Ashadhi Wari 2025 : वारीत ३५ हजार भाविकांसाठी वॉटरप्रूफ दर्शन मंडप!

पंढरपूर : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं दैवत असलेल्या विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये येत असतात. येत्या ६ जुलै रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरीत येणार आहेत. मंदिर समितीने वारकरी भाविकांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली आहे. यावर्षी श्री विठ्ठल- रुक्मिणी पदस्पर्श दर्शनासाठी मंदिर समितीने विशेष सोय केली आहे. मंदिर समितीकडून सुमारे ३५ हजार भाविक दर्शनरांगेत उभारतील व बसतील, असा भव्यदिव्य वॉटरप्रूफ दर्शन मंडप उभारण्यात आला आहे. शिवाय दर्शन रांगेतील भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी, चहा आणि जेवणाची सोयसुद्धा केली आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.




४५० फूट लांब व १०० फूट रुंद मंडप


आषाढी वारीसाठी सुमारे १५ ते १६ लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यानुसार मंदिर समितीने दर्शनरांगेचे नियोजन केले आहे. वारी काळात पाऊस येण्याची शक्यता गृहीत धरून भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी यंदा प्रथमच वॉटरप्रूफ दर्शन मंडप उभारण्यात आला आहे. येथील पत्राशेड जवळच्या मोकळ्या जागेत ४५० फूट लांब व १०० फूट रुंद असा भव्य मंडप टाकला आहे.



भाविकांनी रांगेतूनच घ्यावे देवाचे दर्शन


विठ्ठल- रुक्मिणीचे २४ तास दर्शन येत्या २६ जूनपासून सुरू होणार आहे. ते प्रक्षाळ पूजेपर्यंत सुरू राहील. या काळात जास्तीत जास्त भाविकांचे सुलभ व जलद गतीने दर्शन व्हावे यासाठी दर्शनरांगेचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले आहे. दर्शनरांगेत २४ तास सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय ठिकठिकाणी भाविकांसाठी स्वच्छतागृहांची देखील सोय केली आहे. सध्या व्हीआयपी व ऑनलाइन दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. भाविकांनी दर्शन रांगेतून देवाचे दर्शन घ्यावे, असे आवाहनही गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले आहे.

Comments
Add Comment

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक

Sanjay Shirsat : "तुमचा डबा रुळावरून घसरलाय, आता काठावर बसा"; मंत्री शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना टोला

छत्रपती संभाजीनगर : "उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचा जीव केवळ मुंबईत अडकलेला आहे. नगरपालिका निवडणुकीत

Ladki Bahin Yojna : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेच्या ४० लाख महिला अपात्रतेच्या उंबरठ्यावर?

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक