झरीखाडी पुलाच्या दुरुस्तीमुळे वाहतूक बंद

  26

पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन


डहाणू  : पालघर जिल्ह्यातील महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या तलासरी उंबरगाव मार्गावरील झरीखाडी पुलाचे काम प्रगतिपथावर असून पुलाचे काम सुरू असल्यामुळे पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. पूल बंद असल्यामुळे नागरिकांना पर्यायी रस्त्याचे वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र यामुळे नागरिकांना १० ते १२ किलोमीटर लांबच्या पर्यायी रस्त्याचे वापर करावा लागत असून नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.


तलासरी उंबरगाव रस्त्यावरील झरी खाडी पुलाची उंची कमी असल्यामुळे दरवर्षी हा पूल पाण्याखाली जात असून यामुळे वाहतूक विस्कळीत होत होती. अनेक वर्षांपासून या पुलाची उंची वाढवण्याची मागणी करण्यात येत असून अखेर या ठिकाणी नवीन पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू असून पर्यायी मार्ग म्हणून जुन्या पुलावर मातीचा भराव टाकून वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे हा पुल वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असून अनुचित प्रकार रोखण्यासाठी या पुलावरून वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याची सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सेंबर २०२४ मध्ये नवीन पुलाच्या कामाला सुरुवात झाली असून या पुलासाठी २२ कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.


पावसाळ्याच्या पूर्वी या पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र ठेकेदाराला निधी उपलब्ध करून देण्यात येत नसल्यामुळे पुलाचे काम लांबल्याची माहिती देण्यात येत आहे. पावसाळ्यात पुलावरून वाहतूक बंद असल्यामुळे नागरिकांनी पर्यायी कवाडा, वसा, वेवजी, उंबरगाव या लांबच्या रस्त्याचा अवलंब करावा लागत आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास आणि खर्चाला सामोरे जावे लागत आहे. तलासरी तालुक्यातून संजान, उंबरगाव, वेवजी बाजूला कंपनी मधील कामगार, विद्यार्थी आणि रुग्ण प्रवास करतात.
सध्या झरीखाडी पूल वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे कामगार, विद्यार्थी आणि रुग्णांना पर्यायी लांबच्या मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. तसेच तलासरी बाजूने मोठ्या प्रमाणात जड-अवजड वाहने उंबरगाव येथील औद्योगिक वसाहतीत जात असून नवीन चालकांची दिशाभूल होऊन त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Comments
Add Comment

हजारो स्थानिक तरुण होतील रोजगारक्षम

शासन आणि वाढवण पोर्टमध्ये सामंजस्य करार पालघर : वाढवण बंदराच्या कौशल्य गरजेनुसार स्थानिक तरुणांना विविध

कस्टम डॉक्युमेंटेंशन कोर्समध्ये पहिली बॅच यशस्वी

वाढवण पोर्ट स्किलिंग प्रोग्राम यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र पालघर : स्थानिक

पालघरही बनणार विकासाचे प्रवेशद्वार!

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास पालघर : राज्यातील शेवटचा जिल्हा म्हणून असलेली गडचिरोली जिल्ह्याची ओळख

मुख्यमंत्री दौऱ्यासाठी काही ठिकाणच्या वाहतूक मार्गात बदल

पालघर : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कौशल्य विकास उद्योजकता मंत्री मंगलप्रभात

भाजपाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी दाखला शिबीर

विद्यार्थ्यांना विविध राेपांचे केले वाटप विरार : दहावी व बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे

अमली पदार्थ विरोधात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

पालघर : अमली पदार्थ विरोधात पालघर पोलिसांनी सुरू केलेल्या कठोर मोहिमेअंतर्गत विक्रमगड येथे मोठ्या प्रमाणात