भारताची भूमिगत एलपीजी साठा यंत्रणा सज्ज

नवी दिल्ली : भारताने मंगळुरू येथे एलपीजीचा साठा युद्धकाळातही सुरक्षित ठेवण्यासाठी एक भूमिगत यंत्रणा उभारली आहे. या यंत्रणेमुळे देशाचा ८० हजार मेट्रिक टन एलपीजी साठा जमिनीखाली सुरक्षित राहू शकेल. जगात अस्तित्वात असलेल्या अनेक घातक बॉम्बपासून हा साठा सुरक्षित राहणार आहे. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेडने (एमईआयएल) हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी (एचपीसीएल) ही यंत्रणा विकसित केली आहे. भारताच्या पेट्रोलियम साठ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी सुरू असलेल्या उपायांपैकी हा एक धोरणात्मक उपाय आहे.

भारतातील ही दुसरी एलपीजीची भूमिगत साठवणूक यंत्रणा आहे. याआधी विशाखापट्टणम येथे ६० हजार मेट्रिक टन द्रवरुप इंधन साठा जमिनीखाली सुरक्षित राहू शकेल अशी यंत्रणा विससित करण्यात आली आहे. विशाखापट्टणम आणि मंगळुरू या दोन ठिकाणी विकसित केलेल्या भूमिगत साठवणूक यंत्रणेमुळे भारत १४० हजार मेट्रिक टन द्रवरुप इंधन साठा जमिनीखाली सुरक्षित ठेवू शकेल.

विशाखापट्टणम येथे दोन स्वतंत्र साठवणूक क्षमता मिळून ६० हजार मेट्रिक टन द्रवरुप इंधन साठा जमिनीखाली सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था आहे. सरकार आवश्यकतेनुसार विशाखापट्टणम येथे एलपीजी ऐवजी ४० हजार मेट्रिक टन प्रोपेन आणि ६० हजार मेट्रिक टन ब्युटेन जमिनीखाली साठवून ठेवू शकते.

मंगळुरू येथे समुद्रसपाटीपासून सरासरी १४१ मीटर खाली असलेल्या ग्रॅनाइटिक गनीस खडकात खोलवर कोरुन साठवणूक यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे भूजलाचा दाब एलपीजीला खडकांच्या चेंबरमध्ये सुरक्षितपणे सीलबंद ठेवण्यास मदत करेल. शाफ्ट १६४.५ मीटर पर्यंत पसरतो, ज्यामुळे गॅस साठवण्यासाठी तसेच गॅसची वाहतूक करण्यासाठी एक सुरक्षित यंत्रणा उपलब्ध होते. हे बांधकाम ड्रिल-अँड-ब्लास्ट पद्धतीने केले गेले. यासाठी उच्च-स्तरिय भूगर्भीय मूल्यांकन आणि अचूक अभियांत्रिकी कौशल्य यांचा वापर झाला आहे. जमिनीखाली असलेला कचरा काढून टाकण्यासाठी आणि साठवणूक यंत्रणेपर्यंत प्रवेश सुकर व्हावा याकरिता १.१ किलोमीटरचा प्रवेश बोगदा तयार करण्यात आला आहे. मंगळुरू येथील प्रकल्पासाठी आठशे कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला.

Comments
Add Comment

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात

'Nanda Devi' Ship : तब्बल ४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

‘शिवालिक’नंतर आणखी एक एलपीजी टँकर भारतात दाखल झाला आहे. ‘नंदा देवी’ हे जहाज आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी

एनआयएची मोठी कारवाई, युक्रेनच्या सहा आणि अमेरिकेच्या एका नागरिकाला अटक

नवी दिल्ली : कोलकाता विमानतळ येथे अमेरिकन नागरिकाला तर लखनऊ विमानतळ आणि दिल्ली विमानतळ येथे प्रत्येकी तीन

West Bengal ED Raid : पश्चिम बंगालमध्ये ईडीअँक्शन मोडवर; एकूण १० ठिकाणी छापेमारी

- अवैध कॉल सेंटरद्वारे फसवणुकीचे प्रकरण पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) सोमवारी (१६ मार्च) मोठी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, भाजपची १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शुभेंदू अधिकारी

बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय

पाटणा : बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. विधानसभेनंतर