Mumbai rain मुंबई शहर जिल्ह्यात १४२ मिमी पाऊस, मुंबई - पुण्यासाठी २४ तास धोक्याचे....

मुंबई : भारतीय हवामान विभागाने नाशिक आणि पुणे जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात आज गुरुवारी अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करुन रेट अलर्ट जारी केला आहे. मुंबई, रायगड, नाशिक, सातारा, जिल्ह्यातील घाट क्षेत्रातील मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. हवामान खात्याचा अंदाजानुसार पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.  कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट क्षेत्राला पुढील चार दिवस यलो अलर्ट दिला आहे.  रत्नागिरी, पालघर, ठाणे, आणि सिंधुदुर्गात पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान केंद्राने म्हटले आहे.

https://x.com/RMC_Mumbai/status/1935601037219619317

विशेष म्हणजे  पुणे जिल्ह्यातील घाट क्षेत्रात पुढील चार दिवस पावसाचा जोर अधिक राहणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट क्षेत्राला पुढील चार दिवस जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान केंद्राने म्हटले आहे. राज्यातील उर्वरित भागात पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम पाऊस राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.  तसेच मुंबई - पुणे जिल्ह्यात पुढील २४ तासात पावसाचा जोर वाढण्याची हवामान खात्याने शक्यता वर्तवली आहे.

  गेल्या २४ तासात  मुंबई शहर जिल्ह्यात १४२ मिमी पाऊस 

राज्यात मागील २४ तासांमध्ये (१९ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) मुंबई शहर जिल्ह्यात १४२.६ मिमी पाऊस झाला आहे. तर रायगड जिल्ह्यात १३४.१ मिमी, पालघर १२०.९ मिमी, ठाणे ९०.३ मिमी आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात ६०.५ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

 

 

 

 

 

 

 

 
Comments
Add Comment

गोरेगाव मुलुंड पश्चिमेतील उड्डाणपूल प्रकल्पाला गती, मुंबई मेट्रो ४च्या खालून जाणार पूल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : तानसा जलवाहिनी ते नाहूर रेल्वे पूल येथपर्यंतचा १.८९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल

महापालिकेच्या आपला दवाखान्यामध्येही मुख कर्करोगाची तपासणी

गर्भाशय मुख आणि स्तन कर्करोगाचे दवाखान्यांसह प्रसुतीगृहांमध्ये तपासणी शिबीर मुंबई (विशेष प्रतिनिधी)

गोरेगावात लिफ्टमध्ये हायड्रोजन फुग्यांचा स्फोट; तीन जण थोडक्यात बचावले

मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात हायड्रोजन गॅस भरलेल्या फुग्यांमुळे मोठा धोका निर्माण झाल्याची घटना समोर आली

भारतीय कृषी क्षेत्रावर तसा विपरीत परिणाम होऊ नये

अंदाजपत्रकातून विकासाला गती येण्यासाठी आणखी काही ठोस पावलांची अपेक्षा बारामती : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत

शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल

राज्य सरकारचा निर्णय; कागल आणि हातकणंगलेचा भाग वगळला मुंबई : राज्यातील साडेतीन शक्तीपीठांना जोडणाऱ्या

Pune Mumbai Expressway News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस गळतीमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला, पहाटेपर्यंत बचावकार्य सुरू

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपासून सुरू झालेला वाहतुकीचा खोळंबा तब्बल १२