Wari 2025 : चला वारीला...पांडुरंगाच्या भेटीला!

तुकोबा पालखी सोहळ्याला प्रारंभ


लाडक्या विठूरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी आज दुपारी अडीजच्या सुमारास पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थानं ठेवतील. जगदगुरू संत तुकाराम यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या देहूनगरीतून पालखी सोहळा मंदिर प्रदक्षिणा करून मार्गस्थ होणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वैष्णव व दिंड्या इथं दाखल झालेल्या आहेत. काय आहे माहिती जाणून घेऊया या लेखातून...


?si=EhBB2DRIoYwII1ql

महाराष्ट्राला आषाढी एकादशी वारीची फार मोठी परंपरा लाभली आहे. पंढपूरला पायी जाण्याची परंपरा शतकानुशतके सुरु आहे. लाखो भाविक पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी येत असतात. टाळ-मृदुंगाच्या ठेक्यावर, ग्यानबा-तुकारामांच्या जयघोषात विठुरायाचे नामस्मरण करीत वारकरी नामस्मरणात लीन होत आहेत. यंदा संत तुकाराम महाराज यांच्या ३४० व्या आषाढी सोहळ्याला बुधवारपासून प्रारंभ होत आहे. या पालखी सोहळ्यासाठी आलेल्या वारकरी व भाविकांमुळं देहुनगरी गर्दीने फुलून गेली आहे. 'ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम 'चा जयघोष असं वातावरण इथं पाहायला मिळतयं.



ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता काना - कोपर्‍यातून वृद्ध महिला-पुरुष वारकरी, माऊली व विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेले दिसत होते. देहुनगरीमध्ये काही ठिकाणी रस्ते व चौक बंद असले तरी मार्ग काढत वारकरी मंदिर परिसरात गर्दी करत होते. अभंग व टाळ- मृदंगाच्या नादातील भजनाने देहुनगरी न्हाऊन निघालीय. इंद्रायणीचा घाट भाविकांनी सजला आहे. सर्व रस्ते, प्रदक्षिणा मार्ग, संत तुकाराम महाराज मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलल्याचे दिसत आहे. देहूतून पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पुढे पंढरपूरपर्यंत महिनाभर पायी वाट तुडवत आणि विसावा घेत जाण्यासाठी लागणारा तुटपुंजा संसार पाठीवर आणि काखेत अडकून वारकरी निघाले आहेत.


प्रवासासाठी छत्री, नाहीतर रेनकोट, कपडे, अंथरूण आणि खाण्याच्या सामानाची पिशवी बास एवढेच काय ते सामान. प्रमुख दिंड्याच्या उपस्थित वारकरी भाविक भक्तांसह हरिनामाच्या गजर करत टाळ-मृदंगाच्या निनादात आज सायंकाळी पाच वाजता मुख्य मंदिरातून प्रस्थान होईल. सायंकाळी साडे सहा वाजता पालखी प्रस्थान सोहळा श्री तुकोबारायांच्या आजोळी म्हणजे इनामदारसाहेब वाड्यात पहिल्या मुक्कामासाठी विसवणार आहे. त्या ठिकाणी आरती होऊन रात्री देहूकर महाराजांचे कीर्तन, हरिनामाचा जागर असे धार्मिक कार्यक्रम होतील.

Comments
Add Comment

Intelligence Bureau : पालघरमध्ये 'इंटेलिजन्स ब्युरो'साठी हक्काची जागा

- महसूल विभागाचा मोठा निर्णय; वसईत कार्यालय आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा मुंबई : पालघर जिल्ह्याच्या

Cyclone Shelter Center in Dapoli : दापोली तालुक्यातील चक्रीवादळ निवारा केंद्रासाठी महसूलकडून विनामूल्य जागा

मुंबई : कोकण किनारपट्टीवरील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला

Onion processing industry: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा प्रक्रिया उद्योगास चालना देणार - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा,

Industries Minister Dr. Uday Samant : पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे

Industries Minister Dr. Uday Samant - 'एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार : उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी

Ashok Kharat : 'लक्ष्मण' ते भोंदूबाबा 'अशोक खरात'; ४० वर्षांपूर्वीच गावकऱ्यांनी दिला होता बेदम चोप!

अहिल्यानगर : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या अशोक खरात याच्या कृत्यांची मुळं चाळीस