नांदेडमध्ये हृदयद्रावक घटना: विहिरीत पोहताना विजेचा धक्का लागून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

  51

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. वन्नाळी येथील २१ वर्षीय मंगेश बालाजीराव पाटील याचा विहिरीत पोहत असताना विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण वन्नाळी गावात शोककळा पसरली आहे.


बुधवारी दुपारी मंगेश आपल्या मित्रांसोबत वन्नाळी आणि चैनपूर शिवारातील भुजंग दशरथराव पाटील यांच्या मालकीच्या विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. विहिरीत उतरल्यानंतर काही वेळाने मंगेशच्या मित्रांना विजेचा धक्का जाणवला आणि त्यांनी तातडीने विहिरीतून बाहेर उडी मारली. मात्र, मंगेश पोहतच राहिला आणि त्याचवेळी त्याला जोरदार विजेचा धक्का लागला, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.


मित्रांनी तात्काळ गावकऱ्यांना घटनेची माहिती दिली. गावकऱ्यांनी धाव घेत मंगेशला विहिरीतून बाहेर काढले, पण तोपर्यंत त्याचा श्वास थांबला होता. मंगेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. रात्री उशिरा वन्नाळी येथे शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


मंगेश नायगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI) दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होता. त्याच्या अकाली निधनाने कुटुंबावर आणि नातेवाईकांवर मोठा आघात झाला आहे. पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम हिंगोले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.


विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत अशा दुर्घटना टाळण्यासाठी विहिरी किंवा इतर जलाशयांमध्ये पोहताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल