Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

  59

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.  पोलिस यंत्रणा प्रभावी बनवण्यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाने निर्णय घेतला असून काही अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. यात मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजी नगर इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे. सरकारच्या आदेशानुसार तीन नवीन पोलिस आयुक्तांच्या बदल्या पुणे शहरात करण्यात आल्या. पुण्यातील परिमंडळ दोन विभागाच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांची पोलिस प्रशिक्षण विभागात बदली करण्यात आली. वाहतूक विभागाचे  उपायुक्त अमोल झेंडे यांचीही बदली करण्यात आली.


कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी ?


 पुण्यातील शस्त्र तपासणी शाखेच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची राज्य राखीव पोलिस दल (SRPF) गट १, पुणे येथे कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, ठाणे शहरातील पोलिस उपायुक्त (DCP) महेंद्र पंडित यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. याशिवाय, पुण्यातील डीसीपी स्मार्तना पाटील यांची खंडाळा येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली आहे. डीसीपी वाहतूक (Traffic Police) अमोल झेंडे यांना दौंड येथील एसआरपीएफमध्ये कमांडरची जबाबदारी देण्यात आली आहे.कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांची मुंबईत डीसीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याशिवाय विजय पवार, सुनील लोखंडे, नम्रता पाटील आणि स्मिता पाटील यांनाही मुंबईतील पोलिस उपायुक्तपदाची नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. अशाप्रकारे, एकूण पाच आयपीएस अधिकाऱ्यांना मुंबईत डीसीपी म्हणून बढती देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


गृहविभागाच्या वतीने करण्यात आलेल्या बदल्या मोठ्या शहरांमध्ये पोलिस प्रशासन मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे,  एवढंच नाही तर महत्त्वाच्या पदांवर अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करून गुन्हेगारी नियंत्रण, कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. येत्या काळात ही प्रक्रिया वेगवान केली जाऊ शकते जेणेकरून राज्यभरात पोलिस यंत्रणा अधिक कार्यक्षम करता येईल. त्यामुळे गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन महत्वाचं ठरणार आहे.







Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची