स्थानिक स्वराज संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान ६.० राबविणार

  24

मुंबई : पर्यावरणाचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग माझी वसुंधरा हा अभिनव उपक्रम राबवित आहे. राज्यस्तरावर या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केल्यानंतर आता १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत ‘माझी वसुंधरा अभियान ६.०’ हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.


निसर्गाच्या भूमी, जल, वायू, अग्नी, आकाश या पंचमहाभूतांवर लक्ष केंद्रीत करून वातावरणीय बदल आणि पर्यावरणाच्या समस्यांबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविण्यास सुरूवात करण्यात आली. निसर्गाच्या पंचतत्वावर आधारित संरक्षण व संवर्धन करणाऱ्या विविध शासकीय योजना, कार्यक्रम, उपाययोजना एकत्रित करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून त्या प्रभावीपणे व मिशनमोड पद्धतीने राबविण्यासाठी अभियान मार्गदर्शन प्रारुप संच (टूलकिट) तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत पाच टप्प्यात माझी वसुंधरा अभियानाची अंमलबजावणी झाली आहे.


माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्थानिक संस्थांनी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अमंलबजावणीनंतर ‘माझी वसुंधरा अभियान ६.०’ची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवर करण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत नोंदणी केलेल्या ४२२ नागरी स्थानिक स्वराज्य संस्था व २७,८९५ ग्रामपंचायती अशा एकूण २८,३१७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘माझी वसुंधरा अभियान ६.०’ राबविण्यात येणार आहे.


कार्बन पृथक्करण, हरित वायूचे उत्सर्जन कमी करणे आणि नागरिकांमध्ये शाश्वत जीवनशैलीचा प्रचार करणे या बाबींवर लक्ष केंद्रीत करून या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी नोंदणी करावी, असे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.

Comments
Add Comment

पर्यटन योजनेतून एसटी बसमधून महाराष्ट्र फिरा

प्रवास, जेवण, निवास सर्व काही मिळणार माफक दरात मुंबई : तुम्हालाही राज्यभर फिरायचे स्वप्न आहे पण खर्चाचा विचार

राज्यात वीज दर कपातीला एमईआरसीचा हिरवा कंदील

पहिल्यावर्षी १० टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत ५ वर्षांत २६ टक्के वीजदर होणार कमी मुंबई : राज्याच्या

आदित्य ठाकरेची अटक टाळण्यासाठी हैद्राबादवरुन आणला मांत्रिक!

शिवसेना नेते रामदास कदम यांचा आरोप मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत वाद आता काळी विद्या, जादूटोणा आणि तांत्रिक

Numerology: वयाच्या ३५ वर्षानंतर प्रचंड संपत्ती मिळवतात या ३ तारखांना जन्मलेले लोक

मुंबई: अंकज्योतिषामध्ये प्रत्येक अंकाचे खास महत्त्व आहे. १ ते ९ अंकांचा संबंध ग्रह, राशी आणि नक्षत्रांशी जोडलेला

गावा गावात क्रीडा सुविधांसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद - क्रीडा मंत्री

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात क्रीडा क्षेत्रात अनेक गुणवंत विद्यार्थी आहेत. त्यांच्या गुणांना वाव मिळावा तसेच

वाढीव मतदानासंदर्भातील याचिका फेटाळली

उच्च न्यायालयाचा प्रकाश आंबेडकरांना धक्का मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालावर सर्वच विरोधी