सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी पाणी प्यायले पाहिजे.


रात्रभर झोपल्यानंतर आपले शरीर थोडे डिहायड्रेट होते. अशातच सकाळी उठल्यावर पाणी प्यायल्यास शरीर पुन्हा ताजेतवाने होते. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. तसेच दिवसाची सुरूवातही चांगली होते.


आता अशातच प्रश्न आहे की सकाळी उठल्यावर किती पाणी प्यायले पाहिजे?



किती पाणी प्यावे


तज्ञांच्या मते सकाळी उठल्यावर १ अथवा २ ग्लास पाणी पिणे चांगले असते. यामुळे शरीर पुन्हा हायड्रेट होते. तसेच पचनसंस्था सुधारते, मेटाबॉल्जिम बूस्ट होते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. तसेच मेंदू आणि शरीर दोन्ही अॅक्टिव्ह राहते.



कसे पाणी प्यावे?


सकाळी उठल्यानंतर कधीही थंड पाणी पिऊ नका. याच्याऐवजी कोमट अथवा रुम टेम्परेचर असलेले पाणी प्या. हे तुमच्या शरीरासाठी लाभदायक आहे.



एकाच वेळेस खूप पाणी नको


सकाळी पाणी पिणे चांगली गोष्ट आहे. मात्र खूप पाणी एकत्र पिणेही योग्य नाही. यामुळे पोटात गॅस अथवा जळजळ होऊ शकते. हळू हळू आणि आरामात पाणी प्या.


पाणी नेहमी बसून आणि हळू हळू प्यायले पाहिजे. या पद्धतीने पाणी प्यायल्याने शरीरास अधिक फायदे मिळतात.


सकाळी उठताच १ ते २ ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे शरीर संपूर्ण हलके आणि ताजेतवाने राहते.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे