वाढीव मतदानासंदर्भातील याचिका फेटाळली

उच्च न्यायालयाचा प्रकाश आंबेडकरांना धक्का


मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालावर सर्वच विरोधी पक्षांनी शंका उपस्थित करत निवडणूक आयोगाला लक्ष्य केले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सायंकाळी ६ नंतर वाढलेल्या ७६ लाख मतदारांचा आकडा संशयास्पद असल्याचे म्हटले होते. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर २५ जून रोजी निकाल देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, बुधवारी प्रकाश आंबेडकर यांची याचिका फेटाळताना न्यायालयाचा वेळ वाया घालवला, असे निरीक्षणही नोंदवले आहे.



प्रकाश आंबेडकर यांच्यावतीने ७६ लाख मतदारांचा मुद्दा उपस्थित करत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, प्रकाश आंबेडकर यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याचिकाकर्ते आणि आमचा कालच्या कामकाजाचा वेळ वाया घातला, असे निरीक्षणही हायकोर्टाने निर्णय देताना नोंदवले आहे. त्यामुळे, गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या वादावर आता न्यायालयाने आपला निर्णय स्पष्टपणे दिला आहे.



न्यायालयाच्या निर्णयावर गुरुवारी मांडणार भूमिका


न्यायालयाने निर्णय दिला असून चेतन चंद्रकांत अहिरे यांची याचिका फेटाळली आहे. न्यायालयाकडून हा निकाल अपलोड झाल्यानंतर नेमकी याचिका फेटाळण्याचे कारण काय हे पाहता येईल. त्यानंतरच, मी माझी प्रतिक्रिया देईल असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. गुरुवारी, २६ जून रोजी सकाळी ११.३० वाजता मी मुंबईतील कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधणार आहे, अशी माहितीही आंबेडकर यांनी दिली.

Comments
Add Comment

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,

Panvel Karjat Local Train: पनवेल-कर्जत लोकल ट्रेन सुरु होणार; प्रवाशांचा वेळ वाचणार

मुंबई: पनवेल आणि कर्जत या दोन्ही स्थानकांना जोडणारा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. तसे पाहिले तर पनवेल आणि कर्जत