पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी दोघांना अटक

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे धर्म विचारुन २६ नागरिकांची हत्या केली होती. या अतिरेकी हल्ला प्रकरणी एनआयएने पहलगाम येथे राहणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. अतिरेक्यांना आश्रय दिल्याचा आरोप ठेवून दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांची नावं अनुक्रमे परवेझ अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर अशी आहेत. एनआयएने परवेझ आणि बशीर या दोघांना बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा, १९६७ च्या कलम १९ अंतर्गत अटक केली आहे.

अतिरेकी हल्ला करणाऱ्यांपैकी तीन जणांची ओळख पटली आहे. बंदी असलेल्या लष्कर - ए - तोयबा या अतिरेकी संघटनेशी संबंधित असलेल्या या अतिरेक्यांचा शोध सुरू आहे. हल्लेखोर अतिरेकी पाकिस्तानचे नागरिक होते. परवेझ आणि बशीर या दोघांनी अतिरेक्यांच्या राहण्याची तसेच त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती. हल्ला करण्याआधी अतिरेकी हिल पार्क येथील एका घरात वास्तव्यास होते. ही व्यवस्था परवेझ आणि बशीर यांनीच केलीच होती. हल्ला करण्यासाठी आवश्यक असलेली वेगवेगळ्या प्रकारची मदत परवेझ आणि बशीर या दोघांनीच पुरवली होती.

पहलगाम येथे अतिरेकी हल्ला करणाऱ्यांचा शोध सुरू आहे. भारताने पहलगाम अतिरेकी हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर केले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांचे तळ नष्ट करण्यात आले.
Comments
Add Comment

‘आशियामध्ये शांततेसाठी अरब राष्ट्राची भूमिका कौतुकास्पद’

नवी दिल्ली : अरब देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी

भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे संरक्षण बजेट

नवी दिल्ली : यंदाच्या बजेटमध्ये संरक्षण विभागासाठी ७.८ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षणासाठी

भूतान, नेपाळ, श्रीलंका याविश्वासू मित्रांसाठी मदतीचा हात, संबंधातील कडवटपणामुळे बांगलादेशला आर्थिक झटका

नवी दिल्ली  : केंद्रातील मोदी सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना आपल्या परराष्ट्र धोरणाचे

इतर देशांच्या तुलनेत किती मोठे आहे देशाचे संरक्षण बजेट

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत बजेट सादर केले. यंदाच्या बजेटमध्ये भारताच्या

Budget 2026 : ‘विकसित भारताच्या दिशेने दमदार पाऊल’; केंद्रीय अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मुंबई : देशाचा २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2026 ) सादर झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र

Budget 2026 : मच्छिमारांसाठी आनंदाची बातमी! खुल्या समुद्रातील मासेमारी आता 'करमुक्त'; निर्यातीला मिळणार मोठी गती

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात देशातील ग्रामीण