Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

  30

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले. 


पुणे:  दुबईहून पुण्याला येणारे स्पाइसजेटचे (एसजी-५०) विमान प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात दाखल झाले. पुण्यात दाखल झाल्यावर प्रवासी बॅगेज बेल्टजवळ सामानाची वाट पाहत थांबले होते. बराच वेळेनंतरही सामान येत नसल्याने त्यांनी संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, सामान दुसऱ्या विमानाने येणार असल्याचे सांगण्यात आले. विमानात इंधनाचा साठा वाढल्याने भार पेलण्याची विमानाची क्षमता संपली, त्यात पुन्हा सामानाचा भार नको म्हणून बॅगेज आणले नसल्याचे स्पाइसजेटने सांगितले. ही घटना गुरुवारी (ता. २६) सकाळी पुणे विमानतळावर घडली. ((SpiceJet Flight From Dubai Lands In Pune Without Luggage))


या विमानात सुमारे १४० प्रवाशी होते, ज्यांचे सामान विमानात भरलेच नसल्याचे आढळले. ज्यामुळे अनेक प्रवासी संतापले, तर अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागला.


दुबईहून रात्री १२.०५ वाजता निघणाऱ्या या विमानाने मुळातच उशिरा उड्डाण केले, तब्बल दोन तासांनी म्हणजे पहाटे २ वाजता या विमानाने उड्डाण केले, जे सकाळी ६.४० वाजता पुणे विमानतळावर उतरले. त्यानंतर आधीच त्रासलेल्या प्रवाशांना त्यांचे सामान दुबई विमानतळावरच राहिल्याचे आढळल्यामुळे पुणे विमानतळावर सकाळच्या प्रहरी एकच गोंधळ पाहायला मिळाला. यादरम्यान, स्पाइसजेटच्या कस्टमर केअरशी संपर्क साधण्याचा प्रवाशांनी अनेक प्रयत्न केले गेले पण त्यांना काही प्रतिसाद मिळाला नाही. ग्राउंड हँडलिंग आउटसोर्सच्या हवाल्यानुसार प्रवाशांना कोणतीही औपचारिक तक्रार पावती देण्यात आली नव्हती.


Comments
Add Comment

Pandharpur Vitthal आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

कुर्ला ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास आता  वेगाने होणार...

मुंबई : मुंबईकरांची  वाहतूक कोंडी (TRAFFIC CONGESTION) सोडवण्यासाठी "एमएमआरडीए"ने नवीन प्रकल्प उभारण्याचं काम सुरु केले आहे. 

जिओमध्ये गुंतवणूक ही माझ्या आयुष्यातली मोठी रिस्क : मुकेश अंबानी

रिलायन्स आता डीप-टेक, अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनण्याच्या मार्गावर मुंबई  : टेलिकॉम क्षेत्रातील

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे, परराष्ट्र मंत्र्यांकडे आ. निलेश राणे यांची मागणी

मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे. अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Madhuri Misal : नागरिकांना मिळणार दिलासा ! मिळकतकरासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने राज्यसरकारकडे पाठवावा...

पुणे :  मिळकत करावर दंड आणि व्याज लावला जात असल्याने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नागरिकांसाठी मोठा निर्णय