धक्कादायक! पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी नाडियामध्ये बॉम्बस्फोटात ९ वर्षीय मुलीचा मृत्यू

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुन्हेगारांवर कडक कारवाईचे दिले आश्वासन


कोलकाता : पश्चिम बंगालच्या नाडिया जिल्ह्यात सोमवारी एका धक्कादायक घटनेत ९ वर्षीय मुलीचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाला. कालीगंज विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी हा दुर्दैवी बॉम्बस्फोट झाला आहे.


कालीगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील या भागात दुपारच्या सुमारास बॉम्बस्फोट झाला, ज्यामध्ये या निरपराध मुलीला जीव गमवावा लागला.


पोलिसांच्या म्हणण्यानुसार, "मुलीला बॉम्बने जबर दुखापत झाल्या होत्या. हा स्फोट कालीगंज विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी घडला."



मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेवर तीव्र धक्का व्यक्त करत एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट केले: "बारोचंदगर येथील स्फोटात एका मुलीचा मृत्यू झाल्याने मला धक्का बसला आहे आणि मनापासून दुःखी आहे. या दुःखाच्या वेळी माझी प्रार्थना आणि विचार त्यांच्या कुटुंबासोबत आहेत." त्यांनी पुढे म्हटलेय की, "पोलिस लवकरात लवकर गुन्हेगारांवर कडक आणि निर्णायक कायदेशीर कारवाई करेल."


पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. स्फोटाच्या कारणांची तपासणी सुरू आहे. या प्रकरणी सखोल चौकशी केली जात आहे


हा स्फोट कालीगंज विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी घडला असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


मतमोजणी केंद्राजवळ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते, परंतु या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


या निरपराध मुलीच्या मृत्यूने संपूर्ण राज्यात दुःखाची लाट पसरली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कडक कारवाईचे आश्वासन दिले असून, पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

Comments
Add Comment

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या