Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.  पोलिस यंत्रणा प्रभावी बनवण्यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाने निर्णय घेतला असून काही अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. यात मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजी नगर इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे. सरकारच्या आदेशानुसार तीन नवीन पोलिस आयुक्तांच्या बदल्या पुणे शहरात करण्यात आल्या. पुण्यातील परिमंडळ दोन विभागाच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांची पोलिस प्रशिक्षण विभागात बदली करण्यात आली. वाहतूक विभागाचे  उपायुक्त अमोल झेंडे यांचीही बदली करण्यात आली.


कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी ?


 पुण्यातील शस्त्र तपासणी शाखेच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची राज्य राखीव पोलिस दल (SRPF) गट १, पुणे येथे कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, ठाणे शहरातील पोलिस उपायुक्त (DCP) महेंद्र पंडित यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. याशिवाय, पुण्यातील डीसीपी स्मार्तना पाटील यांची खंडाळा येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली आहे. डीसीपी वाहतूक (Traffic Police) अमोल झेंडे यांना दौंड येथील एसआरपीएफमध्ये कमांडरची जबाबदारी देण्यात आली आहे.कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांची मुंबईत डीसीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याशिवाय विजय पवार, सुनील लोखंडे, नम्रता पाटील आणि स्मिता पाटील यांनाही मुंबईतील पोलिस उपायुक्तपदाची नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. अशाप्रकारे, एकूण पाच आयपीएस अधिकाऱ्यांना मुंबईत डीसीपी म्हणून बढती देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


गृहविभागाच्या वतीने करण्यात आलेल्या बदल्या मोठ्या शहरांमध्ये पोलिस प्रशासन मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे,  एवढंच नाही तर महत्त्वाच्या पदांवर अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करून गुन्हेगारी नियंत्रण, कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. येत्या काळात ही प्रक्रिया वेगवान केली जाऊ शकते जेणेकरून राज्यभरात पोलिस यंत्रणा अधिक कार्यक्षम करता येईल. त्यामुळे गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन महत्वाचं ठरणार आहे.







Comments
Add Comment

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी

मुंबई अखंडपणे धावण्यामागे महिलांचे योगदान मोठे; 'सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी महापौरांचे वक्तव्य

मुंबई: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अन्यायाविरोधात उभे राहत मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग खुला