिंदुत्वासाठी बोलण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकार नाही” असं नारायण राणे म्हणाले.



"ओरिजनल शिवसेना आता एकनाथ शिंदेंकडे आहे"


“बाळासाहेबांनी ४८ वर्षात जे कमावलं, ते याने अडीच वर्षात साफ करुन टाकलं. ओरिजनल शिवसेना आता एकनाथ शिंदेंकडे आहे” असं नारायण राणे म्हणाले. “मराठीचा पुळका आलाय मग मुलांना का इंग्रजी मीडियमच्या शाळेत शिकवलं. स्कॉटिशमध्ये कोणाला पाठवलं, याचा संदर्भ घेऊन मुख्यमंत्र्यांनी ते उदहारण दिलं” असं नारायण राणे म्हणाले.



मातोश्रीचा एक भाग देतोस का?


दोन भाऊ एकत्र येतात हा भाजपला प्रॉब्लेम आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात. “दोन भाऊच कशाला, सगळे भाऊ घ्या. आम्हला फरक पडत नाही. भाजप आणि आघाडीचे तिन्ही पक्षांचे आज ३२५ आमदार आहेत. एवढं प्रेम उतू जातय तर, मातोश्रीचा एक भाग देतोस का?” असं खोचक सवाल नारायण राणेंनी केला.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : खाण परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे

 परवानगी नियमात आवश्यक ते बदल करणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय मुंबई : राज्यभरात मोठ्या

Sunil Tatkare : महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर विविध कार्यक्रमांनी साजरी करणार - सुनिल तटकरे

मुंबई : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

Dharavi Koliwada : धारावी कोळीवाड्याच्या सीमा निश्चित करा!

 महसूलमंत्री बावनकुळे यांचे आदेश; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती, तीन महिन्यात अहवाल सादर

Chandrashekhar Bawankule : अवैध मुरुम उत्खनन दोषी अधिकाऱ्यांचीनंतरच बडतर्फी

 सोलापूरमधील चिंचोली एमआयडीसीमधील प्रकार  महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आदेश  २०० कोटींच्या दंड

Raigad News : रायगड जिल्ह्यात नियम पूर्तता करणाऱ्या दगडखाणींना उत्खननाची परवानगी: महसूल मंत्री

मुंबई :  आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या खाणींना सरसकट बंदी न घालता उत्खननासाठी परवानगी द्यावी, मात्र

Deputy Collectors : राज्यातील ५१ तहसीलदार होणार उपजिल्हाधिकारी

महसूल विभागात हालचाली; 'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संधी हुकणार? मुंबई :