Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

  75

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. रामदास आठवले म्हणाले “हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही. त्रिभाषा सूत्रामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी यांचा समावेश असणे गरजेचे आहे. मराठी ही आमची मातृभाषा आहेच आणि तिचा आम्हाला अभिमान आहे. मात्र, इंग्रजी व हिंदी भाषाचं  ज्ञानही आजच्या काळात अत्यावश्यक आहे.


महाराष्ट्रातील शाळांमध्ये सर्व विषय मराठीतच शिकवण्याचा काही आदेश सरकारने दिलेला नाही,” अशी त्यांनी भूमिका स्पष्ट केली.   तसेच राज ठाकरे यांच्याबद्दल रामदास आठवले यांनी आपलं मत मांडलं ते पुढे म्हणाले.“राज आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदीविरोधी भूमिका घेणं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या मूल्यांशी विसंगत आहे. राज्य सरकारने अशा दबावात न येता योग्य निर्णय घ्यावा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून योग्य भूमिका अपेक्षित असून, आमचा पाठिंबा त्यांना आहे.” असे देखील आठवले म्हणाले.


मराठी हा आमचा अभिमानाचा विषय


मराठी भाषे बद्दल बोलताना रामदास आठवले म्हणाले, “मराठी हा आमचा अभिमानाचा विषय आहेच, पण महाराष्ट्राबाहेर हिंदी ही संवादाची गरज असते. मुंबईसारख्या बहुभाषिक शहरातही अनेकजण मराठीत बोलताना दिसतात, ही अभिमानाची गोष्ट आहे. मात्र, हिंदीचा अवमान होणे योग्य नाही. इंग्रजीचं महत्त्वही नाकारता येत नाही. आपण मराठी माणसं असलो तरी राष्ट्रभाषेचा सन्मान राखणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे.” मराठी भाषा बद्दल आठवले यांनी भूमिका स्पष्ट केली.








Comments
Add Comment

कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी , मुंबई ते मडगाव प्रवास होणार अधिक सोयीस्कर !

मुंबई : मुंबई ते मडगाव दरम्यान आतापर्यंत आठ डब्यांची ‘वंदे भारत’ चालवण्यात येत होती. मात्र, गणेश चतुर्थीच्या

अमित ठाकरे आणि आशिष शेलारांच्या भेटीत काय झाले ?

मुंबई : मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी शनिवारी मुंबईत मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. मनसे प्रमुख राज ठाकरे

Maharashtra Police : पदोन्नतीचे आदेश २४ तासांत रद्द, ३६४ पोलीस निरीक्षकांना मूळ पदावर परत पाठवण्याचे आदेश, मॅटने दिला दणका

मुंबई : पदोन्नतीतील आरक्षणाला कायदेशीर मान्यता नसल्याचे निकाल मुंबई उच्च न्यायालयाने तसेच महाराष्ट्र

गणपती बाप्पांचा खड्ड्यांनी भरलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास

कोकणात गणेशमूर्ती घेऊन जाणारे भाविक करतात तारेवरची कसरत मुंबई : गणेशोत्सवाची चाहूल लागली की, कोकणातल्या

'गणेशोत्सवात किती पडणार पाऊस ? पावसाविषयी हवामान खात्याचा नवा अंदाज जाहीर

मुंबई : गणेशोत्सवात किती पाऊस पडणार ? या अनेकांना सतावत असलेल्या प्रश्नाचे उत्तर हवामान खात्याने दिले आहे.

'चाकरमानी' नाही 'कोकणवासी' म्हणा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे प्रशासनाला आदेश

मुंबई : कोकणातून मुंबईसह अन्य शहरांमध्ये स्थलांतरित झालेल्या नागरिकांना यापुढे 'चाकरमानी' असे म्हणायचे नाही तर