विजेअभावी पालघरमधील रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ

पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यातील कासा गावात गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होत आहे. याचा फटका रिक्षा चालकांवर बसत असल्याचे दिसून येत आहे. सीएनजी पंपावर वीज पुरवठा खंडित असल्याने रिक्षा चालकांना आठ तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यानंतरही सीएनजी मिळत नसल्याने रिक्षा चालकांचा धंदा होत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.


या काही दिवसांपासून रिक्षाचालक सकाळी सीएनजी भरण्यासाठी पंपावर जातात. पण तेथे वीज पुरवठा खंडित असल्याने सीएनजी मिळण्यास अडचण येत आहे. त्यामुळे रिक्षाचालक दिवसभर रिक्षा चालू शकत नाहीत. त्यामुळे अनेकांना उपासमारीचे संकट पडले आहे. रिक्षा चालकांनी रिक्षा कर्ज काढून घेतल्या असल्यामुळे हप्ता कसा भरायचा या विवंचनेत आहेत. सध्या शाळा व कॉलेज सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेकडे पोहोचवणे व घरी पोहोचवणे यासाठी रिक्षा लावल्या आहेत.


विजेचा खोळंबा होत असल्याने सीएनजी वेळेवर मिळत नसल्याने आर्थिक विवंचना सुरू झाली आहे. कासा चारोटी परिसरात वीजपुरवठा खंडित होत असल्याने रोज प्रवासी रिक्षा धंद्यावर उदरनिर्वाह करणारे ४०० ते ५०० रिक्षा चालकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Comments
Add Comment

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक

Sanjay Shirsat : "तुमचा डबा रुळावरून घसरलाय, आता काठावर बसा"; मंत्री शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना टोला

छत्रपती संभाजीनगर : "उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचा जीव केवळ मुंबईत अडकलेला आहे. नगरपालिका निवडणुकीत

Ladki Bahin Yojna : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेच्या ४० लाख महिला अपात्रतेच्या उंबरठ्यावर?

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक