भारताने पाडला धावांचा पाऊस, तीन फलंदाजांची शतकी खेळी

लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले लीड्स येथे सुरू आहे. नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणे इंग्लंडला भोवले आहे. भारताने धावांचा पाऊस पाडला आहे. दुसऱ्या दिवशी उपहारापर्यंत भारताने सात बाद ४५४ धावा केल्या आहेत. भारताच्या तीन प्रमुख फलंदाजांनी शतकी खेळी केली आहे. सलामीवीर यशस्वी जयस्वालने १०१ धावा केल्या. भारताचा कर्णधार शुभमन गिल १४७ धावा करुन बाद झाला. रिषभ पंतनेही शतक (१३४) केले आहे. केएल राहुल ४२ धावा करुन बाद झाला तर साई सुदर्शन आणि करुण नायर हे दोघे शून्य धावा करुन बाद झाले. शार्दुल ठाकूर एक धाव करुन परतला. रवींद्र जडेजा नुकताच मैदानात उतरला आहे. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने चार तर शोएब बशीर, ब्रायडन कार्से, जोश टंग या तिघांनी प्रत्येकी एक बळी घेतला आहे.

धावांचा पाऊस पाडल्यामुळे भारत सुस्थितीत आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. टीम इंडियाची झकास सुरुवात बघता इंग्लंडपुढे मोठे आव्हान आहे.


शुभमन गिलवर होणार दंडात्मक कारवाई


शुभमन गिल फलंदाजीसाठी आला त्यावेळी पांढऱ्या रंगाऐवजी चुकून काळ्या रंगाचे मोजे घालून मैदानात आला. कसोटी क्रिकेटच्या नियमानुसार मैदानात पांढऱ्या रंगाचे मोजे वापरणे आवश्यक होते. यामुळे नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गिलला सामन्याच्या मानधनाच्या दहा ते वीस टक्क्यांपर्यंतची रक्कम दंड म्हणून भरावी लागण्याची शक्यता आहे. गिलने चुकून अथवा पांढरे मोजे ओले असल्यामुळे काळ्या रंगाचे मोजे वापरले असतील तर त्याला दंडात्मक कारवाईतून सूट मिळू शकते. पण यासाठी गिलला त्याची बाजू मांडावी लागेल. त्याचे म्हणणे ऐकल्यानंतर सामनाधिकाऱ्यांनी ते मुद्दे स्वीकारले तरच गिलला कारवाईतून सूट मिळू शकते.
Comments
Add Comment

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत

U19 Asia Cup Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेसह प्रशिक्षकांवरही कारवाई होणार; पाकविरुद्ध फायनलमध्ये दारुण पराभव होताच BCCI अ‍ॅक्शन मोडवर!

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक