पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी दोघांना अटक

  32

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे धर्म विचारुन २६ नागरिकांची हत्या केली होती. या अतिरेकी हल्ला प्रकरणी एनआयएने पहलगाम येथे राहणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. अतिरेक्यांना आश्रय दिल्याचा आरोप ठेवून दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांची नावं अनुक्रमे परवेझ अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर अशी आहेत. एनआयएने परवेझ आणि बशीर या दोघांना बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा, १९६७ च्या कलम १९ अंतर्गत अटक केली आहे.

अतिरेकी हल्ला करणाऱ्यांपैकी तीन जणांची ओळख पटली आहे. बंदी असलेल्या लष्कर - ए - तोयबा या अतिरेकी संघटनेशी संबंधित असलेल्या या अतिरेक्यांचा शोध सुरू आहे. हल्लेखोर अतिरेकी पाकिस्तानचे नागरिक होते. परवेझ आणि बशीर या दोघांनी अतिरेक्यांच्या राहण्याची तसेच त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती. हल्ला करण्याआधी अतिरेकी हिल पार्क येथील एका घरात वास्तव्यास होते. ही व्यवस्था परवेझ आणि बशीर यांनीच केलीच होती. हल्ला करण्यासाठी आवश्यक असलेली वेगवेगळ्या प्रकारची मदत परवेझ आणि बशीर या दोघांनीच पुरवली होती.

पहलगाम येथे अतिरेकी हल्ला करणाऱ्यांचा शोध सुरू आहे. भारताने पहलगाम अतिरेकी हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर केले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांचे तळ नष्ट करण्यात आले.
Comments
Add Comment

विमानात किंवा हॉस्टेलमध्ये नसूनही चित्रपट निर्मात्याचा विमान अपघातात मृत्यू

अहमदाबाद : एअर इंडियाच्या AI 171 विमान अपघाताशी संबंधित एक नवी बातमी आली आहे. विमानात किंवा हॉस्टेलमध्ये नसूनही

Ajit Doval: ऑपरेशन सिंदूरनंतर अजित डोवाल पहिल्यांदाच चीनला जाणार

नवी दिल्ली: भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) लवकरच चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. हा दौरा

ऑपरेशन सिंधू : आतापर्यंत ८२७ भारतीय मायदेशी परतले

परराष्ट्र मंत्रालयाचे रणधीर जयस्वाल यांनी दिली माहिती नवी दिल्ली : इरणमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी

Raja Raghuvanshi Murder Case: सोनम आणि तिच्या प्रियकराला १३ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी

शिलाँग: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात (Raja Raghuvanshi Murder Case) शिलाँग न्यायालयाने शनिवारी सोनम रघुवंशी (Sonam Raghuvanshi) आणि तिचा

इंडिगोने जाहीर केला मेडे आणि....

बंगळुरू : एअर इंडियाच्या AI 171 या विमानाच्या अपघाताला काही दिवस होत नाहीत तोच इंडिगो या बजेट एअरलाईन कंपनीच्या

रेल्वेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा काम मिळणार, रेल्वे मंडळाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : रेल्वे बोर्डाने आता एक मोठा निर्णय घेतला आहे . निवृत्त कर्मचाऱ्यांना रेल्वेमधील नॉन-राजपत्रित