पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी दोघांना अटक

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे धर्म विचारुन २६ नागरिकांची हत्या केली होती. या अतिरेकी हल्ला प्रकरणी एनआयएने पहलगाम येथे राहणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. अतिरेक्यांना आश्रय दिल्याचा आरोप ठेवून दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांची नावं अनुक्रमे परवेझ अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर अशी आहेत. एनआयएने परवेझ आणि बशीर या दोघांना बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा, १९६७ च्या कलम १९ अंतर्गत अटक केली आहे.

अतिरेकी हल्ला करणाऱ्यांपैकी तीन जणांची ओळख पटली आहे. बंदी असलेल्या लष्कर - ए - तोयबा या अतिरेकी संघटनेशी संबंधित असलेल्या या अतिरेक्यांचा शोध सुरू आहे. हल्लेखोर अतिरेकी पाकिस्तानचे नागरिक होते. परवेझ आणि बशीर या दोघांनी अतिरेक्यांच्या राहण्याची तसेच त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती. हल्ला करण्याआधी अतिरेकी हिल पार्क येथील एका घरात वास्तव्यास होते. ही व्यवस्था परवेझ आणि बशीर यांनीच केलीच होती. हल्ला करण्यासाठी आवश्यक असलेली वेगवेगळ्या प्रकारची मदत परवेझ आणि बशीर या दोघांनीच पुरवली होती.

पहलगाम येथे अतिरेकी हल्ला करणाऱ्यांचा शोध सुरू आहे. भारताने पहलगाम अतिरेकी हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर केले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांचे तळ नष्ट करण्यात आले.
Comments
Add Comment

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या

आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये

आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली:

दर्शनबंद! केदारनाथ आणि बद्रीनाथचे दरवाजे बंद करणार!

डेहराडून : बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे यावर्षी मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी पहाटे २:५६ वाजता बंद करण्यात येणार आहेत. तर