हिंदी भाषा सक्तीला बळी पडू नका, डोंबिवलीतील शाळांना मनसेचे पत्र

  72

डोंबिवली : देशातील इतर राज्यात शाळांमध्ये हिंदी भाषा शक्ती नसताना महाराष्ट्रातच शाळांमध्ये हिंदी भाषा सक्ती का? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपस्थित केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हिंदी भाषासक्ती नको असे पत्र मनसैनिक मुख्याध्यापकांना देतील असे सांगितले होते.


गुरुवारी डोंबिवलीतील शाळांमध्ये मनसे पदाधिकारी व मनसैनिकांनी मुख्याध्यपकांना निवेदन दिले. हिंदी भाषेला बळी पडू नका, सरकारकडून जर आपल्यावर दबाव येत असेल तर मनसेच्या शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन केले.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या आदेशानुसार आणि मनसे नेते तथा माजी आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांच्या सूचनेनुसार शाळांना निवेदन देताना यावेळी कल्याण जिल्हाअध्यक्ष प्रकाश भोईर, डोंबिवली शहरप्रमुख राहुल कामत,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना डोंबिवली शहराध्यक्ष मिलिंद म्हात्रे, विधानसभा सचिव उदयजी वेळासकर, कल्याण ग्रामीण विधानसभा सचिव अरुण जांभळे, महिला शहर सचिव कोमल पाटील शहर संघटक प्रतिभा पाटील ,स्मिता भणगे, सुमेधा थत्ते, शहर सचिव संदीप (रमा) म्हात्रे उपशहर अध्यक्ष श्रीकांत वारंगे,प्रेम पाटील, प्रतीक देशपांडे, परेश भोईर, विभाग अध्यक्ष कदम भोईर,रवी गरुड, प्रदीप चौधरी,संजय चव्हाण तसेच उपविभाग अध्यक्ष,शाखा अध्यक्ष, महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Comments
Add Comment

अनिल अंबानी पुन्हा अडचणीत, ईडीनंतर अंबानींच्या सहा ठिकाणांवर सीबीआयचे छापे

अनिल अंबानी पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने धाड टाकल्यानंतर आता सीबीआयने देखील उद्योगपती

मनोज जरांगे 29 ऑगस्टला मुंबईत येणार, नाशिक, जालनामध्ये बैठकांचं सत्र

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा देत 29 ऑगस्टला मुंबईत मोर्चा निघणार काढणार असल्याचा

अकोटमध्ये गाढवांचा अनोखा पोळा

अकोला: अकोट शहरात आज गाढवांचा पोळा पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. देशभरात बैलांचा पोळा साजरा होत असताना,

पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेला हिरवा कंदील

राज्य सरकारच्या पायाभूत समितीची मंजुरी पुणे : बहुप्रतिक्षित पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या

विश्वास नांगरे पाटील यांनी शेअर केले शालेय प्रगतीपुस्तक, गुण पाहून व्हाल अचंबित

मुंबई: विश्वास नांगरे पाटील यांनी शालेय जीवनातील इयता आठवीचे प्रगतीपुस्तक सोशल मिडियावर शेअर केले आहे. वार्षिक

बैलपोळानिमित्त बैल धुण्यासाठी नदीवर गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

जालना: राज्यात बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा होत असताना जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बैलपोळा