IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का

लंडन: लीड्स कसोटी सामन्यात भारतीय संघाला सपाटून मार खावा लागला होता. आता दुसऱ्या कसोटीत शुभमन गिलच्या भारतीय संघासमोर कसोटी मालिकेत पुनरागमन करण्याचे आव्हान आहे. मात्र, दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्याला मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वीच जसप्रीत बुमराह ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील केवळ तीन सामनेच खेळणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. आता बुमराहला एजबॅस्टन कसोटी सामन्यात सक्तीची विश्रांती देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. बुमराह दुसरा कसोटी सामना खेळणार नसल्याने टीम इंडियाला याचा फटका बसणार आहे.


जसप्रीत बुमराहने पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडच्या ५ फलंदाजांना बाद केले होते. दुसऱ्या डावात त्याला फारसे यश मिळाले नव्हते. ही कसोटी भारताला ५ विकेट्सने गमवावी लागली होती. आता दुसऱ्या कसोटीत बुमराहऐवजी अर्शदीप सिंगला संघात स्थान मिळणार असल्याची माहिती आहे. आता बुमराहच्या अनुपस्थित टीम इंडियाला इंग्लंडच्या फलंदाजांना रोखण्याचं आव्हान असणार आहे.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत