Wari 2025 : चला वारीला...पांडुरंगाच्या भेटीला!

तुकोबा पालखी सोहळ्याला प्रारंभ


लाडक्या विठूरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी आज दुपारी अडीजच्या सुमारास पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थानं ठेवतील. जगदगुरू संत तुकाराम यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या देहूनगरीतून पालखी सोहळा मंदिर प्रदक्षिणा करून मार्गस्थ होणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वैष्णव व दिंड्या इथं दाखल झालेल्या आहेत. काय आहे माहिती जाणून घेऊया या लेखातून...


?si=EhBB2DRIoYwII1ql

महाराष्ट्राला आषाढी एकादशी वारीची फार मोठी परंपरा लाभली आहे. पंढपूरला पायी जाण्याची परंपरा शतकानुशतके सुरु आहे. लाखो भाविक पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी येत असतात. टाळ-मृदुंगाच्या ठेक्यावर, ग्यानबा-तुकारामांच्या जयघोषात विठुरायाचे नामस्मरण करीत वारकरी नामस्मरणात लीन होत आहेत. यंदा संत तुकाराम महाराज यांच्या ३४० व्या आषाढी सोहळ्याला बुधवारपासून प्रारंभ होत आहे. या पालखी सोहळ्यासाठी आलेल्या वारकरी व भाविकांमुळं देहुनगरी गर्दीने फुलून गेली आहे. 'ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम 'चा जयघोष असं वातावरण इथं पाहायला मिळतयं.



ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता काना - कोपर्‍यातून वृद्ध महिला-पुरुष वारकरी, माऊली व विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेले दिसत होते. देहुनगरीमध्ये काही ठिकाणी रस्ते व चौक बंद असले तरी मार्ग काढत वारकरी मंदिर परिसरात गर्दी करत होते. अभंग व टाळ- मृदंगाच्या नादातील भजनाने देहुनगरी न्हाऊन निघालीय. इंद्रायणीचा घाट भाविकांनी सजला आहे. सर्व रस्ते, प्रदक्षिणा मार्ग, संत तुकाराम महाराज मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलल्याचे दिसत आहे. देहूतून पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पुढे पंढरपूरपर्यंत महिनाभर पायी वाट तुडवत आणि विसावा घेत जाण्यासाठी लागणारा तुटपुंजा संसार पाठीवर आणि काखेत अडकून वारकरी निघाले आहेत.


प्रवासासाठी छत्री, नाहीतर रेनकोट, कपडे, अंथरूण आणि खाण्याच्या सामानाची पिशवी बास एवढेच काय ते सामान. प्रमुख दिंड्याच्या उपस्थित वारकरी भाविक भक्तांसह हरिनामाच्या गजर करत टाळ-मृदंगाच्या निनादात आज सायंकाळी पाच वाजता मुख्य मंदिरातून प्रस्थान होईल. सायंकाळी साडे सहा वाजता पालखी प्रस्थान सोहळा श्री तुकोबारायांच्या आजोळी म्हणजे इनामदारसाहेब वाड्यात पहिल्या मुक्कामासाठी विसवणार आहे. त्या ठिकाणी आरती होऊन रात्री देहूकर महाराजांचे कीर्तन, हरिनामाचा जागर असे धार्मिक कार्यक्रम होतील.

Comments
Add Comment

अस्पृश्यता आणि विषमता हा मानवतेविरुद्धचा सर्वात मोठा अपराध

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचे भूमिपूजन मुंबई :

डिझेल खरेदीतून वर्षाला २४१ कोटी रुपयांची बचत होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत

पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात, ओव्हरटेकच्या नादात...

पुणे: पुणे-सोलापूर महामार्गावर पाटसजवळ एका भीषण अपघाताने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. सोलापूरहून

अशोक खरातचे ५८ व्हिडीओ कसे समोर आले?, प्रकरणात नवा ट्विस्ट

नाशिक: राजकारण्यांना स्वप्न दाखवणाऱ्या तथाकथित ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर

गडचिरोली : ११ जहाल माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण

- गडचिरोली पोलीस सीआरपीएफ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश एकेकाळी माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या

'जल जीवन मिशन २.०’ साठी केंद्र आणि राज्य शासनात सामंजस्य करार

- मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या करारावर स्वाक्षऱ्या राज्यातील प्रत्येक ग्राम