IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का

लंडन: लीड्स कसोटी सामन्यात भारतीय संघाला सपाटून मार खावा लागला होता. आता दुसऱ्या कसोटीत शुभमन गिलच्या भारतीय संघासमोर कसोटी मालिकेत पुनरागमन करण्याचे आव्हान आहे. मात्र, दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्याला मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वीच जसप्रीत बुमराह ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील केवळ तीन सामनेच खेळणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. आता बुमराहला एजबॅस्टन कसोटी सामन्यात सक्तीची विश्रांती देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. बुमराह दुसरा कसोटी सामना खेळणार नसल्याने टीम इंडियाला याचा फटका बसणार आहे.


जसप्रीत बुमराहने पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडच्या ५ फलंदाजांना बाद केले होते. दुसऱ्या डावात त्याला फारसे यश मिळाले नव्हते. ही कसोटी भारताला ५ विकेट्सने गमवावी लागली होती. आता दुसऱ्या कसोटीत बुमराहऐवजी अर्शदीप सिंगला संघात स्थान मिळणार असल्याची माहिती आहे. आता बुमराहच्या अनुपस्थित टीम इंडियाला इंग्लंडच्या फलंदाजांना रोखण्याचं आव्हान असणार आहे.

Comments
Add Comment

भारत – ऑस्ट्रेलिया T20 थरार सुरू: पहिला सामना २९ ऑक्टोबरला!

Ind vs AUS T20 : दिवाळीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांच्या चाहत्यांचे लक्ष आता T20 क्रिकेटवर वळले आहे. २९ ऑक्टोबर

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय