मुंबईत अग्नितांडव, घाटकोपर इमारतीला मध्यरात्री भीषण आग, १३ जण जखमी...

मुंबई :  मुंबईतील घाटकोपर परिसरात असलेल्या एका इमारतीला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत १३ जण जखमी झाले आहेत. ऑर्किड टॉवर येथे ही भीषण आग लागल्याची माहिती आहे. ऑर्किड टॉवरच्या बिल्डिंग नंबर सहाच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ही आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते.

तेथील स्थानिक लोकांच्या माहितीनुसार घाटकोपर परिसरातील पंतनगर भागात असेलल्या रमाबाई कॉलनीमधील शांती सागर इमारतीत रात्री दीडच्या सुमारास भीषण आग लागलेली होती. या इमारतीच्या विद्युत मीटर केबिनमध्ये आग लागली असल्यामुळे इमारतीतील वायर जळून खाक झाल्या. ही आग लागल्यानंतर इमारतीतील भयभीत झालेल्या लोकांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. आग लागल्यानंतर लोकांची पळापळ सुरु झाली, त्यामुळे काही इमारतीच्या मजल्यावर लोक अडकले होते.

शांतीसागर इमारतीत आग लागल्याची माहिती मिळताच अग्नीशामक दलाने तातडीने घटना स्थळी धाव घेतली. अग्नीशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करुन ही आग तीड तासात आटोक्यात आणली. या आगीत १३ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. जखमी झालेल्या रुग्णांमध्ये ८ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहे. यातील १२ जणांवर उपचार सुरु आहेत, जखमी झालेल्या एका रुग्णाची प्रकृती ठिक असल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Comments
Add Comment

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील