Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. रामदास आठवले म्हणाले “हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही. त्रिभाषा सूत्रामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी यांचा समावेश असणे गरजेचे आहे. मराठी ही आमची मातृभाषा आहेच आणि तिचा आम्हाला अभिमान आहे. मात्र, इंग्रजी व हिंदी भाषाचं  ज्ञानही आजच्या काळात अत्यावश्यक आहे.


महाराष्ट्रातील शाळांमध्ये सर्व विषय मराठीतच शिकवण्याचा काही आदेश सरकारने दिलेला नाही,” अशी त्यांनी भूमिका स्पष्ट केली.   तसेच राज ठाकरे यांच्याबद्दल रामदास आठवले यांनी आपलं मत मांडलं ते पुढे म्हणाले.“राज आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदीविरोधी भूमिका घेणं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या मूल्यांशी विसंगत आहे. राज्य सरकारने अशा दबावात न येता योग्य निर्णय घ्यावा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून योग्य भूमिका अपेक्षित असून, आमचा पाठिंबा त्यांना आहे.” असे देखील आठवले म्हणाले.


मराठी हा आमचा अभिमानाचा विषय


मराठी भाषे बद्दल बोलताना रामदास आठवले म्हणाले, “मराठी हा आमचा अभिमानाचा विषय आहेच, पण महाराष्ट्राबाहेर हिंदी ही संवादाची गरज असते. मुंबईसारख्या बहुभाषिक शहरातही अनेकजण मराठीत बोलताना दिसतात, ही अभिमानाची गोष्ट आहे. मात्र, हिंदीचा अवमान होणे योग्य नाही. इंग्रजीचं महत्त्वही नाकारता येत नाही. आपण मराठी माणसं असलो तरी राष्ट्रभाषेचा सन्मान राखणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे.” मराठी भाषा बद्दल आठवले यांनी भूमिका स्पष्ट केली.








Comments
Add Comment

गोरेगाव मुलुंड पश्चिमेतील उड्डाणपूल प्रकल्पाला गती, मुंबई मेट्रो ४च्या खालून जाणार पूल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : तानसा जलवाहिनी ते नाहूर रेल्वे पूल येथपर्यंतचा १.८९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल

महापालिकेच्या आपला दवाखान्यामध्येही मुख कर्करोगाची तपासणी

गर्भाशय मुख आणि स्तन कर्करोगाचे दवाखान्यांसह प्रसुतीगृहांमध्ये तपासणी शिबीर मुंबई (विशेष प्रतिनिधी)

गोरेगावात लिफ्टमध्ये हायड्रोजन फुग्यांचा स्फोट; तीन जण थोडक्यात बचावले

मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात हायड्रोजन गॅस भरलेल्या फुग्यांमुळे मोठा धोका निर्माण झाल्याची घटना समोर आली

भारतीय कृषी क्षेत्रावर तसा विपरीत परिणाम होऊ नये

अंदाजपत्रकातून विकासाला गती येण्यासाठी आणखी काही ठोस पावलांची अपेक्षा बारामती : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत

शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल

राज्य सरकारचा निर्णय; कागल आणि हातकणंगलेचा भाग वगळला मुंबई : राज्यातील साडेतीन शक्तीपीठांना जोडणाऱ्या

Pune Mumbai Expressway News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस गळतीमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला, पहाटेपर्यंत बचावकार्य सुरू

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपासून सुरू झालेला वाहतुकीचा खोळंबा तब्बल १२