Abu Azami Wari Controversy: 'हिंदू सण रस्ता अडवतात, पण आम्ही गप्प राहतो', पंढरपूर यात्रेवर अबू आझमीचे वादग्रस्त विधान

सोलापूर: महाराष्ट्रात वारकऱ्यांच्या पालखी सोहळा सुरू असताना समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azami) यांनी पंढरपूर यात्रेबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे. हिंदूंचे सण साजरे केले जातात तेव्हा मुस्लिम व्यक्ती विरोध करत नाहीत. मात्र मुस्लिमांनी नमाज केल्यावर तक्रारी केल्या जातात असं विधान आझमी यांनी केले आहे.



नेमके काय म्हणाले अबू आझमी?


समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी म्हणाले, "वारीमुळे रस्ते जाम होतात. जेव्हा हिंदू सण साजरे केले जातात तेव्हा मुस्लिम कधीही विरोध करत नाहीत, परंतु जेव्हा मुस्लिम नमाज पठण करतात तेव्हा तक्रारी केल्या जातात. आम्ही नेहमीच हिंदू बांधवांसोबत खांद्याला खांदा लावून चालतो. आजपर्यंत कोणत्याही मुस्लिमाने हिंदू सणांमुळे रस्ता बंद असल्याची तक्रार केलेली नाही, परंतु जेव्हा मशिदीत नमाज पठण केले जाते तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात की जर बाहेर नमाज पठण केले तर पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले जातील.".  ते पुढे म्हणाले की, "आज मी सोलापूरला येत असताना मला सांगण्यात आले की पालखी येणार आहे, लवकर निघा, नाहीतर रस्ता जाम होईल. वारीमुळे वाहतूक कोंडी होते पण आम्ही कधीही विरोध केला नाही. मुस्लिमांसाठी जमीन जाणूनबुजून दिली जात नाही". समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी रविवारी सकाळी सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांनी हे वरील विधान केले. 


नमाज पठणामुळे होणाऱ्या गर्दीची तुलना वारीशी केल्यामुळे, महाराष्ट्रातील लाखों वारकरी आणि विठ्ठल भक्तांचा रोष त्यांना पत्करावा लागणार असून, या प्रकरणावर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पालख्या पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ


संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी सध्या पुण्याहून पंढरपूरकडे रवाना होत आहे. अशा परिस्थितीत, अबू आझमी यांच्या या विधानामुळे राजकीय वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. पंढरपूर वारी ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी आणि श्रद्धेशी संबंधित वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे, ज्यामध्ये लाखो संख्येने भाविक संतांच्या पालख्यांसह पंढरपुरी पायी प्रवास करतात.

Comments
Add Comment

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मनात नेमकं चाललंय काय? निवृत्ती की राजकीय खेळी?

शिंदे गटाच्या आमदाराच्या निर्णयामागे कुटुंबातील 'नवे नेतृत्व' आणण्याची खेळी? मुंबई : राज्याचे समाजकल्याण

मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरून भांडण! नागपूरचे पोस्टमास्टर जनरलपद नेमके कुणाकडे?

एकीने दुसरीच्या अंगावर पाणी ओतलं, चिमटाही काढला नागपूर : नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या

फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, प्रशांतच्या बहिणीचा मोठा खुलासा

सातारा : साताऱ्यातील फलटण येथे महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालं आहे. या

फलटणमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या, निलंबित PSI बदनेचा शोध सुरू

सातारा : सातारा जिल्हातील फलटण मधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पोलिसांना २४ तासांच्या आत आरोपी प्रशांत