पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना ५ दिवसांची एनआयए कोठडी

जम्मू : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात राष्ट्रीय तपास संस्था अर्थातच एनआयएला रविवारी मोठे यश मिळाले होते. पहलगाम दहशतवादी हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत आणि


आश्रय दिल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास संस्थेने दोघांना अटक केली होती. सोमवारी एनआयएने या दोन्ही आरोपींना जम्मूच्या सत्र न्यायालयात रिमांडसाठी हजर केले.


जम्मूच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश रितेश कुमार दुबे यांच्या न्यायालयात दोन्ही आरोपींना हजर करण्यात आले. यानंतर पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना मदत आणि आश्रय दिल्याबद्दल अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पाच दिवसांसाठी एनआयएच्या कोठडीत पाठवले आहे.


रविवारी पहालगाममधील बटकोट येथील रहिवासी परवेझ अहमद जोथर आणि पहलगाममधील हिल पार्क येथील रहिवासी बशीर अहमद जोथर यांना एनआयएने अटक केली होती.

Comments
Add Comment

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या