धक्कादायक ! रेल्वे अपघातात ७२००० जणांचा गेला जीव, माहिती अधिकारातून आकडेवारी स्पष्ट...

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी अशी ओळख असणाऱ्या रेल्वेची धक्कादायक माहिती समोर आली. आतापर्यंत रेल्वे अपघातात ७२००० जणांचा जीव गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यातील १५०० मृत्यूदेह बेवारस असल्याची माहिती, माहिती अधिकारातून स्पष्ट झाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा,कर्जत, चर्चगेट ते विरार,डहाणू रोड, सीएसएमटी ते वाशी, पनवेल अशा सर्व मार्गावरील हे अपघाती  मृत्यू आहेत. मुंबईतील प्रसिध्द डाॅक्टर सुरोश मेहता यांनी माहिती अधिकारातून रेल्वेरुळांवरील अपघात, बेवारस मृतदेह, यांची माहिती मागवली होती.

यापूर्वी  रेल्वेचा रुळ ओलंडताना २००२ ते २०२४ दरम्यान ७२ हजार ५२४ रेल्वे पोलिसांच्याकडे अपघाती रेल्वे मृत्यूची नोंद आहे, त्यातील २००९ ते २०२४ या वर्षात १४००० हून अधिक मृतदेहांची ओळख पटलेली नसल्याने ते बेवारस स्थितीत होते. अशी बाब माहिती अधिकाऱ्यातून स्पष्ट झाली.  रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या लोकांची ओळख पटवणे अशक्य आहे.

त्यातील बरेच मृतदेह  विच्छिन्न अवस्थेत असतात. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे अवघड आहे. रेल्वे अपघातात मृत्यू पडलेल्या प्रवाशांच्याकडे कोणतेही वस्तू सापडत नाही. तसेच ज्या मृतदेहाची ओळख पटली तर त्यांच्या नातेवाईकांपर्यंत मृतदेह पोहचवता येत नाही. अशी रेल्वे पोलिसांनी माहिती दिली.तसेच ज्या रेल्वे अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.त्यांचा मृत्यूदेह शवगृहात एक महिना ठेवला जातो. रेल्वे पोलिस खात्याअंतर्गत त्याच्या नातेवाईकाने हरवलेली व्यक्तीची कोणत्याही पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली का ? याचा देखील तपशील तपासाला जातो.

रेल्वे अपघातातील आकडेवारी माहिती अधिकारातून स्पष्ट - 

रेल्वे रूळ ओलांडताना ४३,४२८
धावत्या लोकलमधून पडणे १४,३९६
अन्य १३,९४१
रेल्वे खांबाला धडक ४५६
फलाट आणि पायदान यांच्या पोकळीत पडून ३०३
एकूण ७२,५२४

पाच वर्षांतील बेवारस मृतांची संख्या

वर्ष बेवारस मृतदेह आप्त-नातेवाइकांना परत देण्यात आलेले मृतदेह
२०२० ---८२८ ---२८८
२०२१ ---१२७९ ---४७३
२०२२ ---१८१८ ---६८९
२०२३ ---१८७२ ---७१८
२०२४ ---१८६४ ---६०४

 

 

 

 

 
Comments
Add Comment

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक

खोल समुद्रातील मासेमारीसाठी १४ सहकारी संस्थांना अद्ययावत समुद्री नौका

गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सोमवारी वितरण मुंबई : महाराष्ट्रातील मच्छिमार सहकारी संस्थांसाठी २००

मुंबई मेट्रो ३ मध्ये 'उतरण्यासाठी' जिना नाही; प्रवाशांना त्रास

मुंबई : मुंबईच्या नवीन मेट्रो लाईन ३ (Aqua Line) च्या मेट्रो स्टेशनवर खाली उतरण्यासाठी सरकते जिने (Escalators) नाहीत. ऑक्टोबर