Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. रामदास आठवले म्हणाले “हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही. त्रिभाषा सूत्रामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी यांचा समावेश असणे गरजेचे आहे. मराठी ही आमची मातृभाषा आहेच आणि तिचा आम्हाला अभिमान आहे. मात्र, इंग्रजी व हिंदी भाषाचं  ज्ञानही आजच्या काळात अत्यावश्यक आहे.


महाराष्ट्रातील शाळांमध्ये सर्व विषय मराठीतच शिकवण्याचा काही आदेश सरकारने दिलेला नाही,” अशी त्यांनी भूमिका स्पष्ट केली.   तसेच राज ठाकरे यांच्याबद्दल रामदास आठवले यांनी आपलं मत मांडलं ते पुढे म्हणाले.“राज आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदीविरोधी भूमिका घेणं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या मूल्यांशी विसंगत आहे. राज्य सरकारने अशा दबावात न येता योग्य निर्णय घ्यावा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून योग्य भूमिका अपेक्षित असून, आमचा पाठिंबा त्यांना आहे.” असे देखील आठवले म्हणाले.


मराठी हा आमचा अभिमानाचा विषय


मराठी भाषे बद्दल बोलताना रामदास आठवले म्हणाले, “मराठी हा आमचा अभिमानाचा विषय आहेच, पण महाराष्ट्राबाहेर हिंदी ही संवादाची गरज असते. मुंबईसारख्या बहुभाषिक शहरातही अनेकजण मराठीत बोलताना दिसतात, ही अभिमानाची गोष्ट आहे. मात्र, हिंदीचा अवमान होणे योग्य नाही. इंग्रजीचं महत्त्वही नाकारता येत नाही. आपण मराठी माणसं असलो तरी राष्ट्रभाषेचा सन्मान राखणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे.” मराठी भाषा बद्दल आठवले यांनी भूमिका स्पष्ट केली.








Comments
Add Comment

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री