अजित पवारांच्या मुलापाठोपाठ पुतण्याचाही साखपुडा

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार याचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी झाला. आता अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र याचाही साखरपुडा झाला. विधानसभेच्या निवडणुकीत युगेंद्र हा अजित पवारांच्या विरोधात उभा राहिला. होता. निवडणुकीत युगेंद्रचा पराभव झाला. पण अजित पवारांच्या विरोधात निवडणूक लढवणारा उमेदवार म्हणून युगेंद्रची चर्चा झाली होती.

खासदार सुप्रिया सुळे यांनी युगेंद्रच्या साखरपुड्याबाबत माहिती दिली आहे. युगेंद्र आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीचे फोटो व्हायरल होत आहेत.

युगेंद्र पवारच्या पत्नीचे नाव तनिष्का प्रभू असे आहे. तनिष्काने परदेशातून फायनान्समध्ये उच्च शिक्षण घेतले आहे. युगेंद्र आणि तनिष्का यांचा साखरपुडा निवडक नातलगांच्या उपस्थितीत घरीच झाला. या साखपुड्याचे निवडक फोटो व्हायरल होत आहेत. यातील एका फोटोत तनिष्का हातातील अंगठी दाखवताना दिसत आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी भाच्याला, युगेंद्रला साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. युगेंद्र आणि तनिष्का आयुष्यभर आनंदी आणि एकत्र रहा, खूप खूप शुभेच्छा. पवार कुटुंबात तनिष्काचे स्वागत करताना आनंद होत आहे, असेही सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियाद्वारे सांगितले. याआधी जय अजित पवार यांचा साखरपुडा झाला त्यावेळीही सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाद्वारे साखरपुड्याची माहिती सर्वांना दिली होती.

पुण्यात १० एप्रिल २०२५ रोजी जय अजित पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा झाला होता. ऋतुजा पाटील ही साताऱ्यातील फलटणच्या सोशल मीडिया कंपनी सांभाळणाऱ्या प्रविण पाटील यांची मुलगी आहे. या साखरपुड्याच्या निमित्ताने वाद विसरुन मुलांच्या आनंदासाठी पवार कुटुंब एकत्र आले होते.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार