किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

  27

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर सेवा केंद्राने अत्यंत महत्वाचा इशारा दिला आहे. कोकण किनारपट्टीवर ३० जुलै २०२५ रोजी ३.४ ते ३.५ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला. त्यामुळे राज्य आपत्कालीन विभाग लोकांच्या सेवेसाठी सतर्क आहे. राज्यात गेल्या २४ तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ मीमी पाऊस झाला तर पालघर जिल्ह्यात १६.१ रत्नागिरी जिल्ह्यात १५.२ रायगड जिल्ह्यात ११.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.  त्यामुळे पुढील २४ तासात पावसाचा जोर वाढू शक्यतो सतर्कतेचा इशारा म्हणून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आले आहेत


कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस झाला. 


गेल्या २४ तासात पुढील पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच राज्यात शुक्रवार २८ जून पासून शनिवार २९ जून सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी मिलिमीटरमध्ये नोंद करण्यात आली. पुढील जिल्ह्यांमध्ये ठाणे ९.९, रायगड ११.९, रत्नागिरी १५.२, सिंधुदुर्ग १९, पालघर १६.१, नाशिक ४.६, धुळे ९.४, नंदुरबार १.६, जळगाव १.९, अहिल्यानगर ०.४, पुणे ५.५, सोलापूर०.१, सातारा ७.१, सांगली ०.३, कोल्हापूर १५.२, छत्रपती संभाजीनगर ०.३, जालना ०.१, बीड ०.१,धाराशिव ०.१, नांदेड २.१, परभणी ०.६, हिंगोली ०.४, बुलढाणा ०.१, अकोला ०.४, वाशिम ०.२, अमरावती ०.३, यवतमाळ ३.४, वर्धा १.६, नागपूर ८.२, बुलढाणा १६, गोंदिया २२, चंद्रपूर ४.४ आणि गडचिरोली जिल्ह्यात १०.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.


कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड गावात पावसामुळे डोंगराळ उतारावर जमिनीस भेग पडायला सुरवात झाली असून गावकऱ्यांना सतर्कतेचा इशार देण्यात आला आहे. तरी दर ठिकाण भूस्खलन प्रवण असून, संततधार पाऊस पडत असल्याने भूस्खलनाची शक्यता नाकारता येत नाही. सुरक्षेतेच्या दृष्टीने तेथील रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे, त्यामुळे पर्यायी मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.









Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे