आदिवासी विद्यार्थ्यांना २४ कोटींची शिष्यवृत्ती

४२ हजार विद्यार्थ्यांना मिळाला लाभ


पालघर: पालघर जिल्ह्यातील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या ४२ हजार ४३६ आदिवासी विद्यार्थ्यांना सुवर्णमहोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृती योजनेअंतर्गत २४ कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले आहे. गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना या योजनेमुळे चांगला आधार मिळत असून, २०२५-२६ च्या शैक्षणिक सत्रासाठी वाढीव निधीची मागणी करण्यात येणार आहे.


अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळांमध्ये चांगली उपस्थिती राहावी यासाठी अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक, जिल्हा परिषद तसेच नगरपालिका व महानगरपालिकांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता सुवर्णमहोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. दहा वर्षे वयापर्यंतच्या विद्यार्थ्यांचे आई-वडिलांसोबत संयुक्त बँक खाते शून्य बॅलन्सवर उघडण्यात येत असून दहा वर्षांवरील विद्यार्थ्यांचे स्वतःचे बँक खाते या योजनेच्या लाभासाठी उघडण्यात येते. या शिष्यवृत्तीच लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याची शाळेत दर महिन्यात ८० टक्के उपस्थिती असणे आवश्यक आहे.


पालघर जिल्हा आदिवासीबहुल जिल्हा असल्याने या जिल्ह्यातील हजारो आदिवासी विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळतो. १ ली ते ४ थी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १ हजार रुपये, इयत्ता पाचवी ते सातवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १५०० रुपये आणि आठवी ते दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना २ हजार रुपये याप्रमाणे शिष्यवृत्तीची रक्कम वितरित करण्यात येते. सन २०२४-२५ मध्ये जिल्ह्यातील ४२ हजार ४३६ विद्यार्थ्यांना २४ कोटी रुपयाच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले आहे.


इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिकत असलेल्या डहाणू तालुक्यातील ८ हजार ६५७ आदिवासी विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे, तर जव्हार तालुक्यातील ३ हजार १२० मोखाडा तालुक्यातील २ हजार २२०, पालघर तालुक्यातील ६ हजार ११६ तलासरीमधील ८ हजार ३१३, वसई तालुक्यातील ३ हजार ५५, विक्रमगड तालुक्यातील ४ हजार ८९५ आणि वाडा तालुक्यातील ६ हजार ६० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.

Comments
Add Comment

Vasai Fort : 'मला मराठी येत नाही!' म्हणत वसई किल्ल्यावर सुरक्षा रक्षकाचा माज; शिवरायांच्या वेशातील युवकाला फोटो काढण्यास मज्जाव!

पालघर : वसईच्या ऐतिहासिक जंजिरे वसई किल्ल्यावर (Vasai Fort) दीपोत्सवाच्या (Deepotsav) शुभदिनी एक अनपेक्षित आणि वादग्रस्त घटना

विरारमधील फर्निचरच्या दुकानाला भीषण आग; मोठे आर्थिक नुकसान

विरार: विरार पूर्वेकडील आरजे सिग्नलजवळ असलेल्या एका फर्निचरच्या मोठ्या दुकानाला २१ ऑक्टोबरच्या दुपारी भीषण आग

रिचा पाटीलच्या आत्महत्येची सखोल चौकशी करा

भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस आयुक्तांची भेट विरार : विरार पश्चिम येथील विवा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या १९

ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याचे भाव घसरले, कांदा उत्पादक हवालदिल

लासलगाव : ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याच्या बाजार भावात घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले

वाढवण बंदराविरोधातील स्थानिक संघटनांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

 वाढवण बंदराच्या नियोजित विकासाला स्थगिती देण्याची स्थानिक संघटनांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने

वसई-विरारमध्ये ऑटोरिक्षा-टॅक्सींसाठी मीटर बंधनकारक

१५ नोव्हेंबरनंतर मीटरशिवाय भाडे घेतल्यास थेट कारवाई. मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय; ठाणे, कल्याणसाठी