Wari 2025 : हातात पताका, गळ्यात टाळ आणि मुखी विठुरायाचे नाम!

माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सज्ज



अवंदा गर्दी हाय म्हणत्यात... पाऊस बक्कळ हाय बघा, पण पेरण्या रखडल्यात. असो, माउली बघून घेतील ओ..! चला माउलींच्या वारीला..!! असं म्हणत महाराष्ट्राच्या गावांगावातून वारकऱ्यांच्या दिंड्यांनी आळंदी गाठलीय. वारकऱ्यांच्या गर्दीने अवघी अलंकापुरी फुलून गेलीय. हातात पताका, गळ्यात टाळ आणि मुखी पाडुंरंगाचे नाम...असं चैतन्याची अनुभूती देणार वातावरण सध्या इथं अनुभवायला मिळतयं.


?si=94LpjkBb3Hd696xa

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी प्रस्थान सोहळा उद्या म्हणजे गुरुवारी रात्री ८.०० वाजता होत आहे. त्यामुळं या सोहळ्याच्या तयारीची लगबग आज आळंदीत पाहायला मिळतेय. प्रस्थान सोहळ्याचा कार्यक्रम कसा असेल ते पाहूया...



गुरूवारी पहाटे ४ ते ५.३० वाजता
घंटानाद, काकडा, पवमानाभिषेक, पंचामृतपूजा व दुधारती.


पहाटे ५ ते सकाळी ९ वाजता
भाविकांची माउलींच्या चलपादुकांवर महापूजा होईल


सकाळी ६ ते दुपारी १२ वाजता
भाविकांना समाधिस्पर्श दर्शन


सकाळी ९ ते ११ वाजता
वीणामंडपात कीर्तन होईल.


दुपारी १२ ते १२.३०
गाभारा स्वच्छता व माउलींना महानैवेद्य.


दुपारी १२ ते ५
भाविकांना समाधिस्पर्श दर्शन.गुरुवारची श्रींची नित्य पालखी प्रदक्षिणा


रात्री ८ वाजता
प्रस्थान सोहळा कार्यक्रम सुरू होईल. यात श्रीगुरू हैबतबाबा आरती, संस्थानतर्फे आरती, मानकऱ्यांना नारळप्रसाद, माउलींच्या पादुका पालखीत ठेवण्यात येतील. संस्थानतर्फे मानकऱ्यांना मानाच्या पागोट्यांचे वाटप, श्रीगुरू हैबतबाबातर्फे नारळप्रसाद, संस्थानतर्फे समाधीजवळ नारळप्रसादाचे वाटप होऊन पालखी वीणामंडपातून प्रस्थान ठेवत महाद्वारातून बाहेर पडते. प्रदक्षिणा घातल्यानंतर गांधीवाडा मंडप या ठिकाणी पालखीचा मुक्काम असणार आहे.

Comments
Add Comment

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक

Sanjay Shirsat : "तुमचा डबा रुळावरून घसरलाय, आता काठावर बसा"; मंत्री शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना टोला

छत्रपती संभाजीनगर : "उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचा जीव केवळ मुंबईत अडकलेला आहे. नगरपालिका निवडणुकीत

Ladki Bahin Yojna : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेच्या ४० लाख महिला अपात्रतेच्या उंबरठ्यावर?

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक