भारताने पाडला धावांचा पाऊस, तीन फलंदाजांची शतकी खेळी

  69

लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले लीड्स येथे सुरू आहे. नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणे इंग्लंडला भोवले आहे. भारताने धावांचा पाऊस पाडला आहे. दुसऱ्या दिवशी उपहारापर्यंत भारताने सात बाद ४५४ धावा केल्या आहेत. भारताच्या तीन प्रमुख फलंदाजांनी शतकी खेळी केली आहे. सलामीवीर यशस्वी जयस्वालने १०१ धावा केल्या. भारताचा कर्णधार शुभमन गिल १४७ धावा करुन बाद झाला. रिषभ पंतनेही शतक (१३४) केले आहे. केएल राहुल ४२ धावा करुन बाद झाला तर साई सुदर्शन आणि करुण नायर हे दोघे शून्य धावा करुन बाद झाले. शार्दुल ठाकूर एक धाव करुन परतला. रवींद्र जडेजा नुकताच मैदानात उतरला आहे. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने चार तर शोएब बशीर, ब्रायडन कार्से, जोश टंग या तिघांनी प्रत्येकी एक बळी घेतला आहे.

धावांचा पाऊस पाडल्यामुळे भारत सुस्थितीत आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. टीम इंडियाची झकास सुरुवात बघता इंग्लंडपुढे मोठे आव्हान आहे.


शुभमन गिलवर होणार दंडात्मक कारवाई


शुभमन गिल फलंदाजीसाठी आला त्यावेळी पांढऱ्या रंगाऐवजी चुकून काळ्या रंगाचे मोजे घालून मैदानात आला. कसोटी क्रिकेटच्या नियमानुसार मैदानात पांढऱ्या रंगाचे मोजे वापरणे आवश्यक होते. यामुळे नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गिलला सामन्याच्या मानधनाच्या दहा ते वीस टक्क्यांपर्यंतची रक्कम दंड म्हणून भरावी लागण्याची शक्यता आहे. गिलने चुकून अथवा पांढरे मोजे ओले असल्यामुळे काळ्या रंगाचे मोजे वापरले असतील तर त्याला दंडात्मक कारवाईतून सूट मिळू शकते. पण यासाठी गिलला त्याची बाजू मांडावी लागेल. त्याचे म्हणणे ऐकल्यानंतर सामनाधिकाऱ्यांनी ते मुद्दे स्वीकारले तरच गिलला कारवाईतून सूट मिळू शकते.
Comments
Add Comment

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे

ICC Rankings : आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतून रोहित-विराटची नावे गायब

दुबई : भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीची नावे आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतून गायब

Team India Asia Cup 2025: आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाची घोषणा! सूर्या करणार नेतृत्व; शुभमन गिल उपकर्णधार

Team India T20 Squad for Asia Cup 2025: दिनांक ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप २०२५ साठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे.