Wari 2025 : हातात पताका, गळ्यात टाळ आणि मुखी विठुरायाचे नाम!

माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सज्ज



अवंदा गर्दी हाय म्हणत्यात... पाऊस बक्कळ हाय बघा, पण पेरण्या रखडल्यात. असो, माउली बघून घेतील ओ..! चला माउलींच्या वारीला..!! असं म्हणत महाराष्ट्राच्या गावांगावातून वारकऱ्यांच्या दिंड्यांनी आळंदी गाठलीय. वारकऱ्यांच्या गर्दीने अवघी अलंकापुरी फुलून गेलीय. हातात पताका, गळ्यात टाळ आणि मुखी पाडुंरंगाचे नाम...असं चैतन्याची अनुभूती देणार वातावरण सध्या इथं अनुभवायला मिळतयं.


?si=94LpjkBb3Hd696xa

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी प्रस्थान सोहळा उद्या म्हणजे गुरुवारी रात्री ८.०० वाजता होत आहे. त्यामुळं या सोहळ्याच्या तयारीची लगबग आज आळंदीत पाहायला मिळतेय. प्रस्थान सोहळ्याचा कार्यक्रम कसा असेल ते पाहूया...



गुरूवारी पहाटे ४ ते ५.३० वाजता
घंटानाद, काकडा, पवमानाभिषेक, पंचामृतपूजा व दुधारती.


पहाटे ५ ते सकाळी ९ वाजता
भाविकांची माउलींच्या चलपादुकांवर महापूजा होईल


सकाळी ६ ते दुपारी १२ वाजता
भाविकांना समाधिस्पर्श दर्शन


सकाळी ९ ते ११ वाजता
वीणामंडपात कीर्तन होईल.


दुपारी १२ ते १२.३०
गाभारा स्वच्छता व माउलींना महानैवेद्य.


दुपारी १२ ते ५
भाविकांना समाधिस्पर्श दर्शन.गुरुवारची श्रींची नित्य पालखी प्रदक्षिणा


रात्री ८ वाजता
प्रस्थान सोहळा कार्यक्रम सुरू होईल. यात श्रीगुरू हैबतबाबा आरती, संस्थानतर्फे आरती, मानकऱ्यांना नारळप्रसाद, माउलींच्या पादुका पालखीत ठेवण्यात येतील. संस्थानतर्फे मानकऱ्यांना मानाच्या पागोट्यांचे वाटप, श्रीगुरू हैबतबाबातर्फे नारळप्रसाद, संस्थानतर्फे समाधीजवळ नारळप्रसादाचे वाटप होऊन पालखी वीणामंडपातून प्रस्थान ठेवत महाद्वारातून बाहेर पडते. प्रदक्षिणा घातल्यानंतर गांधीवाडा मंडप या ठिकाणी पालखीचा मुक्काम असणार आहे.

Comments
Add Comment

Dharashiv : महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात एकच गोंधळ, महिलेनं अंगावर पेट्रोल ओतलं अन्…

Dharashiv : धाराशिव येथील शासकीय मध्यवर्ती इमारतीसमोर आयोजित करण्यात आलेल्या मुख्य झेंडावंदन कार्यक्रमादरम्यान एका 40

Suresh Kumar Jaithalia : माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे निधन

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी आमदार

Devendra Fadnavis : "महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे पण ..."; महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडले स्पष्ट मत

मुंबई : महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यात भाषेच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र

HSC Results 2026 : बारावीचा निकाल काही तासांवर; जाणून घ्या निकाल कुठे आणि कसा पाहता येणार?

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील इयत्ता बारावी (HSC) परीक्षेचा २०२६ चा निकाल उद्या म्हणजेच शनिवार २ मे रोजी जाहीर होणार

Weather Update : पुढील ४८ तास अतिशय महत्त्वाचे! उष्णतेतून दिलासा, पण अवकाळीचं नवं संकट दारात; IMDचा हाय अलर्ट

मुंबई : राज्यात सध्या उष्णतेचा कडाका शिगेला पोहोचला असून विशेषतः विदर्भात परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक

Nashik : नाशिक जिल्ह्यातील 45 हजार नावं शिधापत्रिकेच्या यादीतून हटवली, तुमचंही नाव यादीत तर नाही ना ?

नाशिक : नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील, 45 हजार 948 आयकरदात्यांची नावं शिधापत्रिकेच्या यादीतून