धक्कादायक! पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी नाडियामध्ये बॉम्बस्फोटात ९ वर्षीय मुलीचा मृत्यू

  44

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुन्हेगारांवर कडक कारवाईचे दिले आश्वासन


कोलकाता : पश्चिम बंगालच्या नाडिया जिल्ह्यात सोमवारी एका धक्कादायक घटनेत ९ वर्षीय मुलीचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाला. कालीगंज विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी हा दुर्दैवी बॉम्बस्फोट झाला आहे.


कालीगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील या भागात दुपारच्या सुमारास बॉम्बस्फोट झाला, ज्यामध्ये या निरपराध मुलीला जीव गमवावा लागला.


पोलिसांच्या म्हणण्यानुसार, "मुलीला बॉम्बने जबर दुखापत झाल्या होत्या. हा स्फोट कालीगंज विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी घडला."



मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेवर तीव्र धक्का व्यक्त करत एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट केले: "बारोचंदगर येथील स्फोटात एका मुलीचा मृत्यू झाल्याने मला धक्का बसला आहे आणि मनापासून दुःखी आहे. या दुःखाच्या वेळी माझी प्रार्थना आणि विचार त्यांच्या कुटुंबासोबत आहेत." त्यांनी पुढे म्हटलेय की, "पोलिस लवकरात लवकर गुन्हेगारांवर कडक आणि निर्णायक कायदेशीर कारवाई करेल."


पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. स्फोटाच्या कारणांची तपासणी सुरू आहे. या प्रकरणी सखोल चौकशी केली जात आहे


हा स्फोट कालीगंज विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी घडला असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


मतमोजणी केंद्राजवळ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते, परंतु या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


या निरपराध मुलीच्या मृत्यूने संपूर्ण राज्यात दुःखाची लाट पसरली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कडक कारवाईचे आश्वासन दिले असून, पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

Comments
Add Comment

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना ५ दिवसांची एनआयए कोठडी

जम्मू : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात राष्ट्रीय तपास संस्था अर्थातच

जम्मूला जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान लँडिंग न करताच दिल्लीला परतले, कारण...

नवी दिल्ली: श्रीनगरला जम्मूमार्गे जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान आयएक्स-२५६४ सोमवारी दिल्लीला माघारी

राजा रघुवंशी हत्येला नवे वळण : हत्येपूर्वी सुरू केली होती कंपनी

शिलॉन्ग : राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे , हत्येच्या आधी दोघांनी मिळून कंपनी सुरू केली

Fact Check: इराणवर हल्ल्यासाठी अमेरिकेकडून भारतीय एअरस्पेसचा वापर? भारताने फेटाळला दावा

भारताने फेटाळला दावा नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या इराण आणि इस्त्रायलच्या वादात आता

युद्धनौका ‘तामाल’ नौदलात दाखल होणार

नवी दिल्ली : रशियाच्या कॅलिनिनग्रांड येथे १ जुलै २०२५ रोजी आयोजित समारंभात तमाल युद्धनौका भारतीय नौदलाच्या

पावसाळ्यातही सुरू राहिल नक्षलविरोधी मोहिम- अमित शाह

रायपूर : नक्षलवादी पावसाळ्यात घनदाट जंगलात लपून बसतात. परंतु, यंदा पावसाळ्यातही नक्षलवाद्यांच्या विरोधातील