‘म्हाडा’च्या जनता दरबारात १० तक्रारींचे निवारण

  21

मुंबई : जनसामान्यांच्या समस्यांकडे तत्काळ लक्ष देत त्यांचे निवारण करण्याच्या उद्देशाने ‘म्हाडा’च्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे मुख्य अधिकारी रेवती गायकर यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवारी झालेल्या तिसऱ्या जनता दरबार दिनात एकूण १० तक्रार अर्जांवर सुनावणी घेण्यात येऊन सर्व तक्रारींचे निवारण करण्यात आले. वांद्रे (पूर्व) येथील म्हाडा मुख्यालयातील कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी यांच्या दालनात झालेल्या या लोकाभिमुख उपक्रमात, गायकर यांनी अर्जदारांच्या समस्यांचे त्वरित निवारण करत अर्जदारांच्या मागण्या व प्रलंबित कामे तत्परतेने सोडविण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकार्यांना दिले.


नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनिक विभागांकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार ‘नागरिकांच्या तक्रारींचे निवारण’ या महत्त्वपूर्ण घटकाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनता दिन आयोजित करावा, असे निर्देश ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिले.


या निर्देशांची तात्काळ अंमलबजावणी करत कोकण मंडळाने तिसरा जनता जनता दरबार दिन घेत शासनाच्या जनकल्याणकारी धोरणांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचा प्रत्यय दिला.


लोकशाही व्यवस्थेतील पारदर्शकता आणि जनतेशी थेट संवाद यांना अधोरेखित करणारी ही अभिनव संकल्पना पुढे नेण्याचा निर्धार कोकण मंडळाने केला आहे. काल झालेल्या जनता दरबार दिनात, देखभाल शुल्क समायोजित करणे, विक्री किंमत भरण्यास उशीर झाल्यामुळे आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम परत करण्यात यावी, सोसायटी लवकर स्थापन करण्यास परवानगी देण्याबाबत सहकार उपनिबंधकांनी कार्यवाही करावी, म्हाडा वसाहतीतील समस्या सोडविणे आदींबाबत अर्ज प्राप्त झाले. गायकर यांनी सर्व अर्जदारांचे म्हणणे सहानुभूतीपूर्वक ऐकून घेऊन, संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ व योग्य कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

Comments
Add Comment

मुंबई विद्यापीठाची सुधारणा, शिक्षण संस्थाच्या यादीत १७ व्या क्रमांकावर...

मुंबई : क्वॅकेरली सायमंडतर्फे (क्यूएस) जागतिक विद्यापीठ क्रमवारी  २०२६ नुकतीच जाहीर करण्यात आली.  गतवर्षीयाच्या

Mumbai rain मुंबई शहर जिल्ह्यात १४२ मिमी पाऊस, मुंबई - पुण्यासाठी २४ तास धोक्याचे....

मुंबई : भारतीय हवामान विभागाने नाशिक आणि पुणे जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात आज गुरुवारी अतिवृष्टीची शक्यता व्यक्त

मुंबईच्या साठ्ये महाविद्यालयात तरुणीने केली आत्महत्या

मुंबई : साठ्ये महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारत २१ वर्षांच्या तरुणीने आत्महत्या केली. आत्महत्या

Girgoan Ganeshotsav 2025 : गिरगाव गणेशोत्सव मंडळाचा अष्टविनायक दर्शन सोहळा!

८ मंडळ १ पवित्र प्रवास! गणेशोत्सवाच्या निमित्ताने गिरगावमध्ये अष्टविनायक दर्शनाची सुवर्णसंधी, आठ मंडळांचा

Local Train Safety : लोकल ट्रेनमध्ये दरवाज्यात लटकत उभं राहणं बंद; मध्य रेल्वेचे महत्त्वाचे निर्णय

लोकल ट्रेनमध्ये बॅगा घासून झालेल्या दुर्घटनेनंतर मोठा निर्णय मुंबई : रेल्वे सुरक्षा बल आणि लोकमार्ग पोलीस

पश्चिम रेल्वेच्या १२ कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार

कर्मचाऱ्यांनी सुरक्षेसाठी दिले विशेष योगदान मुंबई : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्म वीर मीना यांनी छत्रपती