Ravi Shastri on Shubhaman Gill: शुभमन गिलला ३ वर्षे कर्णधारपदी कायम ठेवा – रवी शास्त्री

  16

लंडन: भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलला पाठिंबा दिला आहे. इंग्लंडमध्ये भारताने मालिका गमावली तरी शुभमन गिलला कर्णधारपदी कायम ठेवावे अशी विनंती शास्त्री यांनी संघ व्यवस्थापनाला केली आहे. रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर गिलला ही जबाबदारी देण्यात आली होती. कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात गिलला पराभवाचा सामना करावा लागला होता.


शुभमन गिलने त्याच्या कर्णधारपदाच्या पदार्पणात शतक झळकावले आणि कर्णधार म्हणून त्याच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावणारा तो पाचवा भारतीय क्रिकेटपटू ठरला होता. पण त्याचे कर्णधारपदाचे पदार्पण त्याच्यासाठी संस्मरणीय राहिले नाही. कारण इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा ५ विकेट्सने पराभव केला. भारताच्या पराभवानंतरही शास्त्री यांनी गिलचे कौतुक केले आहे आणि संघ व्यवस्थापनाला गिलला तीन वर्षे कर्णधारपदी कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे.


रवी शास्त्री म्हणाले की, गिल खूप परिपक्व झाला आहे. तो ज्या पद्धतीने मीडियाशी वागतो. पत्रकार परिषदेत, टॉसच्या वेळी ज्या पद्धतीने बोलतो, त्यामुळे तो खूप परिपक्व झाला आहे. त्याला तीन वर्षे कर्णधार राहू द्या. मालिकेत काहीही झाले तरी काही फरक पडत नाही. तीन वर्षे त्याच्यासोबत राहा आणि मला वाटते की, तो संघासाठी चांगले काम करेल.

Comments
Add Comment

आयसीसीकडून क्रिकेटच्या ६ नियमांमध्ये बदल

नवी दिल्ली : आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहे . हे नियम कसोटी, एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटसाठी

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत