वाढीव मतदानासंदर्भातील याचिका फेटाळली

  31

उच्च न्यायालयाचा प्रकाश आंबेडकरांना धक्का


मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालावर सर्वच विरोधी पक्षांनी शंका उपस्थित करत निवडणूक आयोगाला लक्ष्य केले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सायंकाळी ६ नंतर वाढलेल्या ७६ लाख मतदारांचा आकडा संशयास्पद असल्याचे म्हटले होते. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर २५ जून रोजी निकाल देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, बुधवारी प्रकाश आंबेडकर यांची याचिका फेटाळताना न्यायालयाचा वेळ वाया घालवला, असे निरीक्षणही नोंदवले आहे.



प्रकाश आंबेडकर यांच्यावतीने ७६ लाख मतदारांचा मुद्दा उपस्थित करत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, प्रकाश आंबेडकर यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याचिकाकर्ते आणि आमचा कालच्या कामकाजाचा वेळ वाया घातला, असे निरीक्षणही हायकोर्टाने निर्णय देताना नोंदवले आहे. त्यामुळे, गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या वादावर आता न्यायालयाने आपला निर्णय स्पष्टपणे दिला आहे.



न्यायालयाच्या निर्णयावर गुरुवारी मांडणार भूमिका


न्यायालयाने निर्णय दिला असून चेतन चंद्रकांत अहिरे यांची याचिका फेटाळली आहे. न्यायालयाकडून हा निकाल अपलोड झाल्यानंतर नेमकी याचिका फेटाळण्याचे कारण काय हे पाहता येईल. त्यानंतरच, मी माझी प्रतिक्रिया देईल असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. गुरुवारी, २६ जून रोजी सकाळी ११.३० वाजता मी मुंबईतील कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधणार आहे, अशी माहितीही आंबेडकर यांनी दिली.

Comments
Add Comment

राज्यात वीज दर कपातीला एमईआरसीचा हिरवा कंदील

पहिल्यावर्षी १० टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत ५ वर्षांत २६ टक्के वीजदर होणार कमी मुंबई : राज्याच्या

आदित्य ठाकरेची अटक टाळण्यासाठी हैद्राबादवरुन आणला मांत्रिक!

शिवसेना नेते रामदास कदम यांचा आरोप मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत वाद आता काळी विद्या, जादूटोणा आणि तांत्रिक

Numerology: वयाच्या ३५ वर्षानंतर प्रचंड संपत्ती मिळवतात या ३ तारखांना जन्मलेले लोक

मुंबई: अंकज्योतिषामध्ये प्रत्येक अंकाचे खास महत्त्व आहे. १ ते ९ अंकांचा संबंध ग्रह, राशी आणि नक्षत्रांशी जोडलेला

गावा गावात क्रीडा सुविधांसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद - क्रीडा मंत्री

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात क्रीडा क्षेत्रात अनेक गुणवंत विद्यार्थी आहेत. त्यांच्या गुणांना वाव मिळावा तसेच

"स्वबळाची परिक्षा होणार की नाही, पक्षातील वरिष्ठ नेते ठरवतील," गिरीश महाजन स्पष्टच बोलले...

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार

"आम्ही संघर्ष करुन लोकशाही टिकवली," आणीबाणीवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले ?

मुंबई : आणीबाणीत संर्घष करणाऱ्याला स्मरणार्थ ५० वर्ष पूर्ण झालेले असून मुंबई येथे संविधान हत्या दिन कार्यक्रम