मुसळधार पावसाला पुन्हा सुरुवात, राज्यात कुठे आणि किती पाऊस पडणार ?

मुंबई : राज्यात दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुढील काही दिवसांनी म्हणजेच दोन ते तीन दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात जास्त पाऊस पडल्यामुळे काही भागात लोकांचं प्रचंड नुकसान झालंय. तरी ही विदर्भात अजूनही पाऊस पडला नसल्याने तेथील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. पुण्यात ऑरेंज अलर्ट तर मुंबईत यलो अलर्ट जारी करण्यात आला. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.


पुण्यातील इतर भागात ही शनिवारी ढगाळ वातावरण होते, परंतू संध्याकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने दोन दिवसात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.  हवामान विभागाच्या अंदाजानुसार रत्नागिरी, पुणे जिल्ह्याचा घाटमाथा इथं तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. पालघर, ठाणे,मुंबई, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर, सातारा जिल्ह्याचा घाटमाथा इथं तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर इथं तुरळक ठिकाणी वीजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.


विदर्भातील अनेक जिल्हे कोरडे असल्याने विदर्भातील शेतकरी मात्र पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. पाऊस न पडल्यामुळे अकोल्यात पाणीटंचाईचं संकट निर्माण झालं आहे. विदर्भातील अद्यापही तापमान कमी झालेलं नाही. पावसाअभावी धरणांमधील पाणीसाठाही कमी झाला आहे.  नागपूरमध्ये तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसच्या वर आहे. ज्या भागात पाऊस झाला तिकडे जवळपास 13 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, उर्वरित शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. महत्वाचे म्हणजे आता ज्यांनी पेरणी केली ते शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसलेत.






 

 
Comments
Add Comment

महावितरणचा 'आयपीओ' येणार - उत्पन्न वाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी केली सूचना; 'कॉर्पोरेट गव्हर्नन्स' चा अंमल करणार

मुंबई : ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाजारपेठेचा लाभ उठवित महावितरणने आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :