हिंदी भाषा सक्तीला बळी पडू नका, डोंबिवलीतील शाळांना मनसेचे पत्र

डोंबिवली : देशातील इतर राज्यात शाळांमध्ये हिंदी भाषा शक्ती नसताना महाराष्ट्रातच शाळांमध्ये हिंदी भाषा सक्ती का? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपस्थित केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हिंदी भाषासक्ती नको असे पत्र मनसैनिक मुख्याध्यापकांना देतील असे सांगितले होते.


गुरुवारी डोंबिवलीतील शाळांमध्ये मनसे पदाधिकारी व मनसैनिकांनी मुख्याध्यपकांना निवेदन दिले. हिंदी भाषेला बळी पडू नका, सरकारकडून जर आपल्यावर दबाव येत असेल तर मनसेच्या शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन केले.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या आदेशानुसार आणि मनसे नेते तथा माजी आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांच्या सूचनेनुसार शाळांना निवेदन देताना यावेळी कल्याण जिल्हाअध्यक्ष प्रकाश भोईर, डोंबिवली शहरप्रमुख राहुल कामत,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना डोंबिवली शहराध्यक्ष मिलिंद म्हात्रे, विधानसभा सचिव उदयजी वेळासकर, कल्याण ग्रामीण विधानसभा सचिव अरुण जांभळे, महिला शहर सचिव कोमल पाटील शहर संघटक प्रतिभा पाटील ,स्मिता भणगे, सुमेधा थत्ते, शहर सचिव संदीप (रमा) म्हात्रे उपशहर अध्यक्ष श्रीकांत वारंगे,प्रेम पाटील, प्रतीक देशपांडे, परेश भोईर, विभाग अध्यक्ष कदम भोईर,रवी गरुड, प्रदीप चौधरी,संजय चव्हाण तसेच उपविभाग अध्यक्ष,शाखा अध्यक्ष, महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Comments
Add Comment

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ

Ajit Pawar : विमान अपघाताआधी अजित पवारांनी सुनेत्रा वहिनींच्या नातलगाला केलेला शेवटचा फोन... काय होते अजित पवारांचे शेवटचे शब्द

धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या संदर्भात एक नवी

Eknath Shinde: कोकणात प्रदूषणकारी कंपन्यांना थारा नाही; जनतेच्या आरोग्याशी खेळ होऊ देणार नाही!

लोटे परशुराम एमआयडीसीतील ‘मितेनी’–‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ कंपनीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट