हिंदी भाषा सक्तीला बळी पडू नका, डोंबिवलीतील शाळांना मनसेचे पत्र

डोंबिवली : देशातील इतर राज्यात शाळांमध्ये हिंदी भाषा शक्ती नसताना महाराष्ट्रातच शाळांमध्ये हिंदी भाषा सक्ती का? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपस्थित केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हिंदी भाषासक्ती नको असे पत्र मनसैनिक मुख्याध्यापकांना देतील असे सांगितले होते.


गुरुवारी डोंबिवलीतील शाळांमध्ये मनसे पदाधिकारी व मनसैनिकांनी मुख्याध्यपकांना निवेदन दिले. हिंदी भाषेला बळी पडू नका, सरकारकडून जर आपल्यावर दबाव येत असेल तर मनसेच्या शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन केले.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या आदेशानुसार आणि मनसे नेते तथा माजी आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांच्या सूचनेनुसार शाळांना निवेदन देताना यावेळी कल्याण जिल्हाअध्यक्ष प्रकाश भोईर, डोंबिवली शहरप्रमुख राहुल कामत,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना डोंबिवली शहराध्यक्ष मिलिंद म्हात्रे, विधानसभा सचिव उदयजी वेळासकर, कल्याण ग्रामीण विधानसभा सचिव अरुण जांभळे, महिला शहर सचिव कोमल पाटील शहर संघटक प्रतिभा पाटील ,स्मिता भणगे, सुमेधा थत्ते, शहर सचिव संदीप (रमा) म्हात्रे उपशहर अध्यक्ष श्रीकांत वारंगे,प्रेम पाटील, प्रतीक देशपांडे, परेश भोईर, विभाग अध्यक्ष कदम भोईर,रवी गरुड, प्रदीप चौधरी,संजय चव्हाण तसेच उपविभाग अध्यक्ष,शाखा अध्यक्ष, महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Comments
Add Comment

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरायला फक्त सहा दिवस उरले, शरद पवार राज्यसभा लढवणार की नाही?

मुंबई: येत्या १६ मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील

Maharashtra Village: राज्य सरकारकडून सहा ग्रामपंचायतींचा सन्मान केला जाणार; कोकणातील 'हे' गाव पहिल्या क्रमांकावर

मुंबई: गावाचा विकास हाच देशाचा विकास असं म्हटलं जातं. सध्या आपल्या देश लोकल ते ग्लोबल अशा मार्गाने काम करीत आहे.

Thane: ठाण्यात खळबळ, वेब सिरिज अभिनेत्रीच्या देहविक्रीचा व्यवसाय; पोलिसांकडून रॅकेटचा भांडाफोड

ठाणे: सिने इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याकारणाने एका हिंदी वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने पैसे