मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी एनएचआयला पत्र

  30

व्हाईट टेपिंगच्या निकृष्ट कामामुळे अपघात


तलासरी : मुंबई-अहमदाबादबाद महामार्गांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, माती रस्त्यावर आली आहे, पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून यामुळे अनेक अपघात होत असून अजून होण्याची शक्यता असल्याने महामार्ग व्हाईट टेपिंगच्या निकृष्ट कामामुळे अपघात होत आहेत, याची दखल घेऊन तलासरी पोलिसांना महामार्गा वरील पूल व रस्त्यावरील खड्डे बुजावीण्यांसाठी महामार्ग प्राधिकरणाला पत्र दिले आहे तलासरी पोलीस स्टेशन हद्दीत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-४८ हा सुमारे २१ कि.मी.


गेलेला असुन आच्छाड ते धुंदलवाडी दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट कॉक्रिटीकरणाचे पैच/रॅम्प सोडण्यात आलेले आहेत. सध्या पावसाळयाला सुरुवात झालेली असुन मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-४८आच्छाड ते धुंदलवाडी पर्यंत महामार्गाची पाहणी केली असता नमुद ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघात होऊन, जिवीतहानी व गाडयांचे नुकसान होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्मान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


पोलिसांनी एनएचआयला लिहिलेल्या पत्रात आमगाव ब्रिज वर मुंबई चाहीनी व गुजरात वाहीनी या दोन्ही वाहीनीवर पडलेले खड्डे, मुंबई वाहीनीवर तलासरी पाडवीपाडा येथील कामेश्वर धाबा समोर पडलेले खड्डे सदर ठिकाणी सिमेंट कॉक्रिटीकरणाचे पेंच,रॅम्प असल्याने वारंवार अपघात होत आहेत.


जुने बीएसएनएल ऑफिस जवळुन सर्विस रोड तलासरी नाका पर्यंत पावसाचे पाणी येत असल्याने सदर पाणी येणार नाही या करीता उपाययोजना करणे. मुंबई बाजु जायका हॉटेल समोर खड्डे पडले असुन सदर ठिकाणी माती रस्त्यावर आल्याने एखादा अपघात होण्याची शक्याता नाकारता येत नाही. ह्या ठिकाणी दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्या आहेत.


खड्डे तत्काळ बुजविण्यात यावेत



महामार्गावर खड्डे दुरुस्तीचे व महामार्ग सुरक्षिततेचे काम शासनाने आपणास दिलेले आहे. त्याअर्थी महामार्गाच्या दुरुस्तीची व प्रवासांच्या सुरक्षिततेची जबाबदारी तुमचीच आहे महामार्गावरील रोड खचणे, रोलींग तुटुन अपघात होणे, ही शक्यता नाकारता येत नाही. सदर खड्डयांमुळे झालेल्या अपघातात एखादा दखलपात्र य अदखलपात्र अपराध होण्याची शक्यता आहे. तरी आपण सदर महामार्गावर पडलेले खड्डे तात्काळ बुजविण्यात यावेत. तसेच अपघात होणार नाहीत याबाबत योग्य त्या उपायोजना कराव्यात, असे नमूद केले आहे.


Comments
Add Comment

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प अडचणीत?

सफाळे: पालघर जिल्ह्यातील मांडे ग्रामपंचायत हद्दीत मुंबई-अहमदाबाद अतिजलद (बुलेट ट्रेन) प्रकल्पाचे काम वेगाने

सुविधा, लाभकरांसाठी ‘मुहूर्त’ सापडेना !

नागरिकांमध्ये मात्र संभ्रम कायम विरार : वसई-विरार शहर पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी पालिका क्षेत्रात

पुढील दोन आठवडे सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज

भात रोपांची पेरणी लवकर पूर्ण करून घेण्याचा सल्ला पालघर : पालघर जिल्ह्यात १६ जून रोजी नैऋत्य मोसमी पावसाने जोरदार

चला... विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला!

पालघर: आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाण्याकरिता एसटी प्रशासनाकडून राज्यात

आदिवासी विद्यार्थ्यांना २४ कोटींची शिष्यवृत्ती

४२ हजार विद्यार्थ्यांना मिळाला लाभ पालघर: पालघर जिल्ह्यातील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या ४२ हजार ४३६ आदिवासी

तरुणीच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद

विरार : वसई येथील २० वर्षीय तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळेच दीड