Ravi Shastri on Shubhaman Gill: शुभमन गिलला ३ वर्षे कर्णधारपदी कायम ठेवा – रवी शास्त्री

लंडन: भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलला पाठिंबा दिला आहे. इंग्लंडमध्ये भारताने मालिका गमावली तरी शुभमन गिलला कर्णधारपदी कायम ठेवावे अशी विनंती शास्त्री यांनी संघ व्यवस्थापनाला केली आहे. रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर गिलला ही जबाबदारी देण्यात आली होती. कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात गिलला पराभवाचा सामना करावा लागला होता.


शुभमन गिलने त्याच्या कर्णधारपदाच्या पदार्पणात शतक झळकावले आणि कर्णधार म्हणून त्याच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावणारा तो पाचवा भारतीय क्रिकेटपटू ठरला होता. पण त्याचे कर्णधारपदाचे पदार्पण त्याच्यासाठी संस्मरणीय राहिले नाही. कारण इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा ५ विकेट्सने पराभव केला. भारताच्या पराभवानंतरही शास्त्री यांनी गिलचे कौतुक केले आहे आणि संघ व्यवस्थापनाला गिलला तीन वर्षे कर्णधारपदी कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे.


रवी शास्त्री म्हणाले की, गिल खूप परिपक्व झाला आहे. तो ज्या पद्धतीने मीडियाशी वागतो. पत्रकार परिषदेत, टॉसच्या वेळी ज्या पद्धतीने बोलतो, त्यामुळे तो खूप परिपक्व झाला आहे. त्याला तीन वर्षे कर्णधार राहू द्या. मालिकेत काहीही झाले तरी काही फरक पडत नाही. तीन वर्षे त्याच्यासोबत राहा आणि मला वाटते की, तो संघासाठी चांगले काम करेल.

Comments
Add Comment

IND vs PAK: पाकिस्तानचा डाव संपला, भारतासमोर १२८ धावांचे आव्हान

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी १२८ धावांचे आव्हान ठेवले आहे.

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

IND vs PAK : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील संघर्ष हा जगातील सर

भारताची बॉक्सर जॅस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्णपदक, रचला इतिहास

नवी दिल्ली: भारताची प्रतिभावान बॉक्सर जैस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५

BCCI च्या कुटुंबातील कोणीही मेलं नाही, म्हणून..., शुभम द्विवेदीच्या पत्नीची प्रतिक्रिया

"सामान्य लोक माझं ऐकतील आणि सामन्यावर बहिष्कार टाकतील" ऐशन्या द्विवेदी Asia Cup 2025 India Vs Pak Match Controversy: पहलगाम हल्ल्यात

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई