Ravi Shastri on Shubhaman Gill: शुभमन गिलला ३ वर्षे कर्णधारपदी कायम ठेवा – रवी शास्त्री

  48

लंडन: भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलला पाठिंबा दिला आहे. इंग्लंडमध्ये भारताने मालिका गमावली तरी शुभमन गिलला कर्णधारपदी कायम ठेवावे अशी विनंती शास्त्री यांनी संघ व्यवस्थापनाला केली आहे. रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर गिलला ही जबाबदारी देण्यात आली होती. कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात गिलला पराभवाचा सामना करावा लागला होता.


शुभमन गिलने त्याच्या कर्णधारपदाच्या पदार्पणात शतक झळकावले आणि कर्णधार म्हणून त्याच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावणारा तो पाचवा भारतीय क्रिकेटपटू ठरला होता. पण त्याचे कर्णधारपदाचे पदार्पण त्याच्यासाठी संस्मरणीय राहिले नाही. कारण इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा ५ विकेट्सने पराभव केला. भारताच्या पराभवानंतरही शास्त्री यांनी गिलचे कौतुक केले आहे आणि संघ व्यवस्थापनाला गिलला तीन वर्षे कर्णधारपदी कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे.


रवी शास्त्री म्हणाले की, गिल खूप परिपक्व झाला आहे. तो ज्या पद्धतीने मीडियाशी वागतो. पत्रकार परिषदेत, टॉसच्या वेळी ज्या पद्धतीने बोलतो, त्यामुळे तो खूप परिपक्व झाला आहे. त्याला तीन वर्षे कर्णधार राहू द्या. मालिकेत काहीही झाले तरी काही फरक पडत नाही. तीन वर्षे त्याच्यासोबत राहा आणि मला वाटते की, तो संघासाठी चांगले काम करेल.

Comments
Add Comment

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे

ICC Rankings : आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतून रोहित-विराटची नावे गायब

दुबई : भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीची नावे आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतून गायब