IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का

  227

लंडन: लीड्स कसोटी सामन्यात भारतीय संघाला सपाटून मार खावा लागला होता. आता दुसऱ्या कसोटीत शुभमन गिलच्या भारतीय संघासमोर कसोटी मालिकेत पुनरागमन करण्याचे आव्हान आहे. मात्र, दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्याला मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वीच जसप्रीत बुमराह ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील केवळ तीन सामनेच खेळणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. आता बुमराहला एजबॅस्टन कसोटी सामन्यात सक्तीची विश्रांती देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. बुमराह दुसरा कसोटी सामना खेळणार नसल्याने टीम इंडियाला याचा फटका बसणार आहे.


जसप्रीत बुमराहने पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडच्या ५ फलंदाजांना बाद केले होते. दुसऱ्या डावात त्याला फारसे यश मिळाले नव्हते. ही कसोटी भारताला ५ विकेट्सने गमवावी लागली होती. आता दुसऱ्या कसोटीत बुमराहऐवजी अर्शदीप सिंगला संघात स्थान मिळणार असल्याची माहिती आहे. आता बुमराहच्या अनुपस्थित टीम इंडियाला इंग्लंडच्या फलंदाजांना रोखण्याचं आव्हान असणार आहे.

Comments
Add Comment

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल

IND vs ENG : भारताच्या गोलंदाजांचा भेदक मारा, इंग्लंडचा पहिला डाव २४७ धावांवर संपुष्टात

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर

IND vs ENG: ज्यो रूट आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यात मैदानातच जोरदार बाचाबाची!

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यातील आज दुसऱ्या दिवशीओव्हल क्रिकेट मैदानावर एक मोठा

केनिंग्टन ओव्हल कसोटीत भारताचा पहिला डाव 'एवढ्या' धावांत आटोपला

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये