मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

  60

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम राहणार असल्याचे चित्र आहे. वडखळ-पेण मार्गावरील उड्डाणपुलांवर पाणी साचण्याबरोबरच त्यांना तडे गेल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.


गेल्या अठरा वर्षांपासून रखडलेल्या या महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याला आणि उड्डाणपुलांना तडे गेले आहेत. पोलादपूरजवळील चांढवे, महाडजवळील नांगलवाडी, विसावा हॉटेल, नातेखिंड, वहूर, वीर रेल्वे स्टेशन, लोणारे खांब, पेण आदी ठिकाणच्या उड्डाणपुलांवर सध्या मोठे खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे, वडखळ येथून अलिबागकडे येणाऱ्या सेवारस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत.


पेणपासून सुरू होणाऱ्या उड्डाणपुलांवर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची योग्य व्यवस्था नसल्याने आणि सदोष आखणीमुळे थोड्या पावसातही पाणी साचते. यामुळे वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही आणि खड्डे चुकवताना रात्रीच्या वेळी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही महामार्गाची ही दुरवस्था कायम असल्याने, या खर्चावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून, प्रशासनाने यावर तात्काळ लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ