भारताची भूमिगत एलपीजी साठा यंत्रणा सज्ज

नवी दिल्ली : भारताने मंगळुरू येथे एलपीजीचा साठा युद्धकाळातही सुरक्षित ठेवण्यासाठी एक भूमिगत यंत्रणा उभारली आहे. या यंत्रणेमुळे देशाचा ८० हजार मेट्रिक टन एलपीजी साठा जमिनीखाली सुरक्षित राहू शकेल. जगात अस्तित्वात असलेल्या अनेक घातक बॉम्बपासून हा साठा सुरक्षित राहणार आहे. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेडने (एमईआयएल) हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी (एचपीसीएल) ही यंत्रणा विकसित केली आहे. भारताच्या पेट्रोलियम साठ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी सुरू असलेल्या उपायांपैकी हा एक धोरणात्मक उपाय आहे.

भारतातील ही दुसरी एलपीजीची भूमिगत साठवणूक यंत्रणा आहे. याआधी विशाखापट्टणम येथे ६० हजार मेट्रिक टन द्रवरुप इंधन साठा जमिनीखाली सुरक्षित राहू शकेल अशी यंत्रणा विससित करण्यात आली आहे. विशाखापट्टणम आणि मंगळुरू या दोन ठिकाणी विकसित केलेल्या भूमिगत साठवणूक यंत्रणेमुळे भारत १४० हजार मेट्रिक टन द्रवरुप इंधन साठा जमिनीखाली सुरक्षित ठेवू शकेल.

विशाखापट्टणम येथे दोन स्वतंत्र साठवणूक क्षमता मिळून ६० हजार मेट्रिक टन द्रवरुप इंधन साठा जमिनीखाली सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था आहे. सरकार आवश्यकतेनुसार विशाखापट्टणम येथे एलपीजी ऐवजी ४० हजार मेट्रिक टन प्रोपेन आणि ६० हजार मेट्रिक टन ब्युटेन जमिनीखाली साठवून ठेवू शकते.

मंगळुरू येथे समुद्रसपाटीपासून सरासरी १४१ मीटर खाली असलेल्या ग्रॅनाइटिक गनीस खडकात खोलवर कोरुन साठवणूक यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे भूजलाचा दाब एलपीजीला खडकांच्या चेंबरमध्ये सुरक्षितपणे सीलबंद ठेवण्यास मदत करेल. शाफ्ट १६४.५ मीटर पर्यंत पसरतो, ज्यामुळे गॅस साठवण्यासाठी तसेच गॅसची वाहतूक करण्यासाठी एक सुरक्षित यंत्रणा उपलब्ध होते. हे बांधकाम ड्रिल-अँड-ब्लास्ट पद्धतीने केले गेले. यासाठी उच्च-स्तरिय भूगर्भीय मूल्यांकन आणि अचूक अभियांत्रिकी कौशल्य यांचा वापर झाला आहे. जमिनीखाली असलेला कचरा काढून टाकण्यासाठी आणि साठवणूक यंत्रणेपर्यंत प्रवेश सुकर व्हावा याकरिता १.१ किलोमीटरचा प्रवेश बोगदा तयार करण्यात आला आहे. मंगळुरू येथील प्रकल्पासाठी आठशे कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला.

Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे