Pandharpur Wari : वारकऱ्यांचं जेवणाचं मॅनेजमेंट कसं असतं?

कशी केली जाते खाणपानची तयारी?


काही जणी कणिक मळतात. कुणी ​ चपात्या लाट​तय. कोण भाजी निवडतयं​, असं चित्र तुम्हाला वारीच्या मुक्कांमी असलेल्या तंबूत दिसतयं. आपापल्या दिंडीमधल्या वारकऱ्यांसाठी दिंडीप्रमुखांनी अचूक नियोजन केलेलं असतं. लाखो वैष्णावात कोणीही उपाशी राहत नाही. कारण स्वयंपाक साहित्य ट्रक सोबत असतं. ​मुक्कामा स्थळी वारकरी पोहोचण्यासाठी जेवण म्हणजे खाण्या पिण्याची ​आधीच तयारी करून ठेवलेली असते.



वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय आणि शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला संप्रदाय आहे. वारकरी म्हणजे नित्यनियमाने वारी करणारा भक्त. ​राज्याच्या कानाकोपऱ्यांतून वारकरी आपल्या पालख्यासह आळंदी ते पंढरपूर पायी चालत आहेत. भर पावसात चालणाऱ्या वारकऱ्यांच्या जेवणाची कशी होते व्यवस्था? याबद्दल अनेकांना कुतूहल असतं. प्रत्येक मार्गावर अंदाजे २०० दिंड्या ​ असतात​. ज्यात ४००-५०० ट्रक असतात. मिरवणुकीच्या मध्यभागी मुख्य पालखी असते, प्रत्येक गटाचा एक निश्चित क्रमांक आणि क्रम असतो जो काटेकोरपणे पाळला जातो.



प्रत्येक गटाकडे एक ट्रक असतो जिथे त्यांचे सामान आणि अन्न साहित्य ठेवले जाते. पहाटेच्या वेळी या ट्रकना शांतपणे बाहेर पडावे लागते... लवकर झोपणे आणि लवकर उठणे, हे त्यांच्यासाठी गुप्त ऊर्जा सूत्र ​असतं. ​​तंबूमध्ये मुक्काम करणाऱ्या वारकऱ्यांना पहाटे तीनच्या सुमारास उठावे लागते. लवकर उठून, तंबू पाडून, सर्व सामान भरून ट्रक पुढे पाठवले जातात. ​या ट्रक किंवा ट्रेम्पोमध्ये ​ दिंडीप्रमुख स्वतःचा​ जीवनावश्यक साठा सोबत ​ठेवतात. त्यामध्ये गहू, तांदूळ, डाळ, मसाले, तेल​ या गोष्टींचा समावेश असतो.



वारीतील खानपान व्यवस्थेचे स्वरूप​ कसं असतं ते पाहूया



  • प्रत्येक दिंडी आपल्या वारकऱ्यांसाठी जेवण, निवास आणि इतर आवश्यक सोयींची व्यवस्था करते.

  • ज्या गावात वारीतील दिंड्या मुक्काम करतात, त्या गावचे लोक वारकऱ्यांसाठी जेवण, पाणी आणि इतर सोयी पुरवतात.

  • वारीच्या मार्गावर अनेक ठिकाणी स्वयंपाकासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. तिथे वारकरी स्वतःचे जेवण बनवतात किंवा स्थानिक लोक जेवण बनवून देतात.

  • अनेक ठिकाणी वारकऱ्यांसाठी प्रसाद​ म्हणजे ​जेवणाची​ व्यवस्था केलेली असते. तिथे वारकऱ्यांना फराळ किंवा जेवण दिले जाते.

  • वारीतील खानपान व्यवस्था ही एक सामुदायिक जबाबदारी आहे. दिंडी, स्थानिक लोक आणि वारकरी मिळून ही व्यवस्था यशस्वीपणे पार पाडतात.

  • वारीमध्ये सहभागी होणारे सर्व वारकरी आनंदाने आणि उत्साहाने वारीचा आनंद घेतात.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी