पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना ५ दिवसांची एनआयए कोठडी

जम्मू : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात राष्ट्रीय तपास संस्था अर्थातच एनआयएला रविवारी मोठे यश मिळाले होते. पहलगाम दहशतवादी हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत आणि


आश्रय दिल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास संस्थेने दोघांना अटक केली होती. सोमवारी एनआयएने या दोन्ही आरोपींना जम्मूच्या सत्र न्यायालयात रिमांडसाठी हजर केले.


जम्मूच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश रितेश कुमार दुबे यांच्या न्यायालयात दोन्ही आरोपींना हजर करण्यात आले. यानंतर पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना मदत आणि आश्रय दिल्याबद्दल अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पाच दिवसांसाठी एनआयएच्या कोठडीत पाठवले आहे.


रविवारी पहालगाममधील बटकोट येथील रहिवासी परवेझ अहमद जोथर आणि पहलगाममधील हिल पार्क येथील रहिवासी बशीर अहमद जोथर यांना एनआयएने अटक केली होती.

Comments
Add Comment

Ramdas Athawale: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार पदाची केली हॅट्ट्रिक

मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची तिस-यांदा

Delhi: हातात पुष्पगुच्छ घेऊन थेट शिरला विधानसभेत, अध्यक्षांच्या गाडीजवळ फुलांचा गुच्छ ठेवला अन्...

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेत सुरक्षेचा मोठा भंग झाल्याचे वृत्त आहे. एका वाहनाने बॅरियर तोडून गेट क्रमांक २ मधून

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

Crime News : पाटण्यात माणुसकीला काळीमा; सख्ख्या काकाकडूनच ३ वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार

पाटणा : बिहारची राजधानी पाटणामध्ये नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परसा बाजार

Ladakh: लिलावात २५ हजार रुपयांना विकले गेले १० रुपये किमतीचे अंडे; इराणी पीडितांसाठीचा अनोखा उपक्रम चर्चेत

नवी दिल्ली: लडाखमधील लेह जिल्ह्यातील लोक इराणच्या लोकांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. युद्धाच्या काळात

Delhi: पार्किंगवरून महिला उपनिरीक्षक आणि वृद्ध व्यक्तीमध्ये वाद, पोलिसांनी काय कारवाई केली?

दिल्ली: दिल्लीतील उत्तर रोहिणी परिसरात पोलीस आणि नागरिकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. मिळालेल्या