Abu Azami Wari Controversy: 'हिंदू सण रस्ता अडवतात, पण आम्ही गप्प राहतो', पंढरपूर यात्रेवर अबू आझमीचे वादग्रस्त विधान

  63

सोलापूर: महाराष्ट्रात वारकऱ्यांच्या पालखी सोहळा सुरू असताना समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azami) यांनी पंढरपूर यात्रेबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे. हिंदूंचे सण साजरे केले जातात तेव्हा मुस्लिम व्यक्ती विरोध करत नाहीत. मात्र मुस्लिमांनी नमाज केल्यावर तक्रारी केल्या जातात असं विधान आझमी यांनी केले आहे.



नेमके काय म्हणाले अबू आझमी?


समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी म्हणाले, "वारीमुळे रस्ते जाम होतात. जेव्हा हिंदू सण साजरे केले जातात तेव्हा मुस्लिम कधीही विरोध करत नाहीत, परंतु जेव्हा मुस्लिम नमाज पठण करतात तेव्हा तक्रारी केल्या जातात. आम्ही नेहमीच हिंदू बांधवांसोबत खांद्याला खांदा लावून चालतो. आजपर्यंत कोणत्याही मुस्लिमाने हिंदू सणांमुळे रस्ता बंद असल्याची तक्रार केलेली नाही, परंतु जेव्हा मशिदीत नमाज पठण केले जाते तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात की जर बाहेर नमाज पठण केले तर पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले जातील.".  ते पुढे म्हणाले की, "आज मी सोलापूरला येत असताना मला सांगण्यात आले की पालखी येणार आहे, लवकर निघा, नाहीतर रस्ता जाम होईल. वारीमुळे वाहतूक कोंडी होते पण आम्ही कधीही विरोध केला नाही. मुस्लिमांसाठी जमीन जाणूनबुजून दिली जात नाही". समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी रविवारी सकाळी सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांनी हे वरील विधान केले. 


नमाज पठणामुळे होणाऱ्या गर्दीची तुलना वारीशी केल्यामुळे, महाराष्ट्रातील लाखों वारकरी आणि विठ्ठल भक्तांचा रोष त्यांना पत्करावा लागणार असून, या प्रकरणावर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पालख्या पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ


संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी सध्या पुण्याहून पंढरपूरकडे रवाना होत आहे. अशा परिस्थितीत, अबू आझमी यांच्या या विधानामुळे राजकीय वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. पंढरपूर वारी ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी आणि श्रद्धेशी संबंधित वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे, ज्यामध्ये लाखो संख्येने भाविक संतांच्या पालख्यांसह पंढरपुरी पायी प्रवास करतात.

Comments
Add Comment

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

Daund Yawat Tension: ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १७ जणांना अटक, कलम १६३ लागू...

पुण्यातील जातीय हिंसाचारावर कारवाई पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवत गावात शुक्रवारी एका सोशल मीडिया

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार

पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी, रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे : पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन अमली पदार्थ जप्त केले. या