Amit Shah : गृहमंत्री शहांचा हल्लाबोल! देशात इंग्रजी बोलणाऱ्यांना स्वतःची लाज वाटेल...

नवी दिल्ली : भारतीय भाषा या देशाच्या आत्म्याचे आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहेत. भारतीय भाषा ही आपली ओळख आहे त्याचा अभिमान बाळगावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. लवकरच इंग्रजीतून संवाद साधणाऱ्यांना स्वतःची लाज वाटेल असा समाज तयार होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. माजी आयएएस अधिकारी आशुतोष अग्निहोत्री यांच्या ‘मैं बूंद स्वयं, खुद सागर हूं’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी अमित शाह बोलत होते. या वेळी त्यांनी भारतीय भाषांचे महत्त्व अधोरेखित केले आणि इंग्रजी भाषेवरील अवलंबित्वावर जोरदार टीका केली. आपण आपल्या भाषिक वारशाचा अभिमान बाळगण्याची आणि त्याचा जागतिक स्तरावर गौरव करण्याची वेळ आली आहे असं अमित शाह म्हणाले. तसेच इंग्रजीवर अवलंबित्व असलेल्यांवर त्यांनी टीका केली.



 

इंग्रजी बोलणाऱ्यांना स्वतःची लाज वाटेल


अमित शाह म्हणाले की, "भारतीय भाषा ही आपली खरी ओळख आहे. लवकरच असा समाज निर्माण होईल ज्यामध्ये इंग्रजी बोलणाऱ्यांना त्यांची स्वतःची लाज वाटेल. ज्यांना वाटते की हा बदल शक्य नाही, त्यांनी लक्षात घ्यावे की बदल दृढनिश्चयी लोकच घडवतात. आपल्या भाषा म्हणजे आपल्या संस्कृतीची शान आहे."

'पंच प्राण' भारताच्या अमृतकालाचे संकल्प


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या 'पंच प्राण' संकल्पांचा उल्लेख करत शहा म्हणाले की, हे १३० कोटी भारतीयांचे ध्येय बनले पाहिजे. या ५ संकल्पांद्वारे २०४७ पर्यंत भारत जगात सर्वोच्च स्थानावर पोहोचेल आणि त्या प्रवासात भाषांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल.

विकसित भारताचे स्वप्न


गुलामगिरीच्या मानसिकतेपासून मुक्ती

आपल्या गौरवशाली इतिहासाचा अभिमान

राष्ट्रीय एकता व अखंडतेबद्दल समर्पण

प्रत्येक नागरिकामध्ये कर्तव्यभावना

English Language : भारत समजून घेण्यासाठी इंग्रजी अपुरी


परदेशी भाषा भारत समजून घेण्यासाठी अपुरी आहे असं म्हणत अमित शाहांनी इंग्रजी आणि इतर परदेशी भाषांवर टीका केली. परदेशी भाषा या भारताच्या इतिहास, संस्कृती आणि धार्मिक परंपरा समजून घेण्यासाठी पुरेशा नाहीत असं अमित शाह म्हणाले. अर्धवट परदेशी भाषांद्वारे भारत कधीच समजला जाऊ शकत नाही. ही लढाई सोपी नाही, पण मला विश्वास आहे की आपण ती जिंकू. आपण आपल्या भाषांमध्ये देश चालवू आणि जगाचे नेतृत्वही करू असा आत्मविश्वास अमित शाहांनी व्यक्त केला.
Comments
Add Comment

Mumbai-Ahmedabad Bullet Train : प्रतीक्षा संपली! देशातील पहिल्या 'बुलेट ट्रेन'ची पहिली झलक आली समोर; दिल्लीत झळकावले चित्र

नवी दिल्ली : भारतातील बहुचर्चित आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन' (Mumbai-Ahmedabad Bullet Train)

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक

Dubare Elephant Camp : थरकाप उडवणारी घटना! कर्नाटकातील दुबारे हत्ती कॅम्पमध्ये दोन हत्तींच्या झुंजीत महिला पर्यटकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू

कर्नाटकातील कोडागू जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या 'दुबारे एलिफंट कॅम्प' (Dubare Elephant Camp) मध्ये एक अत्यंत

Yogi Adityanath : ‘नमाज पठण करायचे असेल तर शिफ्टमध्ये करा, प्रेमाने ऐकाल तर ठीक, नाहीतर...’; योगी आदित्यनाथ यांचा थेट इशारा

उत्तर प्रदेश : आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh Minister) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)

India - Sweden Bilateral Talks : पंतप्रधान मोदींची स्वीडनच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी स्वीडनमधील गॉथेनबर्ग येथे पंतप्रधान महामहीम उल्फ क्रिस्टरसन

Uttar Pradesh Road Accident : उत्तर प्रदेशामध्ये ट्रक-मॅजिकच्या धडकेत १० जणांचा मृत्यू

लखनौ : येथील लखीमपूर खेरी येथे सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ते अपघातात १० जणांचा