Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

  208

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.  पोलिस यंत्रणा प्रभावी बनवण्यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाने निर्णय घेतला असून काही अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. यात मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजी नगर इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे. सरकारच्या आदेशानुसार तीन नवीन पोलिस आयुक्तांच्या बदल्या पुणे शहरात करण्यात आल्या. पुण्यातील परिमंडळ दोन विभागाच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांची पोलिस प्रशिक्षण विभागात बदली करण्यात आली. वाहतूक विभागाचे  उपायुक्त अमोल झेंडे यांचीही बदली करण्यात आली.


कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी ?


 पुण्यातील शस्त्र तपासणी शाखेच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची राज्य राखीव पोलिस दल (SRPF) गट १, पुणे येथे कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, ठाणे शहरातील पोलिस उपायुक्त (DCP) महेंद्र पंडित यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. याशिवाय, पुण्यातील डीसीपी स्मार्तना पाटील यांची खंडाळा येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली आहे. डीसीपी वाहतूक (Traffic Police) अमोल झेंडे यांना दौंड येथील एसआरपीएफमध्ये कमांडरची जबाबदारी देण्यात आली आहे.कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांची मुंबईत डीसीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याशिवाय विजय पवार, सुनील लोखंडे, नम्रता पाटील आणि स्मिता पाटील यांनाही मुंबईतील पोलिस उपायुक्तपदाची नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. अशाप्रकारे, एकूण पाच आयपीएस अधिकाऱ्यांना मुंबईत डीसीपी म्हणून बढती देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


गृहविभागाच्या वतीने करण्यात आलेल्या बदल्या मोठ्या शहरांमध्ये पोलिस प्रशासन मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे,  एवढंच नाही तर महत्त्वाच्या पदांवर अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करून गुन्हेगारी नियंत्रण, कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. येत्या काळात ही प्रक्रिया वेगवान केली जाऊ शकते जेणेकरून राज्यभरात पोलिस यंत्रणा अधिक कार्यक्षम करता येईल. त्यामुळे गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन महत्वाचं ठरणार आहे.







Comments
Add Comment

Mumbai Dadar Kabutar khana : कबुतरखाना हटवण्यासाठी मध्यरात्री पालिकेचं पथक दाखल… पण संतप्त जमावानं कारवाईला घातला आडवा! मध्यरात्री दादरमध्ये काय घडलं?

मुंबई : दादरमधील गाजलेला कबुतरखाना अखेर हटवण्याच्या तयारीला सुरुवात झाली, पण ही कारवाई नक्की कधी होणार, याचं

जुहू समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली

मुंबई : जुहूच्या समुद्रात पोहोण्यासाठी गेलेली दोन अल्पवयीन मुले बुडाली. ड्युटीवर असलेल्या जीवरक्षकांनी एकाला

जलप्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचे एक पाऊल पुढे

मनपाकडून सहा प्रकारच्या रंगांचे वाटप मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला अधिक बळकटी यावी यासाठी पालिकेकडून

चाकरमान्यांना कोकण रेल्वेत मिळणार उकडीचे मोदक !

मुंबई : गणेशोत्सव अवघ्या चार आठवड्यांवर आला असून यावर्षी २७ ऑगस्ट रोजी गणरायाची प्रतिष्ठापणा होणार आहे. कोकणात

Monsoon: ऑगस्टमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

मुंबई: यंदाच्या वर्षी मान्सूनने अपेक्षेपेक्षा आधीच देशात आणि राज्यात प्रवेश करत दमदार सुरुवात केली होती. जून

लवकरच एसटीचे रिटेल इंधन विक्रीत पदार्पण : प्रताप सरनाईक

मुंबई : उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करण्याच्या हेतूने केंद्र व राज्य सरकारच्या व्यावसायिक भागिदारी तुन एसटी