राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये

निवडणूक आयोग लवकरच जारी करणार वेळापत्रक


मुंबई : राज्यात आगामी ऑक्टोबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका वेगवेगळ्या होतील. या निवडणुकांच्या अनुषंगाने निवडणूक आयोग लवकरच वेळापत्रक जारी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 टप्प्यांमध्ये होणार आहेत. ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच मतदानाला सुरुवात होणार आहे. राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, आदींच्या निवडणुका कोरोना संसर्गा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून पुढे ढकलण्यात आल्या होत्या.


बीसी आरक्षण द्यायचे की नाही यावरसुद्धा बराच गदारोळ झाला. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर न राज्यात कुठे एकदा तर कुठे दोनदा, तीनदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी करण्यात आली होती. पण, या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. दरम्यान, जिल्हा परिषद, महानगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने 6 मे 2025 रोजी निर्णय दिला. ओबीसींना 2022 पूर्वी असलेले आरक्षण कायम ठेवून सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला 4 महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले. निवडणुकांसदर्भातील अधिसूचना 4 आठवड्यांत काढण्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले होते.

Comments
Add Comment

आस्थापन खर्च कमी करण्यासाठी पदे रिक्त ठेवू नका

स्थायी समिती अध्यक्षांनी दिले पालिका प्रशासनाला निर्देश मुंबई : मुंबई महापालिकेत मागील चार वर्षांमध्ये

पश्चिम आशियातील युद्धाचा साखर उद्योगाला फटका

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा भडका आता देशातील साखर उद्योगापर्यंत

महाराष्ट्राचा हरित निर्देशांक सुधारला

मुंबई : औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीचा वेग कायम राखतानाच महाराष्ट्र राज्याने पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रातही

NSE पाठोपाठ BSE आता BKC मध्ये येणार

मुंबई : वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) मध्ये व्यावसायिक जागेची मागणी प्रचंड वाढत असताना, बीएसईने मुंबईत विस्तार

आनंदाची बातमी, मुंबईचे ससून बंदर होणार 'ग्लोबल'

जगातील सर्वोत्तम बंदर बनविण्याचा मंत्री नितेश राणे यांचा संकल्प; फिनलंडच्या मदतीने कायापालट करणार मुंबई :

'फडणवीस सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पाळले, उद्धव सरकारने शेतकऱ्यांना कवडीचीही मदत दिली नव्हती'

मुंबई : अर्थसंकल्प आणि शेती यातील शून्य ज्ञान असलेले संजय राऊत शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पावर टीका करत