Pandharpur Wari : वारकऱ्यांचं जेवणाचं मॅनेजमेंट कसं असतं?

कशी केली जाते खाणपानची तयारी?


काही जणी कणिक मळतात. कुणी ​ चपात्या लाट​तय. कोण भाजी निवडतयं​, असं चित्र तुम्हाला वारीच्या मुक्कांमी असलेल्या तंबूत दिसतयं. आपापल्या दिंडीमधल्या वारकऱ्यांसाठी दिंडीप्रमुखांनी अचूक नियोजन केलेलं असतं. लाखो वैष्णावात कोणीही उपाशी राहत नाही. कारण स्वयंपाक साहित्य ट्रक सोबत असतं. ​मुक्कामा स्थळी वारकरी पोहोचण्यासाठी जेवण म्हणजे खाण्या पिण्याची ​आधीच तयारी करून ठेवलेली असते.



वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय आणि शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला संप्रदाय आहे. वारकरी म्हणजे नित्यनियमाने वारी करणारा भक्त. ​राज्याच्या कानाकोपऱ्यांतून वारकरी आपल्या पालख्यासह आळंदी ते पंढरपूर पायी चालत आहेत. भर पावसात चालणाऱ्या वारकऱ्यांच्या जेवणाची कशी होते व्यवस्था? याबद्दल अनेकांना कुतूहल असतं. प्रत्येक मार्गावर अंदाजे २०० दिंड्या ​ असतात​. ज्यात ४००-५०० ट्रक असतात. मिरवणुकीच्या मध्यभागी मुख्य पालखी असते, प्रत्येक गटाचा एक निश्चित क्रमांक आणि क्रम असतो जो काटेकोरपणे पाळला जातो.



प्रत्येक गटाकडे एक ट्रक असतो जिथे त्यांचे सामान आणि अन्न साहित्य ठेवले जाते. पहाटेच्या वेळी या ट्रकना शांतपणे बाहेर पडावे लागते... लवकर झोपणे आणि लवकर उठणे, हे त्यांच्यासाठी गुप्त ऊर्जा सूत्र ​असतं. ​​तंबूमध्ये मुक्काम करणाऱ्या वारकऱ्यांना पहाटे तीनच्या सुमारास उठावे लागते. लवकर उठून, तंबू पाडून, सर्व सामान भरून ट्रक पुढे पाठवले जातात. ​या ट्रक किंवा ट्रेम्पोमध्ये ​ दिंडीप्रमुख स्वतःचा​ जीवनावश्यक साठा सोबत ​ठेवतात. त्यामध्ये गहू, तांदूळ, डाळ, मसाले, तेल​ या गोष्टींचा समावेश असतो.



वारीतील खानपान व्यवस्थेचे स्वरूप​ कसं असतं ते पाहूया



  • प्रत्येक दिंडी आपल्या वारकऱ्यांसाठी जेवण, निवास आणि इतर आवश्यक सोयींची व्यवस्था करते.

  • ज्या गावात वारीतील दिंड्या मुक्काम करतात, त्या गावचे लोक वारकऱ्यांसाठी जेवण, पाणी आणि इतर सोयी पुरवतात.

  • वारीच्या मार्गावर अनेक ठिकाणी स्वयंपाकासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. तिथे वारकरी स्वतःचे जेवण बनवतात किंवा स्थानिक लोक जेवण बनवून देतात.

  • अनेक ठिकाणी वारकऱ्यांसाठी प्रसाद​ म्हणजे ​जेवणाची​ व्यवस्था केलेली असते. तिथे वारकऱ्यांना फराळ किंवा जेवण दिले जाते.

  • वारीतील खानपान व्यवस्था ही एक सामुदायिक जबाबदारी आहे. दिंडी, स्थानिक लोक आणि वारकरी मिळून ही व्यवस्था यशस्वीपणे पार पाडतात.

  • वारीमध्ये सहभागी होणारे सर्व वारकरी आनंदाने आणि उत्साहाने वारीचा आनंद घेतात.

Comments
Add Comment

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ