पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी दोघांना अटक

  88

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे धर्म विचारुन २६ नागरिकांची हत्या केली होती. या अतिरेकी हल्ला प्रकरणी एनआयएने पहलगाम येथे राहणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. अतिरेक्यांना आश्रय दिल्याचा आरोप ठेवून दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांची नावं अनुक्रमे परवेझ अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर अशी आहेत. एनआयएने परवेझ आणि बशीर या दोघांना बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा, १९६७ च्या कलम १९ अंतर्गत अटक केली आहे.

अतिरेकी हल्ला करणाऱ्यांपैकी तीन जणांची ओळख पटली आहे. बंदी असलेल्या लष्कर - ए - तोयबा या अतिरेकी संघटनेशी संबंधित असलेल्या या अतिरेक्यांचा शोध सुरू आहे. हल्लेखोर अतिरेकी पाकिस्तानचे नागरिक होते. परवेझ आणि बशीर या दोघांनी अतिरेक्यांच्या राहण्याची तसेच त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती. हल्ला करण्याआधी अतिरेकी हिल पार्क येथील एका घरात वास्तव्यास होते. ही व्यवस्था परवेझ आणि बशीर यांनीच केलीच होती. हल्ला करण्यासाठी आवश्यक असलेली वेगवेगळ्या प्रकारची मदत परवेझ आणि बशीर या दोघांनीच पुरवली होती.

पहलगाम येथे अतिरेकी हल्ला करणाऱ्यांचा शोध सुरू आहे. भारताने पहलगाम अतिरेकी हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर केले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांचे तळ नष्ट करण्यात आले.
Comments
Add Comment

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय

टोल कर्मचाऱ्यांची दादागिरी... ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानाला मारहाण केल्याप्रकरणी NHAI ची मोठी कारवाई

मेरठ: ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी NHAI ने मोठी कारवाई केली असून संबंधित

कर्नाटकचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना ईडीकडून अटक

छापेमारीत आढळले १२ कोटी रुपये, ६ कोटींचे सोने गंगटोक : कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र यांना सक्तवसुली

टिकटॉकवरील बंदी उठवली काय?

नवी दिल्ली : एकेकाळी तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉकच्या भारतातील पुनरागमनाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला

Vande Bharat Express: रेल्वेने वंदे भारत ट्रेनच्या वेळापत्रकात केला बदल, जाणून घ्या आता सेमी हाय स्पीड ट्रेन किती वाजता धावणार?

नवी दिल्ली: वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची सर्वात प्रतिष्ठित आणि आरामदायी ट्रेन मानली जाते, ज्यामध्ये