आदिवासी विद्यार्थ्यांना २४ कोटींची शिष्यवृत्ती

४२ हजार विद्यार्थ्यांना मिळाला लाभ


पालघर: पालघर जिल्ह्यातील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या ४२ हजार ४३६ आदिवासी विद्यार्थ्यांना सुवर्णमहोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृती योजनेअंतर्गत २४ कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले आहे. गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना या योजनेमुळे चांगला आधार मिळत असून, २०२५-२६ च्या शैक्षणिक सत्रासाठी वाढीव निधीची मागणी करण्यात येणार आहे.


अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळांमध्ये चांगली उपस्थिती राहावी यासाठी अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक, जिल्हा परिषद तसेच नगरपालिका व महानगरपालिकांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता सुवर्णमहोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. दहा वर्षे वयापर्यंतच्या विद्यार्थ्यांचे आई-वडिलांसोबत संयुक्त बँक खाते शून्य बॅलन्सवर उघडण्यात येत असून दहा वर्षांवरील विद्यार्थ्यांचे स्वतःचे बँक खाते या योजनेच्या लाभासाठी उघडण्यात येते. या शिष्यवृत्तीच लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याची शाळेत दर महिन्यात ८० टक्के उपस्थिती असणे आवश्यक आहे.


पालघर जिल्हा आदिवासीबहुल जिल्हा असल्याने या जिल्ह्यातील हजारो आदिवासी विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळतो. १ ली ते ४ थी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १ हजार रुपये, इयत्ता पाचवी ते सातवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १५०० रुपये आणि आठवी ते दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना २ हजार रुपये याप्रमाणे शिष्यवृत्तीची रक्कम वितरित करण्यात येते. सन २०२४-२५ मध्ये जिल्ह्यातील ४२ हजार ४३६ विद्यार्थ्यांना २४ कोटी रुपयाच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले आहे.


इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिकत असलेल्या डहाणू तालुक्यातील ८ हजार ६५७ आदिवासी विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे, तर जव्हार तालुक्यातील ३ हजार १२० मोखाडा तालुक्यातील २ हजार २२०, पालघर तालुक्यातील ६ हजार ११६ तलासरीमधील ८ हजार ३१३, वसई तालुक्यातील ३ हजार ५५, विक्रमगड तालुक्यातील ४ हजार ८९५ आणि वाडा तालुक्यातील ६ हजार ६० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.

Comments
Add Comment

माजी आयुक्तांच्या अटकेचे पुरावे दाखवा

कारागृहातील मुक्काम वाढला बांधकाम प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले पालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार,

'चिकन लॉलीपॉप'ने घेतला सात वर्षांच्या मुलाचा जीव, पालघरमध्ये खळबळ

पालघर: मुंबईला लागून असलेल्या महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे चिकन लॉलीपॉप

रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी एकमेकांकडे बोट

पालिका, बांधकाम विभागाने जबाबदारी झटकली विरार : रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे नुकतेच विरारमध्ये एका व्यक्तीचा

वसईत गरबा खेळताना हृदयविकाराने महिलेचा मृत्यू

नवरात्रोत्सवातील जल्लोषात हृदयद्रावक घटना वसई : वसईत नवरात्रोत्सवाच्या उत्साहात एक हृदय हेलावून टाकणारी घटना

खाजगीकरणा विरोधात वीज कर्मचाऱ्यांची निदर्शने; ९ ऑक्टोबरला संपाचा इशारा

पालघर : वीज कंपन्यांमधील खाजगीकरण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते आणि

Vasai Factory Fire: वसईत कारखान्याला भीषण आग

वसई: वसईत तुंगारेश्वर फाटा येथील पुठ्ठा कारखान्यात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत कारखान्यातील अनेक