मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी एनएचआयला पत्र

व्हाईट टेपिंगच्या निकृष्ट कामामुळे अपघात


तलासरी : मुंबई-अहमदाबादबाद महामार्गांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, माती रस्त्यावर आली आहे, पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून यामुळे अनेक अपघात होत असून अजून होण्याची शक्यता असल्याने महामार्ग व्हाईट टेपिंगच्या निकृष्ट कामामुळे अपघात होत आहेत, याची दखल घेऊन तलासरी पोलिसांना महामार्गा वरील पूल व रस्त्यावरील खड्डे बुजावीण्यांसाठी महामार्ग प्राधिकरणाला पत्र दिले आहे तलासरी पोलीस स्टेशन हद्दीत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-४८ हा सुमारे २१ कि.मी.


गेलेला असुन आच्छाड ते धुंदलवाडी दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट कॉक्रिटीकरणाचे पैच/रॅम्प सोडण्यात आलेले आहेत. सध्या पावसाळयाला सुरुवात झालेली असुन मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-४८आच्छाड ते धुंदलवाडी पर्यंत महामार्गाची पाहणी केली असता नमुद ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघात होऊन, जिवीतहानी व गाडयांचे नुकसान होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्मान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


पोलिसांनी एनएचआयला लिहिलेल्या पत्रात आमगाव ब्रिज वर मुंबई चाहीनी व गुजरात वाहीनी या दोन्ही वाहीनीवर पडलेले खड्डे, मुंबई वाहीनीवर तलासरी पाडवीपाडा येथील कामेश्वर धाबा समोर पडलेले खड्डे सदर ठिकाणी सिमेंट कॉक्रिटीकरणाचे पेंच,रॅम्प असल्याने वारंवार अपघात होत आहेत.


जुने बीएसएनएल ऑफिस जवळुन सर्विस रोड तलासरी नाका पर्यंत पावसाचे पाणी येत असल्याने सदर पाणी येणार नाही या करीता उपाययोजना करणे. मुंबई बाजु जायका हॉटेल समोर खड्डे पडले असुन सदर ठिकाणी माती रस्त्यावर आल्याने एखादा अपघात होण्याची शक्याता नाकारता येत नाही. ह्या ठिकाणी दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्या आहेत.


खड्डे तत्काळ बुजविण्यात यावेत



महामार्गावर खड्डे दुरुस्तीचे व महामार्ग सुरक्षिततेचे काम शासनाने आपणास दिलेले आहे. त्याअर्थी महामार्गाच्या दुरुस्तीची व प्रवासांच्या सुरक्षिततेची जबाबदारी तुमचीच आहे महामार्गावरील रोड खचणे, रोलींग तुटुन अपघात होणे, ही शक्यता नाकारता येत नाही. सदर खड्डयांमुळे झालेल्या अपघातात एखादा दखलपात्र य अदखलपात्र अपराध होण्याची शक्यता आहे. तरी आपण सदर महामार्गावर पडलेले खड्डे तात्काळ बुजविण्यात यावेत. तसेच अपघात होणार नाहीत याबाबत योग्य त्या उपायोजना कराव्यात, असे नमूद केले आहे.


Comments
Add Comment

पाण्याच्या टाकीत मानवी हाडांचा सापळा

वसईच्या माणिकपूर गावातील घटना वसई : वसईच्या माणिकपूर येथील एका चाळीच्या रिकाम्या पाण्याच्या टाकीत पुरुषाच्या

अर्थसंकल्पातून पालघरसाठी विकासाची ‘महा-भेट’ : खासदार डॉ. सवरा

पालघर : केंद्रीय अर्थसंकल्पात पालघर जिल्ह्यासाठी विकासाचे नवीन दरवाजे उघडले आहेत. या बजेटमध्ये पालघरच्या

कोट्यवधींचा शिक्षण कर वसूल; शाळा हस्तांतरण मात्र रखडलेलेच

महापालिकेत शिक्षण समिती व सभापती नसण्याची परंपरा कायम राहणार गणेश पाटील विरार : महापालिकेची स्थापना होऊन १६

मुंबई-बडोदरा आणि भिवंडी-मनोर मार्गांचे काम युद्धपातळीवर

रस्त्यांच्या जाळ्यांमुळे विकासाची कोंडी फुटणार वसंत भोईर वाडा : गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेचा सामना

महापौरांना ७५ हजार रुपये वाहन प्रतिपूर्ती भत्ता

उपमहापौरांना ६५ हजार, तर विरोधी पक्षनेत्याला ५० हजार विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना

वसई-विरार महापालिकेत महापौर पदासाठी ७ अर्ज

उपमहापौर पदासाठी ५ अर्ज विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी शुक्रवारी अर्ज दाखल