मिठी नदीला जोडणाऱ्या नाल्यात थर्माकॉल, पार्सल बॉक्स

  29

महापालिकेने औद्योगिक कचरा टाकणाऱ्यांविरोधात पोलिसांत नोंदवली तक्रार


मुंबई : मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्यांमध्ये औद्योगिक कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या प्रकारामुळे नाले तुंबण्याचा धोका निर्माण होत असून, परिणामी शहरात पाणी साचण्याची समस्या वाढत आहे. धारावी येथील मिठी नदी आणि नाला जोडणाऱ्या टी जंक्शन नाला स्वच्छ केल्यानंतरही त्यात औद्योगिक कचरा मोठ्या प्रमाणावर टाकल्याचे आढळून आले आहे. याची गंभीर दखल घेत महानगरपालिका प्रशासनाने शाहुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तरंगत्या कचऱ्यात थर्माकॉल, बॉक्स, फ्रीजच्या आतील भागातील फोम आदींचा मोठ्या प्रमाणात समावेश असून भंगार दुकान, फ्रीज दुरुस्त करणारे व्यावसायिक आणि इलेक्ट्रॉनिक्स दुकान आदींमधून हा कचरा टाकण्यात आलेला येथील अनधिकृत चालवल्या जाणारी भंगार दुकान आणि इतर गाळ्यांवर महापालिका कधी बुलडोझर चालवणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.


पावसाळी कामांचा भाग म्हणून, मुंबई महानगरातील नद्या आणि नाल्यांमधील गाळ काढण्यात येत आहे. गाळ काढण्याचे काम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून या कामी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर केला जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून गाळ काढण्याच्या कामात परिणामकारकता व पारदर्शकता यामध्ये वाढ होण्यास मोठी मदत होत आहे. मोठ्या व छोट्या नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले असले तरी भरतीसोबत तरंगता कचरा जमा झाल्यामुळे नालेसफाई वारंवार करावी लागत आहे.
नाल्यांमध्ये कचरा जाण्यापासून रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. नाल्यांमध्ये येणाऱ्या या कचऱ्यास प्रतिरोध करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने प्रायोगिक तत्वावर काही ठिकाणी जाळी बसविली आहे. तरीही, काही व्यक्ती तथा गाळेधारक नाल्यांमध्ये थर्माकॉल, फर्निचर, रबर, रॅपर्स असा विविध प्रकारच्या तरंगत्या वस्तू टाकत आहेत. त्यामुळे सांडपाणी वहन, निचरा होण्यास अडथळे निर्माण होत आहे.


धारावी येथील टी जंक्शनकडे जाणाऱ्या नाल्याची महानगरपालिकेने नुकतीच स्वच्छता केली आहे. गाळ काढण्याबरोबरच तरंगत्या वस्तूदेखील काढण्यात आल्या. तरीही, सोमवारी, १६ जून २०२५ रोजी जी उत्तर विभागातील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता अज्ञातांनी या नाल्यात थर्माकॉल, रबर, रॅपर्स, पार्सल बॉक्स आदी औद्योगिक अशा विविध वस्तू टाकल्याचे निदर्शनास आले. त्याची गंभीर दखल घेत आणि वरिष्ठांच्या सूचनेनुसार, शाहुनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. नालेसफाईच्या कामात अडथळा निर्माण करणारी ही कृती गंभीर असून यामुळे आपत्ती व्यवस्थापनास अडचणी निर्माण होत आहे. यासंदर्भात भारतीय न्यायसंहिता २०२३ कलम ३२६ (क) अन्वये दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




  • कुठून येतो असा कचरा

  • भंगार दुकान

  • कचरा संकलन करणारे कचरा वेचक

  • टीव्ही आणि फ्रिज

  • दुरुस्त करणारे

  • वाहनांचे सीट

  • कव्हर बनवणारे

  • जुने मेट्रासिस बनवणारे

  • वाहने दुरुस्त

  • करणारी गॅरेज


Comments
Add Comment

Pratap Sarnaik : वाहतूक व्यवसायकांना फायदा होणार ! ई-चलन समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करावी, परिवहन मंत्र्यांचे आदेश...

मुंबई : गेले अनेक वर्षापासून वाहतूक व्यावसायकांना ई-चलन संदर्भात अडचणींचा सामना करावा लागतोय, ही बाब सरकारच्या

हिंदी सक्ती विरोधात चढाओढ! ठाकरेंचे मोर्चे मराठीसाठी की राजकीय शक्ती दाखवण्यासाठी?

मुंबई : एक मुद्दा… पण दोन मोर्चे! आणि दोघंही 'ठाकरे'. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येतील, असं काही

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

आदिवासी समाजाला अतिरिक्त आरक्षण ? मुख्यमंत्र्यांना पाठवणार प्रस्ताव...

मुंबई : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे.  आदिवासी समाजातील तरुणांना नोकऱ्यांमध्ये

Devendra Fadanvis 'आम्ही सर्व जनतेचे सेवक', लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका...

मुंबई : भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या विधानावरुन अडचणीत वाढ

Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला, हिंदी सक्ती, शक्तीपीठ या मुद्द्यावरुन वातावरण पेटणार; कधी होणार अधिवेशन? जाणून घ्या...

मुंबई : यंदाच्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरलेला आहे. येत्या ३० जून ते १८ जुलै या काळात