मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत. अशातच लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी मेट्रो ५ चा विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकाने घेतला असून ठाणे-कल्याण-भिंवडी या ठिकाणी मेट्रो ५ चा विस्तार करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल ट्रेनची गर्दी कमी होईल असा विश्वास राज्य सरकारच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे. तसेच हा विस्तार उल्हासनगर, आणि अंबरनाथ पर्यंत  केला जाईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी महत्वाची बैठक देखील बोलवली होती.


भिवंडी शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन परिवहन सेवेच्या गरजा भागविण्यासाठी कल्याण - भिवंडी मेट्रो लाईन प्रकल्प राबविण्यात येत आहे. भिंवडी शहरात मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होत असते त्यामुळे स्थानिकांना कायमच वाहतून कोंडीचा सामना करावा लागतो. वाहतूक समस्या आणि प्रवाशी यांच्यावरती कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी मेट्रोसह रस्त्याचे रुंदीकरण आणि नवीन उड्डाणपूल स्वतंत्र प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यांसदर्भात आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले "मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (MMRDA) राबविण्यात येत असलेल्या मेट्रो लाईन-5 या प्रकल्पांच्या माध्यमातून ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर परिसरातील लाखो नागरिकांना जलद, सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होणार आहे. विकसनशील शहरे आणि औद्योगिक केंद्रे यांच्यासाठी सार्वजनिक वाहतूक आणि रस्ते ही दोन्ही माध्यमे परस्परपूरक असून त्यांची अंमलबजावणी समांतर पद्धतीने केल्यास विकासाची गती वाढेल. त्यामुळे नागरिकांना अधिक फायदेशीर सेवा मिळू शकणार आहे." असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


तसेच या प्रकल्पांमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. तसेच मेट्रो प्रकल्पाचा विस्तार उल्हासनगर पर्यंत वाढवला जाईल. त्यासंदर्भात विशेष समिती नेमून अभ्यास करतील त्यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर परिसरात राहणाऱ्या लाखो रहिवाशांचा प्रवास जलद गतीने होणार आहे.












Comments
Add Comment

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता