विजेअभावी पालघरमधील रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ

पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यातील कासा गावात गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होत आहे. याचा फटका रिक्षा चालकांवर बसत असल्याचे दिसून येत आहे. सीएनजी पंपावर वीज पुरवठा खंडित असल्याने रिक्षा चालकांना आठ तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यानंतरही सीएनजी मिळत नसल्याने रिक्षा चालकांचा धंदा होत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.


या काही दिवसांपासून रिक्षाचालक सकाळी सीएनजी भरण्यासाठी पंपावर जातात. पण तेथे वीज पुरवठा खंडित असल्याने सीएनजी मिळण्यास अडचण येत आहे. त्यामुळे रिक्षाचालक दिवसभर रिक्षा चालू शकत नाहीत. त्यामुळे अनेकांना उपासमारीचे संकट पडले आहे. रिक्षा चालकांनी रिक्षा कर्ज काढून घेतल्या असल्यामुळे हप्ता कसा भरायचा या विवंचनेत आहेत. सध्या शाळा व कॉलेज सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेकडे पोहोचवणे व घरी पोहोचवणे यासाठी रिक्षा लावल्या आहेत.


विजेचा खोळंबा होत असल्याने सीएनजी वेळेवर मिळत नसल्याने आर्थिक विवंचना सुरू झाली आहे. कासा चारोटी परिसरात वीजपुरवठा खंडित होत असल्याने रोज प्रवासी रिक्षा धंद्यावर उदरनिर्वाह करणारे ४०० ते ५०० रिक्षा चालकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसह एकूण पाच बँकांना आर्थिक दंड; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मुंबई: आरबीआयनं महाराष्ट्रातील विटा मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विटा या बँकेला दंड केला आहे. या बँकेला ३.१०

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच