Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथ रथयात्रेची आजपासून सुरुवात, रथ ओढणाऱ्या दोऱ्यांची आहेत 'खास' नावे

पुरी : ओडिशामधील पुरी येथे दरवर्षी होणाऱ्या जगन्नाथ रथयात्रेला आजपासून म्हणजेच शुक्रवार, २७ जूनपासून झालेली आहे. जगभरातील लोक मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने या जगन्नाथ रथयात्रेचा उत्सव उत्साहाने पाहतात. या यात्रेची समाप्ती मंगळवार, ८ जुलै रोजी होणार असून ही यात्रा १२ दिवस चालते. या १२ दिवसांतील प्रत्येक दिवसाला खास महत्त्व आहे.



रथयात्रेसाठी काय आहे शुभ मुहूर्त


यंदा आजपासून आषाढ शुक्ल पक्षाचा दुसरा दिवस म्हणजे शुक्रवार, २७ जून आहे. या दिवसापासून रथयात्रेची सुरुवात होत आहे. पंचांगानुसार, २७ जून रोजी सकाळी ५.२५ ते ७.२२ पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग तयार झालेला आहे. या योगानंतर पुष्य नक्षत्र आहे. आजचा अभिजित मुहूर्त रात्री ११.५६ ते १२.५२ पर्यंत आहे. याच काळात प्रभूची यात्रा सुरु होणार आहेत.





आजपासून रथयात्रेची सुरुवातीची विधी


रथयात्रेच्या पहिल्या दिवशी पुरीचा राजा स्वतः ‘छेरा पन्हारा’ यावेळी विधी करतो. ज्यामध्ये तो रथाचा खालचा भाग सोनेरी झाडूने स्वच्छ करतो. याला नम्रता आणि सेवेचे प्रतीक मानले जाते. ‘हेरा पंचमी’च्या दिवशी देवी लक्ष्मी गुंडीचा मंदिरात जाते आणि प्रभूने तिला का सोडले याबद्दल नाराजी व्यक्त करते. ही घटना संपूर्ण प्रवासाला आणखी मनोरंजक बनवते.



रथयात्रेमधील दोरींनाही खास नावे


जगन्नाथ रथयात्रेमध्ये ओढल्या जाणाऱ्या तीन दोऱ्यांनाही स्वतःची अशी नावे आहेत. त्यातील भगवान जगन्नाथाच्या १६ चाकी रथाला नंदी घोष असे म्हटले जाते. नंदी घोष या रथाच्या दोरीचे नाव शंखचूड नाडी असे आहे. दुसरे बलभद्र याच्या १४ चाकांच्या रथाला तलध्वज असे म्हणतात. तलध्वज या रथाच्या दोरीला बासुकी या नावाने ओळखले जाते. तसेच तिसरी दोरी म्हणजेच सुभद्रेचा १२ चाकी रथ याला दर्पदलन असे म्हटले जाते. दर्पदलन या रथाच्या दोरीला स्वर्णचुडा नाडी या नावाने देखील ओळखले जाते. असे म्हटले जाते की, या दोऱ्या केवळ रथ ओढण्याचे साधनच नाही तर त्याला स्पर्श करणे म्हणजे भाग्य आहे, असे मानले जाते.


दरम्यान, एकटा व्यक्ती हा रथ जास्तवेळ ओढू शकत नाही. यावेळी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला संधी मिळावी म्हणून हे केले आहे. जरी तुम्ही रथ ओढू शकला नाहीत तरी काळजी करण्याची गरज नसते. कारण असं म्हंटल जातं की, खऱ्या मनाने सहभागी झाल्याने यज्ञांइतकेच पुण्य मिळते.

Comments
Add Comment

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र खाद्य महोत्सव

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या खमंग खाद्य पदार्थांचा आस्वाद दिल्लीकरांना मिळावा या उद्देशाने राजधानी दिल्ली

मोदी सरकारचा मोठा निर्णय, पीएमओ आता ‘सेवा तीर्थ’, राजभवन होणार ‘लोक भवन’

नवी दिल्ली : केंद्र सरकार प्रशासकीय रचनेत मोठा बदल करण्याच्या तयारीत असून, सत्ता आणि अधिकार यांची पारंपरिक

भारतीय नौदलप्रमुखांच्या 'त्या' वक्तव्याने पाकिस्तानला भरली धडकी

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर आजही सुरू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव काही बाबी सार्वजनिक करता येत नाही. पण योग्य ती

Bomb Threat : 'बॉम्ब'च्या धमकीने इंडिगोच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई : हैदराबादहून कुवैतकडे जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एअरलाईन्सच्या एका विमानाला धमकीचा ई-मेल आल्यानंतर मंगळवारी

डिजिटल अरेस्ट घोटाळ्यांची चौकशी सीबीआयकडे द्या: सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाने सायबर गुन्ह्यांशी संबंधित 'डिजिटल अरेस्ट' प्रकरणांच्या

केरळच्या मुख्यमंत्र्यांना ईडीची नोटीस

तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था): तिरुवनंतपुरममध्ये केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्यावर नव्या आरोपांची