शिर्डीतील साईंच्या व्हीआयपी दर्शनाला ब्रेक

सामान्य भाविकांना मोकळे साईदर्शन


शिर्डी : शिर्डी येथील श्री साई संस्थान मंडळाच्या तदर्थ समितीने भाविकांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे.आता कोणत्याही महत्त्वाच्या व्यक्तींच्या ( व्हीआयपी ) दर्शनासाठी ठरावीक 'ब्रेक दर्शन' वेळापत्रक लागू केलं जाणार असून त्याव्यतिरिक्त समाधी मंदिरातील दर्शन रांगेत अडथळा होणार नाही, अशी माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.



दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून अतिमहत्त्वाच्या पाहुण्यांच्या ( व्हीआयपी ) अचानक येण्याने सर्वसामान्य साईभक्तांच्या दर्शन रांगेत वारंवार व्यत्यय येत होता. आता ही मनमानी बंद होणार असून ठराविक वेळेतच व्हीआयपी दर्शन होणार आहे. साईसंस्थानने जाहीर केलेल्या नव्या नियमांनुसार, शिफारस पत्र घेऊन येणाऱ्या व्हीआयपी भाविकांसाठी दिवसभरात अडीच तास राखीव ठेवण्यात आले आहे. या राखीव वेळेतच त्यांना पाच घेऊन दर्शन मिळणार आहे त्यामुळे सर्वसामान्य भाविकांची दर्शना बिना अडथळा दिवसभर सुरू राहील. अति महत्त्वाच्या व मोठे दान देणाऱ्या साई भक्तांना मात्र या नियमातून सूट देण्यात आली आहे.


सकाळी ९ ते १०, दुपारी २;३० ते ३:३०, रात्री ८ ते ८:३०, ही 'ब्रेक दर्शन' व्यवस्था समाधी मंदिराच्या एका बाजूने केली जाणार असून त्यामुळे सामान्य दर्शनरांग थांबणार नाही आणि अन्य भक्तांची गैरसोय होणार नाही, असं संस्थानच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.


अतिमहत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच दर्शनाची मुभा राहणार आहे. यामध्ये भारताचे आजी-माजी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान, सर्व राज्यांचे राज्यपाल, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश आणि न्यायमूर्ती, लोकसभा अध्यक्ष/उपाध्यक्ष, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार,१ लाख किंवा त्याहून अधिक देणगी देणारे साईभक्त, नामवंत उद्योगपती, आंतरराष्ट्रीय खेळाडू, सिनेअभिनेते, शास्त्रज्ञ, संस्थानचे आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचा समावेश असणार आहे.

Comments
Add Comment

भव्य राष्ट्रध्वज नागपूरच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल - मुख्यमंत्री फडणवीस

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली याचा प्रत्येक

Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी २२,१८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

- त्र्यंबक-नाशिकचा कुंभमेळा जगाला आकर्षण वाटणारा असावा - मुख्यमंत्री फडणवीस त्र्यंबक - नाशिक मध्ये सिंहस्थ

धामणगाव गढी परिसरात चक्क अस्वलाचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव गढी परिसरात अस्वलाचा मुक्त संचार आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

युद्धामुळे वाढली शेणाच्या गोवऱ्यांची किंमत

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता इंधन पुरवठ्यावरही दिसू लागले आहेत. इराण,

उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना दिलासा: मुंबई, पुणे, सोलापूरसह अनेक मार्गांवर उन्हाळी धावणार स्पेशल ट्रेन

पुणे : उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच सुट्टीचे दिवस, वर्षभर अभ्यास करून दमलेल्या मुलांच्या उन्हाळ्यात परीक्षा संपतात

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष