मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कुडाळ गावातील माणगाव खोऱ्यात दुचाकीस्वार वाहून गेल्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचं वातारण आहे. अमित धुरी वाहून गेलेल्या तरुणाचं नाव असून त्याच्या सोबत प्रवास करणारा सहकारी सखाराम कानडे हा सुदैवाने बचावला आहे. सदरची घटना रात्री ९ वाजता घडल्यामुळे अनेक तासांपासून एनडीआरएफ पथकाकडून तुरुणाचा शोध सुरु आहे. सोमवारी रत्नागिरीसह इतर भागात पावासाचा जोर वाढला होता.


तसेच वसोली - कुत्रेकोंड कॉजवेवर मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. याच दरम्यान माणगावहून शिवापूरकडे मोटरसायकलने जात असलेले अमित धुरी आणि सखाराम कोनडे यांना कॉजववेरील पाण्याचा अंदाज आला नसल्यामुळे, पाण्यातून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे मोटारसायकल खाली ओढली गेली. यात अमित धुरी पुलाखाली वाहून गेला.


सखाराम कानडे याने तातडीने आरडाओरड करायला सुरवात केली. परंतू रात्रीच्या वेळी कोणत्याही स्थानिक व्यक्तीने प्रतिसाद दिला नाही. असा वेळी सखारामने काही अंतरावर असलेल्या  दुकानात धाव घेतली आणि झालेली घटना ग्रामस्थांना सांगितली.  त्यामुळे धक्कादायक घटना ऐकल्यानंतर ग्रामस्थांनी आपत्कालीन यंत्रणेशी संपर्क साधला अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.  काही दिवसांपूर्वीच त्याच ठिकाणी वयवृद्ध व्यक्तीला पुरातून वाचवण्यात यश आले होते.


एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती...


तरुण वाहून गेल्याची माहिती कळताचं  आम्ही घटनास्थळी धाव घेतली.  परंतू शोधमोहीम करताना मोठे झाडे - झुडपे आणि पाण्याच्या वेगामुळे अडथळे येत असल्याची माहिती यादव यांनी दिली. बोटी आणि इतर साहित्यांचा वापर करुन देखील अद्यापही तरुणाला शोधण्यास यश आले नाही. ग्रामस्थांच्या मदतीने आणखीण किती काळ शोधमोहीम करावी लागेल याची अद्यापही माहिती नाही. अशी माहिती एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी दिली.


Comments
Add Comment

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.