Narayan Rane : "राज शिवसेनेत आला की, उद्धव ठाकरे नगण्य होणार"; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

एवढं प्रेम उतू जातय तर, भावाला मातोश्रीचा एक भाग देतोस का? : खासदार नारायण राणे


मुंबई : “राज ठाकरे पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत जात आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवायचा का? हा त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे. आमच्या मार्गदर्शनाचा प्रश्न नाही. शेवटी घरं आहे, बंधुत्व आहे. कोणी कुठे जावं हा व्यक्तीगत प्रश्न आहे” असं नारायण राणे म्हणाले. “राज यांनी शिवसेनेत यावं, असं ते कधीच म्हणू शकत नाही. कारण तसं झाल्यास अस्तित्वच राहणार नाही. राज शिवसेनेत आला की, तो प्रमुख होणार. उद्धव ठाकरे नगण्य. तो नाही बोलवणार” असं नारायण राणे म्हणाले.



मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना मग गेली कुठे?


'राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडायला उद्धव ठाकरे कारणीभूत आहेत. उद्धव ठाकरेंनी एवढं छळलंय राज ठाकरेंना आणि म्हणूनच राज ठाकरेंनी शिवसेना सोडली. तेच उद्धव ठाकरे आता राज ठाकरेंच्या स्वागताला तयार आहेत'... “काय भविष्य? भविष्य असतं तर हे वेगळे झाले असते का? सत्ताधारी पक्षाची संख्या २३५. आता यांना मराठी माणूस आठवला. त्यांच्यासाठी काय केलं. आज मराठी टक्का १८ टक्के फक्त. १९६० साली ६० टक्के होता. याचं कारण काय? मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना मग गेली कुठे?” असा सवाल नारायण राणे यांनी विचारला.



“त्या अडीच वर्षात दोन दिवस मंत्रालयात आले. मुख्यमंत्रीपदाचं महत्त्व नाही. काय केलं महाराष्ट्रासाठी?: मराठी माणसासाठी, तरुणासाठी, नोकरीसाठी. पोटापाण्याच्या प्रश्नासाठी. ज्या मराठी माणसाने शिवसेनेला आधार दिला, ताकद दिली. शिवसेनेने त्यांच्या नावावर उदरनिर्वाह चालवला. हेच लोक आता मराठी भाषेचा आंनदोत्सव साजरा करतायत. मराठी माणसासाठी, हिंदुत्वासाठी बोलण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकार नाही” असं नारायण राणे म्हणाले.



"ओरिजनल शिवसेना आता एकनाथ शिंदेंकडे आहे"


“बाळासाहेबांनी ४८ वर्षात जे कमावलं, ते याने अडीच वर्षात साफ करुन टाकलं. ओरिजनल शिवसेना आता एकनाथ शिंदेंकडे आहे” असं नारायण राणे म्हणाले. “मराठीचा पुळका आलाय मग मुलांना का इंग्रजी मीडियमच्या शाळेत शिकवलं. स्कॉटिशमध्ये कोणाला पाठवलं, याचा संदर्भ घेऊन मुख्यमंत्र्यांनी ते उदहारण दिलं” असं नारायण राणे म्हणाले.



मातोश्रीचा एक भाग देतोस का?


दोन भाऊ एकत्र येतात हा भाजपला प्रॉब्लेम आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात. “दोन भाऊच कशाला, सगळे भाऊ घ्या. आम्हला फरक पडत नाही. भाजप आणि आघाडीचे तिन्ही पक्षांचे आज ३२५ आमदार आहेत. एवढं प्रेम उतू जातय तर, मातोश्रीचा एक भाग देतोस का?” असं खोचक सवाल नारायण राणेंनी केला.

Comments
Add Comment

६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, याविरोधात

संजय गांधी उद्यानात तीन छाव्यांचे आगमन

कांदिवली: बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली

Mumbai Port : मुंबई बंदर होणार 'प्रदूषणमुक्त'! JNPA मध्ये हायटेक सुविधा, मालवाहतूक होणार सुपरफास्ट...मुंबई बंदराने काढली पहिली निविदा

मुंबई : वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाचे संकट लक्षात घेता, मुंबई बंदर प्राधिकरणाने 'हरित बंदर' (Green Port) बनण्याच्या

आज मतदानदिनी मेट्रो-३ मध्यरात्रीपर्यंत धावणार

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आज १५ जानेवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई सज्ज झाली आहे.

मुंबईत पश्चिम रेल्वेचा मेगा ब्लॉक

मुंबई : कांदिवली आणि बोरिवली विभागादरम्यान सहाव्या मार्गाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वे २०/२१

Mumbai Local Train Power Block : प्रवाशांनो घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक तपासा! पनवेल, कर्जत, कल्याण मार्गावर ब्लॉकचा मोठा फटका; परिणाम कुठे होणार ?

मुंबई : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर (समर्पित माल वाहतूक मार्ग) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला वेग