हिंदी भाषा सक्तीला बळी पडू नका, डोंबिवलीतील शाळांना मनसेचे पत्र

डोंबिवली : देशातील इतर राज्यात शाळांमध्ये हिंदी भाषा शक्ती नसताना महाराष्ट्रातच शाळांमध्ये हिंदी भाषा सक्ती का? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपस्थित केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हिंदी भाषासक्ती नको असे पत्र मनसैनिक मुख्याध्यापकांना देतील असे सांगितले होते.


गुरुवारी डोंबिवलीतील शाळांमध्ये मनसे पदाधिकारी व मनसैनिकांनी मुख्याध्यपकांना निवेदन दिले. हिंदी भाषेला बळी पडू नका, सरकारकडून जर आपल्यावर दबाव येत असेल तर मनसेच्या शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन केले.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या आदेशानुसार आणि मनसे नेते तथा माजी आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांच्या सूचनेनुसार शाळांना निवेदन देताना यावेळी कल्याण जिल्हाअध्यक्ष प्रकाश भोईर, डोंबिवली शहरप्रमुख राहुल कामत,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना डोंबिवली शहराध्यक्ष मिलिंद म्हात्रे, विधानसभा सचिव उदयजी वेळासकर, कल्याण ग्रामीण विधानसभा सचिव अरुण जांभळे, महिला शहर सचिव कोमल पाटील शहर संघटक प्रतिभा पाटील ,स्मिता भणगे, सुमेधा थत्ते, शहर सचिव संदीप (रमा) म्हात्रे उपशहर अध्यक्ष श्रीकांत वारंगे,प्रेम पाटील, प्रतीक देशपांडे, परेश भोईर, विभाग अध्यक्ष कदम भोईर,रवी गरुड, प्रदीप चौधरी,संजय चव्हाण तसेच उपविभाग अध्यक्ष,शाखा अध्यक्ष, महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case : नाशिक खरात प्रकरण: मंदिरातील देणग्या ते परदेशी दुव्यांपर्यंत SIT ची चौकशी

मुंबई : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात तपास दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून, विशेष तपास पथक (SIT) विविध अंगांनी चौकशी

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन