Mumbai rain मुंबई शहर जिल्ह्यात १४२ मिमी पाऊस, मुंबई - पुण्यासाठी २४ तास धोक्याचे....

मुंबई : भारतीय हवामान विभागाने नाशिक आणि पुणे जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात आज गुरुवारी अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करुन रेट अलर्ट जारी केला आहे. मुंबई, रायगड, नाशिक, सातारा, जिल्ह्यातील घाट क्षेत्रातील मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. हवामान खात्याचा अंदाजानुसार पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.  कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट क्षेत्राला पुढील चार दिवस यलो अलर्ट दिला आहे.  रत्नागिरी, पालघर, ठाणे, आणि सिंधुदुर्गात पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान केंद्राने म्हटले आहे.

https://x.com/RMC_Mumbai/status/1935601037219619317

विशेष म्हणजे  पुणे जिल्ह्यातील घाट क्षेत्रात पुढील चार दिवस पावसाचा जोर अधिक राहणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट क्षेत्राला पुढील चार दिवस जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान केंद्राने म्हटले आहे. राज्यातील उर्वरित भागात पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम पाऊस राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.  तसेच मुंबई - पुणे जिल्ह्यात पुढील २४ तासात पावसाचा जोर वाढण्याची हवामान खात्याने शक्यता वर्तवली आहे.

  गेल्या २४ तासात  मुंबई शहर जिल्ह्यात १४२ मिमी पाऊस 

राज्यात मागील २४ तासांमध्ये (१९ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) मुंबई शहर जिल्ह्यात १४२.६ मिमी पाऊस झाला आहे. तर रायगड जिल्ह्यात १३४.१ मिमी, पालघर १२०.९ मिमी, ठाणे ९०.३ मिमी आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात ६०.५ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

 

 

 

 

 

 

 

 
Comments
Add Comment

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी

मुंबई अखंडपणे धावण्यामागे महिलांचे योगदान मोठे; 'सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी महापौरांचे वक्तव्य

मुंबई: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अन्यायाविरोधात उभे राहत मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग खुला

'उबाठा' गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेग मुंबई :