भारताची भूमिगत एलपीजी साठा यंत्रणा सज्ज

नवी दिल्ली : भारताने मंगळुरू येथे एलपीजीचा साठा युद्धकाळातही सुरक्षित ठेवण्यासाठी एक भूमिगत यंत्रणा उभारली आहे. या यंत्रणेमुळे देशाचा ८० हजार मेट्रिक टन एलपीजी साठा जमिनीखाली सुरक्षित राहू शकेल. जगात अस्तित्वात असलेल्या अनेक घातक बॉम्बपासून हा साठा सुरक्षित राहणार आहे. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेडने (एमईआयएल) हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी (एचपीसीएल) ही यंत्रणा विकसित केली आहे. भारताच्या पेट्रोलियम साठ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी सुरू असलेल्या उपायांपैकी हा एक धोरणात्मक उपाय आहे.

भारतातील ही दुसरी एलपीजीची भूमिगत साठवणूक यंत्रणा आहे. याआधी विशाखापट्टणम येथे ६० हजार मेट्रिक टन द्रवरुप इंधन साठा जमिनीखाली सुरक्षित राहू शकेल अशी यंत्रणा विससित करण्यात आली आहे. विशाखापट्टणम आणि मंगळुरू या दोन ठिकाणी विकसित केलेल्या भूमिगत साठवणूक यंत्रणेमुळे भारत १४० हजार मेट्रिक टन द्रवरुप इंधन साठा जमिनीखाली सुरक्षित ठेवू शकेल.

विशाखापट्टणम येथे दोन स्वतंत्र साठवणूक क्षमता मिळून ६० हजार मेट्रिक टन द्रवरुप इंधन साठा जमिनीखाली सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था आहे. सरकार आवश्यकतेनुसार विशाखापट्टणम येथे एलपीजी ऐवजी ४० हजार मेट्रिक टन प्रोपेन आणि ६० हजार मेट्रिक टन ब्युटेन जमिनीखाली साठवून ठेवू शकते.

मंगळुरू येथे समुद्रसपाटीपासून सरासरी १४१ मीटर खाली असलेल्या ग्रॅनाइटिक गनीस खडकात खोलवर कोरुन साठवणूक यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे भूजलाचा दाब एलपीजीला खडकांच्या चेंबरमध्ये सुरक्षितपणे सीलबंद ठेवण्यास मदत करेल. शाफ्ट १६४.५ मीटर पर्यंत पसरतो, ज्यामुळे गॅस साठवण्यासाठी तसेच गॅसची वाहतूक करण्यासाठी एक सुरक्षित यंत्रणा उपलब्ध होते. हे बांधकाम ड्रिल-अँड-ब्लास्ट पद्धतीने केले गेले. यासाठी उच्च-स्तरिय भूगर्भीय मूल्यांकन आणि अचूक अभियांत्रिकी कौशल्य यांचा वापर झाला आहे. जमिनीखाली असलेला कचरा काढून टाकण्यासाठी आणि साठवणूक यंत्रणेपर्यंत प्रवेश सुकर व्हावा याकरिता १.१ किलोमीटरचा प्रवेश बोगदा तयार करण्यात आला आहे. मंगळुरू येथील प्रकल्पासाठी आठशे कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला.

Comments
Add Comment

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या

US-India Trade Deal: वर्षभराच्या चर्चेनंतर भारत-अमेरिका व्यापार करारावर एकमत; ट्रम्प-मोदींच्या चर्चेनंतर 'टॅरिफ'मध्ये मोठी कपात

भारत युरोप मुक्त व्यापार करारानंतर आता भारत अमेरिका या दोन देशांमध्ये मुक्त करार झाला आहे. स्वतः पंतप्रधान