मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत. अशातच लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी मेट्रो ५ चा विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकाने घेतला असून ठाणे-कल्याण-भिंवडी या ठिकाणी मेट्रो ५ चा विस्तार करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल ट्रेनची गर्दी कमी होईल असा विश्वास राज्य सरकारच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे. तसेच हा विस्तार उल्हासनगर, आणि अंबरनाथ पर्यंत  केला जाईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी महत्वाची बैठक देखील बोलवली होती.


भिवंडी शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन परिवहन सेवेच्या गरजा भागविण्यासाठी कल्याण - भिवंडी मेट्रो लाईन प्रकल्प राबविण्यात येत आहे. भिंवडी शहरात मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होत असते त्यामुळे स्थानिकांना कायमच वाहतून कोंडीचा सामना करावा लागतो. वाहतूक समस्या आणि प्रवाशी यांच्यावरती कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी मेट्रोसह रस्त्याचे रुंदीकरण आणि नवीन उड्डाणपूल स्वतंत्र प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यांसदर्भात आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले "मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (MMRDA) राबविण्यात येत असलेल्या मेट्रो लाईन-5 या प्रकल्पांच्या माध्यमातून ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर परिसरातील लाखो नागरिकांना जलद, सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होणार आहे. विकसनशील शहरे आणि औद्योगिक केंद्रे यांच्यासाठी सार्वजनिक वाहतूक आणि रस्ते ही दोन्ही माध्यमे परस्परपूरक असून त्यांची अंमलबजावणी समांतर पद्धतीने केल्यास विकासाची गती वाढेल. त्यामुळे नागरिकांना अधिक फायदेशीर सेवा मिळू शकणार आहे." असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


तसेच या प्रकल्पांमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. तसेच मेट्रो प्रकल्पाचा विस्तार उल्हासनगर पर्यंत वाढवला जाईल. त्यासंदर्भात विशेष समिती नेमून अभ्यास करतील त्यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर परिसरात राहणाऱ्या लाखो रहिवाशांचा प्रवास जलद गतीने होणार आहे.












Comments
Add Comment

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी

मुंबई अखंडपणे धावण्यामागे महिलांचे योगदान मोठे; 'सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी महापौरांचे वक्तव्य

मुंबई: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अन्यायाविरोधात उभे राहत मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग खुला

'उबाठा' गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेग मुंबई :