Abu Azami Wari Controversy: 'हिंदू सण रस्ता अडवतात, पण आम्ही गप्प राहतो', पंढरपूर यात्रेवर अबू आझमीचे वादग्रस्त विधान

  33

सोलापूर: महाराष्ट्रात वारकऱ्यांच्या पालखी सोहळा सुरू असताना समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azami) यांनी पंढरपूर यात्रेबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे. हिंदूंचे सण साजरे केले जातात तेव्हा मुस्लिम व्यक्ती विरोध करत नाहीत. मात्र मुस्लिमांनी नमाज केल्यावर तक्रारी केल्या जातात असं विधान आझमी यांनी केले आहे.



नेमके काय म्हणाले अबू आझमी?


समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी म्हणाले, "वारीमुळे रस्ते जाम होतात. जेव्हा हिंदू सण साजरे केले जातात तेव्हा मुस्लिम कधीही विरोध करत नाहीत, परंतु जेव्हा मुस्लिम नमाज पठण करतात तेव्हा तक्रारी केल्या जातात. आम्ही नेहमीच हिंदू बांधवांसोबत खांद्याला खांदा लावून चालतो. आजपर्यंत कोणत्याही मुस्लिमाने हिंदू सणांमुळे रस्ता बंद असल्याची तक्रार केलेली नाही, परंतु जेव्हा मशिदीत नमाज पठण केले जाते तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात की जर बाहेर नमाज पठण केले तर पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले जातील.".  ते पुढे म्हणाले की, "आज मी सोलापूरला येत असताना मला सांगण्यात आले की पालखी येणार आहे, लवकर निघा, नाहीतर रस्ता जाम होईल. वारीमुळे वाहतूक कोंडी होते पण आम्ही कधीही विरोध केला नाही. मुस्लिमांसाठी जमीन जाणूनबुजून दिली जात नाही". समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी रविवारी सकाळी सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांनी हे वरील विधान केले. 


नमाज पठणामुळे होणाऱ्या गर्दीची तुलना वारीशी केल्यामुळे, महाराष्ट्रातील लाखों वारकरी आणि विठ्ठल भक्तांचा रोष त्यांना पत्करावा लागणार असून, या प्रकरणावर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पालख्या पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ


संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी सध्या पुण्याहून पंढरपूरकडे रवाना होत आहे. अशा परिस्थितीत, अबू आझमी यांच्या या विधानामुळे राजकीय वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. पंढरपूर वारी ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी आणि श्रद्धेशी संबंधित वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे, ज्यामध्ये लाखो संख्येने भाविक संतांच्या पालख्यांसह पंढरपुरी पायी प्रवास करतात.

Comments
Add Comment

CM Slams Abu Azmi: वारीवरून अबू आझमींचं वादग्रस्त विधान; फडणवीस म्हणाले, 'फालतू वक्तव्यांना उत्तर द्यायचं नाही!'

अबू आझमीच्या वादग्रस्त विधानांवर मुख्यमंत्र्यांची कठोर प्रतिक्रिया नागपूर : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu

E Bike Taxi in Maharashtra : महाराष्ट्रात ई-बाइक टॅक्सी सेवेला नागरिकांचा विरोध!

मुंबई : मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये ई-बाइक टॅक्सी सुरू करण्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. प्रत्यक्ष

'मम्मी, मी विष प्यायलो आहे, माझा मृतदेह घेऊन जा', पुण्यात १८ वर्षीय तरुणाची आत्महत्या

पुणे: पुण्यात एका १८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्या तरुणाने एक ऑडिओ आणि

चंद्रभागा नदीत बुडणाऱ्या ६ भाविकांना वाचवण्यात यश, प्रशासनाने सतर्कतेचं आवाहन केलं

पंढरपूर: पंढरपुरातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. चंद्रभागा नदीत स्नान करत असताना बुडणाऱ्या सहा भाविकांना

Sangli Crime : 'नीट' परीक्षेत कमी मार्क पडल्याने पोटच्या लेकीला बापाने टाकलं मारून!

सांगली : सांगलीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. बारावीत शिकणाऱ्या मुलीला नीट परीक्षेत कमी मार्क पडल्याच्या

सायलस्वार वारकऱ्यांचा पंढरीत रंगला नेत्रदीपक रिंगण सोहळा

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने भव्य दिव्य सायकल वारीचे आयोजन पंढरपूर: आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी नाशिक