Devendra Fadanvis 'आम्ही सर्व जनतेचे सेवक', लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका...

मुंबई : भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या विधानावरुन अडचणीत वाढ होऊ शकते . गावातील काही टीकांवर बोलताना लोणीकरांची जीभ घसरली. तुमच्या बापाला पेरणीची पैसे मोदींनीच दिले आहेत. अशी भाषा लोणीकरांनी वापरली आहे.“तुमच्या आई, बहीण आणि बायकोला देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्हीच देतो. तुमच्या अंगावरचे कपडे आणि बुटं देखील आम्हीच दिलेले आहेत” अशी भाषा लोणीकरांनी वापरली होती.


लोणीकरांच्या विधानावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली, फडणवीस म्हणाले “बबनराव लोणीकरांच विधान पूर्णपणे चुकीच आहे. काही लोकांना उद्देशून जरी त्यांनी असं विधान केलं असेल तरी असं विधान करण्याचा कोणालाही अधिकार नाही. देशाचे पंतप्रधान म्हणतात मी प्रधानसेवक आहे. आम्ही सर्व जनतेचे सेवेक आहोत, आम्हाला मालक बनता येणार नाही. बबनराव लोणीकरांच वक्तव्य चुकीच आहे, तशी त्यांना समज देण्यात येईल” असे मुख्यमंत्री म्हणाले.


राज्यात गेला काही दिवसांपासून हिंदी भाषा सक्तीवरुन राजकारण सुरु आहे.  हिंदी भाषा सक्तीवरुन देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले.  “माझ उद्धवजींना एवढच सांगणं आहे की, मराठी भाषेत टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत, त्या अलंकारांचा उपयोग केला, तर चांगलं होईल. राज्यात हिंदी सक्ती नाही, मराठी सक्ती आहे. हिंदी ऑप्शनल आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


ये पब्लिक हैं, सब जानती हैं”  देवेंद्र फडणवीसांचा विश्वास 


यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या निकालावरती राहुल गांधी यांनी वारंवार आरोप केले होते, त्यासंदर्भात मुंबई हायकोर्टाने काल भूमिका स्पष्ट केली. पत्रकारांच्या प्रश्नांवर फडणवीस म्हणाले    “मला असं वाटतं की, राहुल गांधी यांचा देशाच्या संविधानावर विश्वास असेल, लोकशाहीवर विश्वास असेल, आणि न्यायालयीन पद्धतीवर विश्वास असेल, तर आतातरी ते महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या विषयात बोलणार नाहीत. काल अतिशय विस्तृत निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उभं करण्याच काम करणाऱ्यांना पुराव्यासहीत, न्यायासहित, संविधानासहित माननीय उच्च न्यायालायने उत्तर दिलं आहे. काही लोक झोपेच सोंग घेऊन झोपल्यासारखं करतील, तर ये पब्लिक हैं, सब जानती हैं” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.





Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात