‘म्हाडा’च्या जनता दरबारात १० तक्रारींचे निवारण

मुंबई : जनसामान्यांच्या समस्यांकडे तत्काळ लक्ष देत त्यांचे निवारण करण्याच्या उद्देशाने ‘म्हाडा’च्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे मुख्य अधिकारी रेवती गायकर यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवारी झालेल्या तिसऱ्या जनता दरबार दिनात एकूण १० तक्रार अर्जांवर सुनावणी घेण्यात येऊन सर्व तक्रारींचे निवारण करण्यात आले. वांद्रे (पूर्व) येथील म्हाडा मुख्यालयातील कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी यांच्या दालनात झालेल्या या लोकाभिमुख उपक्रमात, गायकर यांनी अर्जदारांच्या समस्यांचे त्वरित निवारण करत अर्जदारांच्या मागण्या व प्रलंबित कामे तत्परतेने सोडविण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकार्यांना दिले.


नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनिक विभागांकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार ‘नागरिकांच्या तक्रारींचे निवारण’ या महत्त्वपूर्ण घटकाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनता दिन आयोजित करावा, असे निर्देश ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिले.


या निर्देशांची तात्काळ अंमलबजावणी करत कोकण मंडळाने तिसरा जनता जनता दरबार दिन घेत शासनाच्या जनकल्याणकारी धोरणांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचा प्रत्यय दिला.


लोकशाही व्यवस्थेतील पारदर्शकता आणि जनतेशी थेट संवाद यांना अधोरेखित करणारी ही अभिनव संकल्पना पुढे नेण्याचा निर्धार कोकण मंडळाने केला आहे. काल झालेल्या जनता दरबार दिनात, देखभाल शुल्क समायोजित करणे, विक्री किंमत भरण्यास उशीर झाल्यामुळे आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम परत करण्यात यावी, सोसायटी लवकर स्थापन करण्यास परवानगी देण्याबाबत सहकार उपनिबंधकांनी कार्यवाही करावी, म्हाडा वसाहतीतील समस्या सोडविणे आदींबाबत अर्ज प्राप्त झाले. गायकर यांनी सर्व अर्जदारांचे म्हणणे सहानुभूतीपूर्वक ऐकून घेऊन, संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ व योग्य कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

Comments
Add Comment

यंदाच्या छठ पुजेत विरोधही होणार मावळ, काय आहे कारण...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी यंदा छठ पुजेच्या निमित्ताने

महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी १९,३१७ नवीन टॅबची खरेदी

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले टॅब आता जुने झाल्याने नव्याने

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक