बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची झी मराठीच्या 'कमळी' मालिकेत एन्ट्री

मुंबई : अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने तिच्या अभिनय कारकीर्दिला टेलिव्हिजनपासून सुरुवात केली होती. हम पांच या मालिकेतून विद्याने प्रसिद्धी मिळवली. आता पुन्हा एकदा मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी विद्या सज्ज झाली आहे. पण, यावेळी विद्या बालन चक्क मराठी मालिकेत दिसणार आहे.


झी मराठीवर 'कमळी' ही नवी मालिका सुरू होत आहे. या मालिकेत विद्या बालनची एन्ट्री झाली आहे. विद्या या मालिकेत शिक्षिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे. कमळीला ती शिक्षणाचे आणि व्यवहार ज्ञानाचे धडे देताना दिसणार आहे. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे.


 


यामध्ये विद्या कमळीला काही प्रश्न विचारताना दिसत आहे. "भारताची आर्थिक राजधानी कोणती?" असं विचारताच कमळी मुंबई असं उत्तर देते. नंतर ती कमळीला मुंबईतील विमानतळाचं नाव काय, असं विचारते. त्यावर कमळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं उत्तर देते. तिसऱ्या प्रश्नावर मात्र कमळीची बोबडी वळते. कमळी आणि विद्याचा हा मजेशीर प्रोमो व्हिडिओ चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे. विद्या बालनला कमळी मालिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आजपासून ही मालिका झी मराठी वाहिनीवर रात्री ९ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Comments
Add Comment

Bigg Boss Marathi 6 : आज विषय गंभीर! रितेश भाऊंचा 'धक्का' कोणाला बसणार? प्रोमो आला समोर!

मुंबई : कलर्स मराठीवरील अत्यंत लोकप्रिय रियालिटी शो 'बिग बॉस मराठी सीझन ६' ( Bigg

Mahrashtrachi Hasayjatra Nirmiti Sawant : सोनी मराठी वाहिनीवरील “महाराष्ट्राची हास्यजत्रा”मध्ये निर्मिती सावंत यांचा खास धमाका

मुंबई : सोनी मराठी वाहिनी नेहमीच दर्जेदार आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे मनोरंजन देत आली आहे. कुटुंबासह पाहता

Savni Ravindra : गायिका सावनी रवींद्रचा नवा प्रवास सुरु; 'सावनी रेकॉर्डझ्' ची घोषणा

मुंबई : मराठी संगीतविश्वात आपल्या मधुर, भावस्पर्शी आणि ताकदीच्या आवाजाने वेगळी ओळख निर्माण करणारी राष्ट्रीय

‘पंचायत’ला ६ वर्षे पूर्ण, प्राइम व्हिडिओने केली पाचव्या पर्वाची घोषणा

मुंबई : द वायरल फीवर (टीव्हीएफ) निर्मित ‘पंचायत’च्या पाचव्या पर्वाची निर्मिती दीपक कुमार मिश्रा आणि चंदन कुमार

रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट सोबत येत आहे 'सालबर्डी'

मुंबई : मराठी चित्रपट त्याच्या आशय विषयासोबतच त्याच्या उच्च निर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे.

"देऊळ बंद २" येतोय २१ मे रोजी

मुंबई : २०१५ साली प्रदर्शित झालेल्या "देऊळ बंद" चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अध्यात्म आणि