आदिवासी विद्यार्थ्यांना २४ कोटींची शिष्यवृत्ती

४२ हजार विद्यार्थ्यांना मिळाला लाभ


पालघर: पालघर जिल्ह्यातील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या ४२ हजार ४३६ आदिवासी विद्यार्थ्यांना सुवर्णमहोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृती योजनेअंतर्गत २४ कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले आहे. गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना या योजनेमुळे चांगला आधार मिळत असून, २०२५-२६ च्या शैक्षणिक सत्रासाठी वाढीव निधीची मागणी करण्यात येणार आहे.


अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळांमध्ये चांगली उपस्थिती राहावी यासाठी अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक, जिल्हा परिषद तसेच नगरपालिका व महानगरपालिकांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता सुवर्णमहोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. दहा वर्षे वयापर्यंतच्या विद्यार्थ्यांचे आई-वडिलांसोबत संयुक्त बँक खाते शून्य बॅलन्सवर उघडण्यात येत असून दहा वर्षांवरील विद्यार्थ्यांचे स्वतःचे बँक खाते या योजनेच्या लाभासाठी उघडण्यात येते. या शिष्यवृत्तीच लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याची शाळेत दर महिन्यात ८० टक्के उपस्थिती असणे आवश्यक आहे.


पालघर जिल्हा आदिवासीबहुल जिल्हा असल्याने या जिल्ह्यातील हजारो आदिवासी विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळतो. १ ली ते ४ थी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १ हजार रुपये, इयत्ता पाचवी ते सातवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १५०० रुपये आणि आठवी ते दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना २ हजार रुपये याप्रमाणे शिष्यवृत्तीची रक्कम वितरित करण्यात येते. सन २०२४-२५ मध्ये जिल्ह्यातील ४२ हजार ४३६ विद्यार्थ्यांना २४ कोटी रुपयाच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले आहे.


इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिकत असलेल्या डहाणू तालुक्यातील ८ हजार ६५७ आदिवासी विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे, तर जव्हार तालुक्यातील ३ हजार १२० मोखाडा तालुक्यातील २ हजार २२०, पालघर तालुक्यातील ६ हजार ११६ तलासरीमधील ८ हजार ३१३, वसई तालुक्यातील ३ हजार ५५, विक्रमगड तालुक्यातील ४ हजार ८९५ आणि वाडा तालुक्यातील ६ हजार ६० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.

Comments
Add Comment

नगराध्यक्ष हरले, मात्र जिल्हाध्यक्ष जिंकले

जिल्ह्यात भाजपचे ९४ पैकी ५० नगरसेवक गणेश पाटील पालघर: पालघर जिल्ह्यात तीन नगर परिषद आणि एका नगरपंचायतीच्या

भाजप नेत्यांचे ‘रायगड’वर विचारमंथन

टिळक भवनात आज काँग्रेसची खलबते वसई : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया

मच्छीमारांच्या सर्वांगीण सर्वेक्षणाला गती

वाढवण बंदर प्रकल्प: जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार पालघर : प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या

कुडूसला स्वतंत्र पोलीस ठाण्याचा दर्जा

५२ गावांच्या सुरक्षिततेसाठी गृहविभागाची मंजुरी वाडा : वाडा तालुक्यातील औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि ५२

पालघरच्या मजुरांचा ‘मस्टर रोल’ राज्यभर पोहोचणार

ग्रामविकास विभागाच्या मुख्य सचिवांकडून उपक्रमाचे कौतुक पालघर : पालघर जिल्ह्यातील मनरेगा योजनेअंतर्गत

एकाच महिला नेत्याला मिळाला प्रथम नागरिकाचा मान!

वसई-विरारमध्ये पाच पुरुष महापौर गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिकेच्या महापौरपदी विराजमान होण्याची संधी