Abu Azami Wari Controversy: 'हिंदू सण रस्ता अडवतात, पण आम्ही गप्प राहतो', पंढरपूर यात्रेवर अबू आझमीचे वादग्रस्त विधान

  70

सोलापूर: महाराष्ट्रात वारकऱ्यांच्या पालखी सोहळा सुरू असताना समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azami) यांनी पंढरपूर यात्रेबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे. हिंदूंचे सण साजरे केले जातात तेव्हा मुस्लिम व्यक्ती विरोध करत नाहीत. मात्र मुस्लिमांनी नमाज केल्यावर तक्रारी केल्या जातात असं विधान आझमी यांनी केले आहे.



नेमके काय म्हणाले अबू आझमी?


समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी म्हणाले, "वारीमुळे रस्ते जाम होतात. जेव्हा हिंदू सण साजरे केले जातात तेव्हा मुस्लिम कधीही विरोध करत नाहीत, परंतु जेव्हा मुस्लिम नमाज पठण करतात तेव्हा तक्रारी केल्या जातात. आम्ही नेहमीच हिंदू बांधवांसोबत खांद्याला खांदा लावून चालतो. आजपर्यंत कोणत्याही मुस्लिमाने हिंदू सणांमुळे रस्ता बंद असल्याची तक्रार केलेली नाही, परंतु जेव्हा मशिदीत नमाज पठण केले जाते तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात की जर बाहेर नमाज पठण केले तर पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले जातील.".  ते पुढे म्हणाले की, "आज मी सोलापूरला येत असताना मला सांगण्यात आले की पालखी येणार आहे, लवकर निघा, नाहीतर रस्ता जाम होईल. वारीमुळे वाहतूक कोंडी होते पण आम्ही कधीही विरोध केला नाही. मुस्लिमांसाठी जमीन जाणूनबुजून दिली जात नाही". समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी रविवारी सकाळी सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांनी हे वरील विधान केले. 


नमाज पठणामुळे होणाऱ्या गर्दीची तुलना वारीशी केल्यामुळे, महाराष्ट्रातील लाखों वारकरी आणि विठ्ठल भक्तांचा रोष त्यांना पत्करावा लागणार असून, या प्रकरणावर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पालख्या पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ


संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी सध्या पुण्याहून पंढरपूरकडे रवाना होत आहे. अशा परिस्थितीत, अबू आझमी यांच्या या विधानामुळे राजकीय वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. पंढरपूर वारी ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी आणि श्रद्धेशी संबंधित वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे, ज्यामध्ये लाखो संख्येने भाविक संतांच्या पालख्यांसह पंढरपुरी पायी प्रवास करतात.

Comments
Add Comment

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल